शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

योजनांच्या माहितीसाठी जनजागृतीची गरज!

By admin | Updated: June 24, 2017 05:47 IST

खासदार संजय धोत्रे यांचे प्रतिपादन : सांसद ग्राम केळीवेळीत ‘न्यू इंडिया अभियान कार्यक्रम’

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंंत पोहोचविण्यासाठी या योजनांवर आधारित जनजागृतीपर कार्यक्रम गरजेचे आहेत, असे आवाहन खासदार संजय धोत्रे यांनी शुक्रवारी सांसद आदर्श ग्राम केळीवेळी येथे केले. केंद्र शासनाच्या तीन वर्षपूर्तीनिमित्त भारत सरकारच्या क्षेत्रीय प्रचार निदेशालय अमरावती व जिल्हा प्रशासनाच्यावतीने अकोट तालुक्यातील केळीवेळी येथील श्री सखाराम महाराज विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित ह्यन्यू इंडिया अभियानह्ण, या विशेष जनसंवाद कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी मंचावर जि. प. अध्यक्ष संध्या वाघोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, पं.स. सुमित्रा जावरे, सरपंच दिनकर गावंडे, उपसरपंच महेंद्रसिंह ठाकूर, उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, तहसीलदार घुगे, गुरुव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. के. खिल्लारे, गटविकास अधिकारी कालिदास तापी, उपविभागीय कृषी अधिकारी ए. एन. कंडराकर, सहायक टपाल अधीक्षक व्ही. के. मानकर, शाकिर शेख, तालुका कृषी अधिकारी ठाकूर, जिल्हा अग्रणी बँकव्यवस्थापक तुकाराम गायकवाड, वर्धाचे क्षेत्रीय प्रचार कार्यालय प्रमुख संजय तिवारी, सहा गटविकास अधिकारी सुधीर अरबट, योग प्रशिक्षक धनंजय भगत आणि तालुका स्तरावरील सर्व राज्य सरकारच्या कार्यालयाचे विभाग प्रमुख आणि ग्रामपंचायतचे सदस्यगण आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार धोत्रे म्हणाले, की केंद्र सरकारने गरिबांसाठी समग्र सामाजिक सुरक्षिततेचा विचार करून प्रधानमंत्री सुरक्षा विमा, जीवन ज्योती आणि अटल पेन्शनसारख्या योजनांच्या माध्यमातून लोकांना सामाजिक संरक्षण देण्यात येत आहे. आपल्या गावाला आदर्श गाव करण्याकरिता शासनाकडून राबवल्या जाणार्‍या योजना व उपक्रमामध्ये संबंधित अधिकारीवर्ग आणि लोकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. प्रास्ताविक अंबादास यादव, संचालन मंगेश भालेराव, आभार महेंद्रसिंह ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज शर्मा, ग्रामसेवक भुजंगराव शिवरकार, अंगणवाडी पर्यवेक्षिका मंगला दोड, नेहरू युवा केंद्राचे अध्यक्ष श्रीकांत गावंडे व त्यांचे कार्यकर्ते, विशाल घोडेस्वार, ग्रामपंचायतचे कर्मचारीवर्ग, अंगणवाडी सेविका पुष्पा जंजाळ, पद्मा नातमते, नंदा वानखडे, व मदतनीस, आशाताई यांचे विशेष सहकार्य लाभले.