शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे नेते रवी राठी यांचे पित्त खवळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:21 IST

मूर्तिजापूर : येथील भगवंत लाॅनमध्ये ६ फेब्रुवारी रोजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या परिवार संवाद यात्रेनिमित्ताने सभा घेण्यात आली होती. ...

मूर्तिजापूर : येथील भगवंत लाॅनमध्ये ६ फेब्रुवारी रोजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या परिवार संवाद यात्रेनिमित्ताने सभा घेण्यात आली होती. सभेतच राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर आल्याने यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी वृत्त प्रकाशित केले, त्यामुळे राज्याचे संघटन सचिव रवी राठी यांचे पित्त खवळले. त्यांनी प्रसारमाध्यमांनाच खोटे पाडण्याचा प्रयत्न करून अर्वाच्य भाषेत वक्तव्य केले.

८ फेब्रुवारी रोजी रवी राठी यांनी फेसबुक लाइव्ह येऊन असला प्रकार झाला नसल्याचे सांगत थेट प्रसारमाध्यमावरच त्यांची जीभ घसरली. ६ फेब्रुवारी रोजी जयंत पाटील यांच्या समोर शहर अध्यक्ष राम कोरडे हे रवी राठी यांच्याविरुद्ध आक्रमक झाले होते. मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर ४१ हजार मते मिळविल्याचे सांगताच राम कोरडे व इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर राठी यांनी क्षणात पाणी फेरल्याने संतप्त झालेल्या राम कोरडे यांनी यावर मला बोलायचे आहे, असे जयंत पाटील यांना सांगताच त्यांनी राम कोरडे यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीधर कांबे यांनीही जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्याविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे राष्ट्रवादीतील धुसफूस व गटबाजी चव्हाट्यावर आली. झाल्या प्रकाराचे विस्तृत विश्लेषण प्रसारमाध्यमांनी मांडले. यामुळे रवी राठी यांचे पित्त खवळले. त्यांनी फेसबुक लाइव्ह येऊन झाला प्रकार दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी पत्रकारांचे उट्टे-उणे काढून चिरीमिरीच्या पत्रकारांनी न घडलेला प्रकार प्रसिद्ध केल्याचे म्हटले आहे. वास्तविक शेकडो उपस्थितांसमोर घडलेला सत्य प्रकार प्रसारमाध्यमांनी वाचकांसमोर आणला. प्रसारमाध्यमावर चिडलेल्या रवी राठींना अनेक नेत्यांच्या व जनसमुदायासमोर घडलेला प्रकार पचनी पडला नसल्याने त्यांची चिडचिड वाढली आहे. उपस्थित जनसमुदायाला व पत्रकारांना खोटारडे ठरविण्याचा प्रकार या माध्यमातून केल्याने ते जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत असल्याचे स्पष्ट होते. या संदर्भात रवी राठी यांनी प्रसारमाध्यमांची माफी मागावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.