शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ निसर्गनिर्मित; पण टंचाई मानवनिर्मित!

By admin | Updated: September 10, 2015 02:21 IST

जी.श्रीकांत यांचे मत; शहरात पाणीपुरवठय़ाचे हवे योग्य नियोजन.

अकोला: कमी पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती निसर्गनिर्मित आहे; पण टंचाई परिस्थिती सर्वस्वी मानवनिर्मित आहे, असे मत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बुधवारी व्यक्त केले. ह्यलोकमतह्णच्यावतीने आयोजित ह्यसंवादह्ण उपक्रमांतर्गत ते बोलत होते. कमी पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. कमी पावसामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती निसर्गनिर्मित आहे; मात्र उपलब्ध पाण्याचा योग्य वापर झाला पाहिजे. उपलब्ध पाण्याचा योग्यरीत्या वापर होत नसल्याने निर्माण होणारी पाणीटंचाईची परिस्थिती ही मानवनिर्मित आहे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणी आरक्षण सप्टेंबरअखेर निश्‍चित होणार आहे. तथापि महान येथील काटेपूर्णा धरणामधून अकोला शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जे पाणी घेतले जाते; त्यापैकी ६0 टक्के पाण्याची जलवाहिन्यांच्या दुरवस्थेमुळे गळती होते. त्यामुळे शहरात भेडसावणारी पाणीटंचाई ही मानवनिर्मितच म्हणावी लागेल, असे मत व्यक्त करतानाच, पाणीपुरवठय़ाचे योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. शहरात योग्य नियोजनाअभावी निर्माण होणार्‍या पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर कुठे जलवाहिन्या नाहीत आणि कुठे-कुठे पाणीपुरवठा कमी होतो, यासंदर्भात नगरसेवकांकडून माहिती मागविण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. शहरातील नागरिकांना २४ तास पिण्याचे पाणी मिळावे, हे आपले स्वप्न असून, त्या दृष्टीने उपलब्ध पाणीसाठय़ानुसार पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्यात येणार आहे. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) देखील झाले पाहिजे. ह्यरेन वॉटर हार्वेस्टिंगह्ण झाल्यास भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल आणि त्याद्वारे पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल, असेही जी.श्रीकांत म्हणाले. ब्रिटिशकाळात अकोला शहराला कापशी तलावातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. सध्या कापशी तलावाची पुरती दुरवस्था झाली असून, या तलावाच्या विकासाचे काम करून, त्यामधून शहराला पाणीपुरवठा करण्याची उपाययोजना करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळ निवारणासाठी 'जलयुक्त शिवार' प्रभावी अभियान!

    कमी पावसामुळे निर्माण होणार्‍या दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत मुरविणे-जिरविण्याच्या उपाययोजना अभियानांतर्गत करण्यात येत आहेत. त्यामुळे दुष्काळ निवारणासाठी 'जलयुक्त शिवार' अभियान प्रभावी उपाययोजना ठरत असल्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी सांगितले.

चारा टंचाई निवारणाचे नियोजन!

        जिल्ह्यात उपलब्ध होणारा चारा आणि त्या तुलनेत पशुधनाचे प्रमाण लक्षात घेता, जिल्ह्यात चारा टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. तथापि चारा टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास ती निवारणासाठी उपाययोजनांचे नियोजन तयार करण्यात येणार असल्याची ग्वाही जी.श्रीकांत यांनी दिली.