शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

दुष्काळ निसर्गनिर्मित; पण टंचाई मानवनिर्मित!

By admin | Updated: September 10, 2015 02:21 IST

जी.श्रीकांत यांचे मत; शहरात पाणीपुरवठय़ाचे हवे योग्य नियोजन.

अकोला: कमी पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती निसर्गनिर्मित आहे; पण टंचाई परिस्थिती सर्वस्वी मानवनिर्मित आहे, असे मत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बुधवारी व्यक्त केले. ह्यलोकमतह्णच्यावतीने आयोजित ह्यसंवादह्ण उपक्रमांतर्गत ते बोलत होते. कमी पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. कमी पावसामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती निसर्गनिर्मित आहे; मात्र उपलब्ध पाण्याचा योग्य वापर झाला पाहिजे. उपलब्ध पाण्याचा योग्यरीत्या वापर होत नसल्याने निर्माण होणारी पाणीटंचाईची परिस्थिती ही मानवनिर्मित आहे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणी आरक्षण सप्टेंबरअखेर निश्‍चित होणार आहे. तथापि महान येथील काटेपूर्णा धरणामधून अकोला शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जे पाणी घेतले जाते; त्यापैकी ६0 टक्के पाण्याची जलवाहिन्यांच्या दुरवस्थेमुळे गळती होते. त्यामुळे शहरात भेडसावणारी पाणीटंचाई ही मानवनिर्मितच म्हणावी लागेल, असे मत व्यक्त करतानाच, पाणीपुरवठय़ाचे योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. शहरात योग्य नियोजनाअभावी निर्माण होणार्‍या पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर कुठे जलवाहिन्या नाहीत आणि कुठे-कुठे पाणीपुरवठा कमी होतो, यासंदर्भात नगरसेवकांकडून माहिती मागविण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. शहरातील नागरिकांना २४ तास पिण्याचे पाणी मिळावे, हे आपले स्वप्न असून, त्या दृष्टीने उपलब्ध पाणीसाठय़ानुसार पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्यात येणार आहे. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) देखील झाले पाहिजे. ह्यरेन वॉटर हार्वेस्टिंगह्ण झाल्यास भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल आणि त्याद्वारे पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल, असेही जी.श्रीकांत म्हणाले. ब्रिटिशकाळात अकोला शहराला कापशी तलावातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. सध्या कापशी तलावाची पुरती दुरवस्था झाली असून, या तलावाच्या विकासाचे काम करून, त्यामधून शहराला पाणीपुरवठा करण्याची उपाययोजना करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळ निवारणासाठी 'जलयुक्त शिवार' प्रभावी अभियान!

    कमी पावसामुळे निर्माण होणार्‍या दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत मुरविणे-जिरविण्याच्या उपाययोजना अभियानांतर्गत करण्यात येत आहेत. त्यामुळे दुष्काळ निवारणासाठी 'जलयुक्त शिवार' अभियान प्रभावी उपाययोजना ठरत असल्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी सांगितले.

चारा टंचाई निवारणाचे नियोजन!

        जिल्ह्यात उपलब्ध होणारा चारा आणि त्या तुलनेत पशुधनाचे प्रमाण लक्षात घेता, जिल्ह्यात चारा टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. तथापि चारा टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास ती निवारणासाठी उपाययोजनांचे नियोजन तयार करण्यात येणार असल्याची ग्वाही जी.श्रीकांत यांनी दिली.