शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

दुष्काळ निसर्गनिर्मित; पण टंचाई मानवनिर्मित!

By admin | Updated: September 10, 2015 02:21 IST

जी.श्रीकांत यांचे मत; शहरात पाणीपुरवठय़ाचे हवे योग्य नियोजन.

अकोला: कमी पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती निसर्गनिर्मित आहे; पण टंचाई परिस्थिती सर्वस्वी मानवनिर्मित आहे, असे मत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बुधवारी व्यक्त केले. ह्यलोकमतह्णच्यावतीने आयोजित ह्यसंवादह्ण उपक्रमांतर्गत ते बोलत होते. कमी पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. कमी पावसामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती निसर्गनिर्मित आहे; मात्र उपलब्ध पाण्याचा योग्य वापर झाला पाहिजे. उपलब्ध पाण्याचा योग्यरीत्या वापर होत नसल्याने निर्माण होणारी पाणीटंचाईची परिस्थिती ही मानवनिर्मित आहे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणी आरक्षण सप्टेंबरअखेर निश्‍चित होणार आहे. तथापि महान येथील काटेपूर्णा धरणामधून अकोला शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जे पाणी घेतले जाते; त्यापैकी ६0 टक्के पाण्याची जलवाहिन्यांच्या दुरवस्थेमुळे गळती होते. त्यामुळे शहरात भेडसावणारी पाणीटंचाई ही मानवनिर्मितच म्हणावी लागेल, असे मत व्यक्त करतानाच, पाणीपुरवठय़ाचे योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. शहरात योग्य नियोजनाअभावी निर्माण होणार्‍या पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर कुठे जलवाहिन्या नाहीत आणि कुठे-कुठे पाणीपुरवठा कमी होतो, यासंदर्भात नगरसेवकांकडून माहिती मागविण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. शहरातील नागरिकांना २४ तास पिण्याचे पाणी मिळावे, हे आपले स्वप्न असून, त्या दृष्टीने उपलब्ध पाणीसाठय़ानुसार पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्यात येणार आहे. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) देखील झाले पाहिजे. ह्यरेन वॉटर हार्वेस्टिंगह्ण झाल्यास भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल आणि त्याद्वारे पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल, असेही जी.श्रीकांत म्हणाले. ब्रिटिशकाळात अकोला शहराला कापशी तलावातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. सध्या कापशी तलावाची पुरती दुरवस्था झाली असून, या तलावाच्या विकासाचे काम करून, त्यामधून शहराला पाणीपुरवठा करण्याची उपाययोजना करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळ निवारणासाठी 'जलयुक्त शिवार' प्रभावी अभियान!

    कमी पावसामुळे निर्माण होणार्‍या दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत मुरविणे-जिरविण्याच्या उपाययोजना अभियानांतर्गत करण्यात येत आहेत. त्यामुळे दुष्काळ निवारणासाठी 'जलयुक्त शिवार' अभियान प्रभावी उपाययोजना ठरत असल्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी सांगितले.

चारा टंचाई निवारणाचे नियोजन!

        जिल्ह्यात उपलब्ध होणारा चारा आणि त्या तुलनेत पशुधनाचे प्रमाण लक्षात घेता, जिल्ह्यात चारा टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. तथापि चारा टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास ती निवारणासाठी उपाययोजनांचे नियोजन तयार करण्यात येणार असल्याची ग्वाही जी.श्रीकांत यांनी दिली.