शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

जनता भाजी बाजारातील व्यावसायिकांना बजावल्या नाेटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:18 IST

महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी जनता भाजी बाजारात प्रवेश करणाऱ्या मार्गावर भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याची सबब पुढे करीत त्यांना ...

महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी जनता भाजी बाजारात प्रवेश करणाऱ्या मार्गावर भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याची सबब पुढे करीत त्यांना हुसकावण्याच्या कारवाइला प्रारंभ केला हाेता़ त्यानंतर शहरात काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जनता भाजी बाजारात भाजीपाला व फळ विक्री तसेच हर्रासी करण्यावर निर्बंध लादण्यात आले़ यादरम्यान, अचानक बाजारातील सुमारे ६०० पेक्षा अधिक व्यावसायिकांना त्यांच्या दुकानांची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले़ याप्रकरणी व्यावसायिकांनी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत़ शहरावर काेराेनाचे संकट घाेंगावत असताना प्रशासनाने व्यावसायिकांना सुनावणीसाठी हजर राहण्याच्या नाेटिसा बजावल्या आहेत़

कडक निर्बंध असताना सुनावणी कशी?

काेराेनाची साखळी खंडित करण्याच्या उद्देशातून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत़ जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करीत मनपाने २४ व २५ मे राेजी सुनावणीसाठी व्यावसायिकांना नाेटिसा दिल्या आहेत़ मनपात व्यावसायिकांच्या गर्दीमुळे काेराेनाच्या संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही़

८ जून राेजी न्यायालयात सुनावणी

याप्रकरणी बहुतांश सर्वच व्यावसायिकांनी स्थानिक दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत़ याविषयी ८ जून राेजी न्यायालयात सुनावणी हाेणार आहे़ न्यायालयात बाजू मांडल्यानंतर न्यायालयाची भूमिका समजून घेण्यापूर्वीच मनपाकडून दुकाने हटविण्यासाठी सुनावणी घेतली जात असल्याने प्रशासनाच्या हेतूवर शंका उपस्थित हाेत आहेत़

जाेपर्यंत जनता भाजी बाजारातील व्यावसायिकांना पर्यायी जागा दिल्या जात नाही, किंवा यावर ठाेस ताेडगा निघत नाही,ताेपर्यंत मनपाच्या काेणत्याही कार्यवाहीला आमचा तीव्र विराेध राहणार आहे़ त्यावेळी निर्माण हाेणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेला आयुक्त जबाबदार राहतील़

- साजीद खान पठाण, विराेधी पक्षनेता, मनपा