शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

एरंडीसंदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने घेतली दखल

By admin | Updated: March 9, 2015 01:42 IST

राज्य जैवविविधता मंडळाच्या संचालकांना नोटीस.

बुलडाणा : होळी करण्याच्या जुन्या प्रथेतून जैवविविधतेचा महत्वाचा भाग असलेल्या एरंडीच्या झाडांनाच आपण नष्ट करतोय का ? अशी विचारणा राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने राज्य शासनाच्या जैवविविधता मंडळाकडे ६ मार्च रोजी (स्टेट बायो-डायव्हरसिटी बोर्ड) केली आहे. होळीच्या दिवशी वनऔषधी म्हणून उपयोगात येणार्‍या एरंडीची मोठय़ा प्रमाणात कत्तल होत असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्ण ने ४ मार्च रोजी प्रकाशित करुन शासन व पर्यावरणप्रेमींचे याकडे लक्ष वेधले होते हे विशेष. लोकमतच्या वृत्ताची दखल घेत पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत पुणे येथील अँड. असीम सरोदे, अँड. विंदा विलास राऊत-महाजन, अँड. सचिन विवेक गुप्ते, अँड.अलका बबलादी, अँड. स्मिता सरोदे-सिंगलकर, अँड. सविता खोटरे, अँड. रोशनी वानोड यांनी एकत्रितपणे जैवविविधता जपण्याचा विचार अधोरेखित करण्यासाठी एरंडीच्या झाडांबाबतची याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेत महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभाग, राज्य जैवविविधता मंडळ तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या याचिकेच्या सुनावणीनंतर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे न्या. विकास किनगांवकर व डॉ.अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने राज्य जैवविविधता मंडळाच्या संचालकांना शुक्रवारी ही नोटीस जारी केलीे. महाराष्ट्रात ९ हजार हेक्टर क्षेत्रात असलेली बहुमुल्य वनऔषधी एरंडी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेताच्या बांधावर दुष्काळ प्रतिरोधक आणि कीडनाशक म्हणून लावण्यात येणारी तसेच राज्य शासनाला वर्षाला २ कोटींचे उत्पन्न मिळवून देणार्‍या एरंडीच्या झाडांचा होळीच्या दिवशी करण्यात येणारा वापर जरी सदर पर्यावरण याचिकेचा विषय असला तरी एरंडीच्या अस्तित्वाबाबतचा प्रश्न व्यापकपणे मांडण्यात आला आहे. जैवविविधता कायदा २00२ च्या कलम २२ नुसार राज्य सरकारने राज्य जैवविविधता मंडळ स्थापन करणे आवश्यक आहे. त्यानुसार महाराष्ट्रात मागील ४ वर्षापासून जैवविविधता मंडळ स्थापन करण्यात आले आहे. परंतु हे मंडळ कार्यरत आहे की, नाही संशोधनाचा विषय असल्याचे याचिकेत म्हटले आहे. जैवविविधता कायदा २00२ च्या कलम २४ नुसार राज्य जैवविविधता मंडळाने जैवविविधता नष्ट होणार्‍या कृतींना आळा घालणे आणि जैवविविधता संवर्धनासाठी काम करणे अपेक्षीत आहे. परंतु तशा पद्धतीचेही काम होताना दिसत नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते अँड. असीम सरोदे यांनी म्हटले.

*असे आहे एरंडीचे महत्व

      कोरडवाहू शेताच्या बांधावर तसेच बागायती क्षेत्रात ऊस, मिरची, पपई, द्राक्ष, वांगी, केळी इ. मुख्य पिकाभोवती कीडनाशक म्हणून तसेच पारंपारिक औषधी तयार करण्यासाठी एरंडीचा वापर केला जातो. एरंड या वनस्पतीच्या बीया, फुले, साल, मुळी व लाकूड सर्व काही अत्यंत उपयुक्त आहे. एरंडी वनऔषधीमुळे शहरातील वातरोग, उदावर्त, कफ, ज्वर, खोकला, उदर, सूज, शूळ, कंबर, वस्ति, मस्तक यातील शूल दमा अनाह, कोड, गुल्म, प्लीहा, आम्लपित्त प्रमेह, उष्णता, वातरक्त, मेद, वृषण वृद्धी, रक्तदोष, अरुचि, कृमि, अर्श, मुत्रकूच्छ यांचा नाश होतो.