शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

एरंडीसंदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने घेतली दखल

By admin | Updated: March 9, 2015 01:42 IST

राज्य जैवविविधता मंडळाच्या संचालकांना नोटीस.

बुलडाणा : होळी करण्याच्या जुन्या प्रथेतून जैवविविधतेचा महत्वाचा भाग असलेल्या एरंडीच्या झाडांनाच आपण नष्ट करतोय का ? अशी विचारणा राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने राज्य शासनाच्या जैवविविधता मंडळाकडे ६ मार्च रोजी (स्टेट बायो-डायव्हरसिटी बोर्ड) केली आहे. होळीच्या दिवशी वनऔषधी म्हणून उपयोगात येणार्‍या एरंडीची मोठय़ा प्रमाणात कत्तल होत असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्ण ने ४ मार्च रोजी प्रकाशित करुन शासन व पर्यावरणप्रेमींचे याकडे लक्ष वेधले होते हे विशेष. लोकमतच्या वृत्ताची दखल घेत पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत पुणे येथील अँड. असीम सरोदे, अँड. विंदा विलास राऊत-महाजन, अँड. सचिन विवेक गुप्ते, अँड.अलका बबलादी, अँड. स्मिता सरोदे-सिंगलकर, अँड. सविता खोटरे, अँड. रोशनी वानोड यांनी एकत्रितपणे जैवविविधता जपण्याचा विचार अधोरेखित करण्यासाठी एरंडीच्या झाडांबाबतची याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेत महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभाग, राज्य जैवविविधता मंडळ तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या याचिकेच्या सुनावणीनंतर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे न्या. विकास किनगांवकर व डॉ.अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने राज्य जैवविविधता मंडळाच्या संचालकांना शुक्रवारी ही नोटीस जारी केलीे. महाराष्ट्रात ९ हजार हेक्टर क्षेत्रात असलेली बहुमुल्य वनऔषधी एरंडी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेताच्या बांधावर दुष्काळ प्रतिरोधक आणि कीडनाशक म्हणून लावण्यात येणारी तसेच राज्य शासनाला वर्षाला २ कोटींचे उत्पन्न मिळवून देणार्‍या एरंडीच्या झाडांचा होळीच्या दिवशी करण्यात येणारा वापर जरी सदर पर्यावरण याचिकेचा विषय असला तरी एरंडीच्या अस्तित्वाबाबतचा प्रश्न व्यापकपणे मांडण्यात आला आहे. जैवविविधता कायदा २00२ च्या कलम २२ नुसार राज्य सरकारने राज्य जैवविविधता मंडळ स्थापन करणे आवश्यक आहे. त्यानुसार महाराष्ट्रात मागील ४ वर्षापासून जैवविविधता मंडळ स्थापन करण्यात आले आहे. परंतु हे मंडळ कार्यरत आहे की, नाही संशोधनाचा विषय असल्याचे याचिकेत म्हटले आहे. जैवविविधता कायदा २00२ च्या कलम २४ नुसार राज्य जैवविविधता मंडळाने जैवविविधता नष्ट होणार्‍या कृतींना आळा घालणे आणि जैवविविधता संवर्धनासाठी काम करणे अपेक्षीत आहे. परंतु तशा पद्धतीचेही काम होताना दिसत नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते अँड. असीम सरोदे यांनी म्हटले.

*असे आहे एरंडीचे महत्व

      कोरडवाहू शेताच्या बांधावर तसेच बागायती क्षेत्रात ऊस, मिरची, पपई, द्राक्ष, वांगी, केळी इ. मुख्य पिकाभोवती कीडनाशक म्हणून तसेच पारंपारिक औषधी तयार करण्यासाठी एरंडीचा वापर केला जातो. एरंड या वनस्पतीच्या बीया, फुले, साल, मुळी व लाकूड सर्व काही अत्यंत उपयुक्त आहे. एरंडी वनऔषधीमुळे शहरातील वातरोग, उदावर्त, कफ, ज्वर, खोकला, उदर, सूज, शूळ, कंबर, वस्ति, मस्तक यातील शूल दमा अनाह, कोड, गुल्म, प्लीहा, आम्लपित्त प्रमेह, उष्णता, वातरक्त, मेद, वृषण वृद्धी, रक्तदोष, अरुचि, कृमि, अर्श, मुत्रकूच्छ यांचा नाश होतो.