शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

एरंडीसंदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने घेतली दखल

By admin | Updated: March 9, 2015 01:42 IST

राज्य जैवविविधता मंडळाच्या संचालकांना नोटीस.

बुलडाणा : होळी करण्याच्या जुन्या प्रथेतून जैवविविधतेचा महत्वाचा भाग असलेल्या एरंडीच्या झाडांनाच आपण नष्ट करतोय का ? अशी विचारणा राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने राज्य शासनाच्या जैवविविधता मंडळाकडे ६ मार्च रोजी (स्टेट बायो-डायव्हरसिटी बोर्ड) केली आहे. होळीच्या दिवशी वनऔषधी म्हणून उपयोगात येणार्‍या एरंडीची मोठय़ा प्रमाणात कत्तल होत असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्ण ने ४ मार्च रोजी प्रकाशित करुन शासन व पर्यावरणप्रेमींचे याकडे लक्ष वेधले होते हे विशेष. लोकमतच्या वृत्ताची दखल घेत पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत पुणे येथील अँड. असीम सरोदे, अँड. विंदा विलास राऊत-महाजन, अँड. सचिन विवेक गुप्ते, अँड.अलका बबलादी, अँड. स्मिता सरोदे-सिंगलकर, अँड. सविता खोटरे, अँड. रोशनी वानोड यांनी एकत्रितपणे जैवविविधता जपण्याचा विचार अधोरेखित करण्यासाठी एरंडीच्या झाडांबाबतची याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेत महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभाग, राज्य जैवविविधता मंडळ तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या याचिकेच्या सुनावणीनंतर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे न्या. विकास किनगांवकर व डॉ.अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने राज्य जैवविविधता मंडळाच्या संचालकांना शुक्रवारी ही नोटीस जारी केलीे. महाराष्ट्रात ९ हजार हेक्टर क्षेत्रात असलेली बहुमुल्य वनऔषधी एरंडी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेताच्या बांधावर दुष्काळ प्रतिरोधक आणि कीडनाशक म्हणून लावण्यात येणारी तसेच राज्य शासनाला वर्षाला २ कोटींचे उत्पन्न मिळवून देणार्‍या एरंडीच्या झाडांचा होळीच्या दिवशी करण्यात येणारा वापर जरी सदर पर्यावरण याचिकेचा विषय असला तरी एरंडीच्या अस्तित्वाबाबतचा प्रश्न व्यापकपणे मांडण्यात आला आहे. जैवविविधता कायदा २00२ च्या कलम २२ नुसार राज्य सरकारने राज्य जैवविविधता मंडळ स्थापन करणे आवश्यक आहे. त्यानुसार महाराष्ट्रात मागील ४ वर्षापासून जैवविविधता मंडळ स्थापन करण्यात आले आहे. परंतु हे मंडळ कार्यरत आहे की, नाही संशोधनाचा विषय असल्याचे याचिकेत म्हटले आहे. जैवविविधता कायदा २00२ च्या कलम २४ नुसार राज्य जैवविविधता मंडळाने जैवविविधता नष्ट होणार्‍या कृतींना आळा घालणे आणि जैवविविधता संवर्धनासाठी काम करणे अपेक्षीत आहे. परंतु तशा पद्धतीचेही काम होताना दिसत नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते अँड. असीम सरोदे यांनी म्हटले.

*असे आहे एरंडीचे महत्व

      कोरडवाहू शेताच्या बांधावर तसेच बागायती क्षेत्रात ऊस, मिरची, पपई, द्राक्ष, वांगी, केळी इ. मुख्य पिकाभोवती कीडनाशक म्हणून तसेच पारंपारिक औषधी तयार करण्यासाठी एरंडीचा वापर केला जातो. एरंड या वनस्पतीच्या बीया, फुले, साल, मुळी व लाकूड सर्व काही अत्यंत उपयुक्त आहे. एरंडी वनऔषधीमुळे शहरातील वातरोग, उदावर्त, कफ, ज्वर, खोकला, उदर, सूज, शूळ, कंबर, वस्ति, मस्तक यातील शूल दमा अनाह, कोड, गुल्म, प्लीहा, आम्लपित्त प्रमेह, उष्णता, वातरक्त, मेद, वृषण वृद्धी, रक्तदोष, अरुचि, कृमि, अर्श, मुत्रकूच्छ यांचा नाश होतो.