शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

नरसिंग महाराज पालखी सोहळा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 11:51 IST

गत ३५ वर्षांपासून पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीला जाणारी नरसिंग महाराजाची पालखी यावर्षी खंडित झाली आहे.

- विजय शिंदे लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : गत ३५ वर्षांपासून पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीला जाणारी नरसिंग महाराजाची पालखी यावर्षी खंडित झाली आहे.अकोला जिल्ह्यातील अकोट (जळगाव नहाटे) येथील नरसिंग महाराज हे उपजत ज्ञानी, गीतोक्त १८ ज्ञानलक्षणे व २६ दैवी संपत्तीयुक्त, स्थितप्रज्ञ, महासिद्ध योगी होते. लहानपणापासूनच पांडुरंगाच्या भक्तीत वेडे असलेले नरसिंग महाराज भक्तांना एका क्षणात पंढरीस नेत. शेतात जनावरे चारत असताना सोबत्यांना गुरे सांभाळण्यास सांगून पंढरपूरवरून काल्याचा प्रसाद घेऊन येत, असे नरसिंग महाराज लीलामृत ग्रंथात नमूद आहे. एकदा आषाढी एकादशीच्या वेळेला नरसिंग महाराज हे आपले परमभक्त गणोबा नाईक यांच्या सोबत पंढरपूरला गेले होते. त्या ठिकाणी मंदिरात एका नास्तिकाने पांडुरंगाची मूर्ती नष्ट करण्याच्या उद्देशाने गरूड खांबापासून एक लोखंडी गोळा पांडुरंगाच्या दिशेने फेकून मारला; परंतु चुकून तो गोळा पांडुरंगाच्या पायावर पडल्याने त्यामधून भळाभळा रक्त वाहू लागले. पांडुरंगाच्या पायाला जखम झाल्याने वारकरी मंडळीत घबराट व कुतूहल निर्माण झाले. वारकरी रडू लागले. ही घटना नरसिंग महाराज यांना कळताच त्यांनी मंदिरात धाव घेऊन वारकऱ्यांना देव अभंग आहे, तो कसा भंगेल, असे सांगून आपण पांडुरंगाच्या पायाला औषधपट्टी लावू, तो बरा होईल, असे सांगू लागले; परंतु नरसिंग महाराजांच्या अंगावरील नुसती लंगोटी व गळ्यातील फेट्याची चिंधी पाहून वारकरी भक्तांनी त्यांना वेड्यात काढले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागले; परंतु नरसिंग महाराजांनी पांडुरंगाच्या पायावर तुळशी बुक्का लावून पट्टी बांधून जखम बरी होण्यासाठी प्रार्थना केली आणि क्षणात पायातील रक्ताची धार बंद होऊन जखम बरी झाली, अशी अख््यायिका आहेत. विशेष म्हणजे याबाबतचा उल्लेख १८७० च्या शासकीय गॅझेटिअरमध्ये नमूद आहे. त्यामुळे अकोट परिसरातील विठ्ठलाचा वैद्य म्हणून नरसिंग महाराज यांचा उल्लेख केल्या जातो.या प्रसंगाची नोंद १८७० च्या शासकीय गॅझेटिअर व १९१० मध्ये प्रकाशित झालेल्या जुन्या अकोला डिस्ट्रिक्ट गॅझेटिअरमध्ये आहे. तसेच संत वासुदेव महाराज यांनी लिहिलेल्या नरसिंग महाराज लीलामृत व ज्ञानेशप्रसाद लिखित श्री वासुदेव ज्ञानामृतमध्ये या घटनेची नोंद घेण्यात आली आहे. अकोट येथील मंदिरात पांडुरंग-रुखमाईच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिराच्या बांधकामाची सुरुवात नरसिंग महाराजांच्या हस्ते झाली. पुढे त्याच ठिकाणी संतश्रेष्ठ नरसिंग महाराजांनी समाधी घेतली. यावेळी खुद्द संतश्रेष्ठ गजानन महाराज उपस्थित होते. आजही पांडुरंग-रुखमाई मूर्तीची व त्यापुढील महाराजांच्या समाधीचे पूजन, दर्शन घेण्यासाठी माहिती असलेलेच वारकरी पंढरपूरची वारी म्हणून आषाढी एकादशीला नरसिंग मंदिरात दर्शनासाठी येतात. मंदिराचे व्यवस्थापक स्व. गुणवंत आसरकर यांनी १९८५ साली नरसिंग महाराज पालखी पायदळ वारी सोहळा सुरू केला. ३५ वर्षांपासून अखंडपणे ही वारी सुरू आहे. यावर्षी कोरोना महामारीमुळे पालखीची वारी खंडित झाली, त्यामुळे संस्थेचे विश्वस्त सतीश आसरकर व इतर भक्त मंदिरात शासनाचे नियमाचे पालन करीत पूजाअर्चा व गोपालकाला करून हा वारी सोहळा पार पाडणार आहे.

टॅग्स :akotअकोटPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा