शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

नरसिंग महाराज पालखी सोहळा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 11:51 IST

गत ३५ वर्षांपासून पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीला जाणारी नरसिंग महाराजाची पालखी यावर्षी खंडित झाली आहे.

- विजय शिंदे लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : गत ३५ वर्षांपासून पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीला जाणारी नरसिंग महाराजाची पालखी यावर्षी खंडित झाली आहे.अकोला जिल्ह्यातील अकोट (जळगाव नहाटे) येथील नरसिंग महाराज हे उपजत ज्ञानी, गीतोक्त १८ ज्ञानलक्षणे व २६ दैवी संपत्तीयुक्त, स्थितप्रज्ञ, महासिद्ध योगी होते. लहानपणापासूनच पांडुरंगाच्या भक्तीत वेडे असलेले नरसिंग महाराज भक्तांना एका क्षणात पंढरीस नेत. शेतात जनावरे चारत असताना सोबत्यांना गुरे सांभाळण्यास सांगून पंढरपूरवरून काल्याचा प्रसाद घेऊन येत, असे नरसिंग महाराज लीलामृत ग्रंथात नमूद आहे. एकदा आषाढी एकादशीच्या वेळेला नरसिंग महाराज हे आपले परमभक्त गणोबा नाईक यांच्या सोबत पंढरपूरला गेले होते. त्या ठिकाणी मंदिरात एका नास्तिकाने पांडुरंगाची मूर्ती नष्ट करण्याच्या उद्देशाने गरूड खांबापासून एक लोखंडी गोळा पांडुरंगाच्या दिशेने फेकून मारला; परंतु चुकून तो गोळा पांडुरंगाच्या पायावर पडल्याने त्यामधून भळाभळा रक्त वाहू लागले. पांडुरंगाच्या पायाला जखम झाल्याने वारकरी मंडळीत घबराट व कुतूहल निर्माण झाले. वारकरी रडू लागले. ही घटना नरसिंग महाराज यांना कळताच त्यांनी मंदिरात धाव घेऊन वारकऱ्यांना देव अभंग आहे, तो कसा भंगेल, असे सांगून आपण पांडुरंगाच्या पायाला औषधपट्टी लावू, तो बरा होईल, असे सांगू लागले; परंतु नरसिंग महाराजांच्या अंगावरील नुसती लंगोटी व गळ्यातील फेट्याची चिंधी पाहून वारकरी भक्तांनी त्यांना वेड्यात काढले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागले; परंतु नरसिंग महाराजांनी पांडुरंगाच्या पायावर तुळशी बुक्का लावून पट्टी बांधून जखम बरी होण्यासाठी प्रार्थना केली आणि क्षणात पायातील रक्ताची धार बंद होऊन जखम बरी झाली, अशी अख््यायिका आहेत. विशेष म्हणजे याबाबतचा उल्लेख १८७० च्या शासकीय गॅझेटिअरमध्ये नमूद आहे. त्यामुळे अकोट परिसरातील विठ्ठलाचा वैद्य म्हणून नरसिंग महाराज यांचा उल्लेख केल्या जातो.या प्रसंगाची नोंद १८७० च्या शासकीय गॅझेटिअर व १९१० मध्ये प्रकाशित झालेल्या जुन्या अकोला डिस्ट्रिक्ट गॅझेटिअरमध्ये आहे. तसेच संत वासुदेव महाराज यांनी लिहिलेल्या नरसिंग महाराज लीलामृत व ज्ञानेशप्रसाद लिखित श्री वासुदेव ज्ञानामृतमध्ये या घटनेची नोंद घेण्यात आली आहे. अकोट येथील मंदिरात पांडुरंग-रुखमाईच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिराच्या बांधकामाची सुरुवात नरसिंग महाराजांच्या हस्ते झाली. पुढे त्याच ठिकाणी संतश्रेष्ठ नरसिंग महाराजांनी समाधी घेतली. यावेळी खुद्द संतश्रेष्ठ गजानन महाराज उपस्थित होते. आजही पांडुरंग-रुखमाई मूर्तीची व त्यापुढील महाराजांच्या समाधीचे पूजन, दर्शन घेण्यासाठी माहिती असलेलेच वारकरी पंढरपूरची वारी म्हणून आषाढी एकादशीला नरसिंग मंदिरात दर्शनासाठी येतात. मंदिराचे व्यवस्थापक स्व. गुणवंत आसरकर यांनी १९८५ साली नरसिंग महाराज पालखी पायदळ वारी सोहळा सुरू केला. ३५ वर्षांपासून अखंडपणे ही वारी सुरू आहे. यावर्षी कोरोना महामारीमुळे पालखीची वारी खंडित झाली, त्यामुळे संस्थेचे विश्वस्त सतीश आसरकर व इतर भक्त मंदिरात शासनाचे नियमाचे पालन करीत पूजाअर्चा व गोपालकाला करून हा वारी सोहळा पार पाडणार आहे.

टॅग्स :akotअकोटPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा