शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

नरनाळा किल्ल्याचा विकास करणार -  बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 16:58 IST

आज अकोट तालुक्यातील शहापुर येथील वनविभागाच्या विश्राम गृहात नरनाळा किल्ल्याचा पर्यटन विकास करण्यासाठी आढावा बैठक आयोजीत केली होती.

अकोला : पर्यटनाला चालना देण्यासाठी नरनाळा किल्ल्यासह परिसराचा विकास करू न ग्राम पर्यटन संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग,सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, महिला व बालविकास,शालेय शिक्षण व कामगार कल्याण राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.आज अकोट तालुक्यातील शहापुर येथील वनविभागाच्या विश्राम गृहात नरनाळा किल्ल्याचा पर्यटन विकास करण्यासाठी आढावा बैठक आयोजीत केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अकोट येथील उपवन संरक्षक (वन्यजीव) टी. बेऊला, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक हनुमंत हेडे, पुरातत्व विभागाचे संरक्षक सहाय्यक संतोष महाजन , सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता गिरीश जोशी, उपविभागीय अधिकारी अकोट रामदास सिद्धभट्टी, उपवन संरक्षक अकोला विभाग विजय माने यांची प्रमुख उपस्थिती होती.पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शेंगाव झ्र नरनाळा झ्र चिखलदरा पर्यटन मार्ग विकसीत करण्यात येणार असल्याचे सांगून पालकमंत्री ना. कडू पुढे म्हणाले की, अमरावती जिल्ह्यातील गावीडगड किल्ला व नरनाळा किल्ला असा मार्ग तयार करण्यात यावा जेणे करून शेंगाव येथील धार्मिक स्थळाला भेट दिल्यानंतर पर्यटक नरनाळा किल्ल्याला भेट देऊन चिखलदरा येथे जाऊ शकेल. यासाठी नरनाळा किल्ला विकास कार्यक्रमसह वनविभाग , पर्यटनविभाग , पुरातत्व विभाग , सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभाग यांनी संयुक्तरित्या अंदाजपत्रक सात दिवसाच्या आत तयार करावे असे निर्देश पालकमंत्री ना. कडू यांनी दिलेत.पुरातत्व विभागासह वनविभागाने नरनाळा किल्ल्याच्या महाकाली व्दार वर विकास करावा. प्रेक्षकांसाठी प्रेक्षकगृह, दुर्बिन स्पॉट लाईटींग व साऊंड शो , पोपटखेड धरणावर नौका विहार , शक्कर तलावर कृत्रीमरित्या धबधबा , नौगज तोफ ते खाली पर्यंत स्काय वॉक, राणी महल ते महाकाली गेट पर्यंत ठिकठिकाणी बांध टाकून पाणि अडविणे यासारखे सोई केल्या तर पर्यटकांचे आकर्षण वाढेल. आणि नरनाळा किल्ल्याच्या सौंदर्यांत भर पडेल असे ते म्हणाले नरनाळा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शहानुर या आदिवासीगावाचा व्यक्तीगत व सामुहिक लाभाच्या योजना राबवून विकास करावा. पर्यंटनामुळे शहानुर गावाचा विकास होऊन स्थानिक लोकांना रोजगार मिळेल असेही ते म्हणाले.पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी नरनाळा किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी सर्वप्रथम महाकालीव्दारला भेट दिली. व महाकाली व्दारच्या विकासासाठी सुचना संबंधीताना दिल्यात. शक्कर तलाव येथे भेट देऊन या तलावात पायडल नौकाद्वारा नौका विहार करणे शक्य आहे का याबाबत शहानिशा करावी तसेच तलावातील पाण्याचा उपयोग करून सौरउर्जेचा वापर करून कृत्रिमरीत्या धबधबा तयार करण्याबाबत सुचना केल्यात. तसेच नौगज तोफ व राणीमहल येथे सुद्धा पालकमंत्री यांनी भेट दिली.शहानूर गाव पालकमंत्री दत्तक ग्राम योजनेत दत्तक घेण्यात येणार असल्याची त्यांनी सांगितले. शहानूर आदिवासी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जंगलातील खाली पडलेल्या लाकडांना एकत्र करून गावातील लोकांसाठी लाकुड बँक तयार करून त्यातून गावातील परिवारांना आवश्यकतेनुसार जळणासाठी लाकुड उपलद्ध करून देण्याच्या सुचना वनविभागाला दिल्यात.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूNarnala Fortनरनाळा किल्ला