शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कठाेर निर्बंध नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:18 IST

अकोला : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून, दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ...

अकोला : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून, दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कठाेर निर्बंध लागू केले आहेत; मात्र प्रत्यक्षात या नियमांचे पालन हाेताना दिसत नाही. दुसरीकडे संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने कोरोना चाचणी करून घेणाऱ्यांची संख्या वाढली असून, शहरातील सर्वच चाचणी केंद्रांवर संदिग्ध रुग्णांची गर्दी होत आहे. चाचणी केंद्रांवर रांगा लागत असल्याने या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडत आहे.

गतवर्षी डिसेंबर महिन्यात उतरणीला लागलेला कोरोनाचा आलेख या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पुन्हा वरच्या दिशेने आगेकूच करीत आहे. शासनमान्य करीत नसले, तरी समूह संसर्ग सदृशस्थिती निर्माण झाली असून, बाधित होणाऱ्यांची दैनंदिन आकडेवारी जुने विक्रम मोडत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हाय रिस्क संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या वाढविण्यावर भर दिला आहे. तसेच निर्बंधही लादले आहेत, या नियमांचे पालन हाेताना दिसत नाही. चित्रपटगृह बंदच आहेत. त्यामुळे तेथे ५० टक्के क्षमतेचा प्रश्नच नाही; शाळा महाविद्यालये बंद आहेत.

चाचणी केंद्र

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आयएमए हॉल, महापालिकेच्या रुग्णालयात विविध तपासणी केंद्रांवर चाचणीसाठी रांगा लागत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याकडे दुर्लक्ष होत आहे. चाचणी केल्यानंतर अहवाल मिळविण्यासाठी कक्षासमोरही दररोजच मोठी रांग लागलेली असते.

विवाह संभारंभ

विवाह समारंभामध्ये केवळ २५ वऱ्हाडीच उपस्थित राहू शकतील असा दंडक आहे. प्रत्यक्षात मात्र विवाह समारंभात पंगती उठताना दिसतात.. काहींनी तर वऱ्हाड्यांना उपस्थितीसाठी वेगवेगळ्या वेळा देऊन नियमांमधून पळवाट शाेधल्याचे चित्र आहे.

अंत्यविधी

केवळ काेराेनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला तर अंत्यविधीसाठी परिवारातील सदस्यच उपस्थित राहत आहेत. इतर ठिकाणी अंत्यविधीसाठी उपस्थिती काही प्रमाणात घटली असली तरी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांपेक्षा जास्तच उपस्थिती दिसून येते.

कार्यालय

सरकारी किंवा खासगी आस्थापनांमध्ये ५० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. मात्र अनेक ठिकाणी सर्वच कर्मचारी काम करताना दिसतात. काही विभागांत रिक्त पदांची संख्या माेठी असल्याने ५० टक्क्यांचा नियम अडचणीचा ठरत असल्याचे म्हणणे आहे.

गृह विलगीकरण

गृह विलगीकरण रुग्णांच्या घरावर फलक लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला हाेता. मात्र एकाही रुग्णाच्या घरावर असा फलक लावण्यात आलेला नाही. पूर्वी रुग्णाच्या घरासमाेर बॅरिकेड लावले जात हाेते, तेसुद्धा आता लावले जात नाहीत.

३०१४ जणांकडून; ६.३९ लाखांचा दंड वसूल !

कोरोना प्रतिबंधक नियमांंचे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यातील तीन हजार १४ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. २२ फेब्रुवारी ते १४ मार्च या २१ दिवसांच्या कालावधीत करण्यात आलेल्या या कारवाईत सहा लाख ३९ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.