शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

‘कॅशलेस’च्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक!

By admin | Updated: April 21, 2017 02:03 IST

अकोला : खरीप हंगामासाठी पीक कर्ज मंजूर झाले; पण ‘एटीएम’मध्ये ‘कॅश’ उपलब्ध नसल्याने, मंजूर झालेल्या पीक कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही.

पीक कर्ज मंजूर; पण रक्कम मिळेनाअकोला : खरीप हंगामासाठी पीक कर्ज मंजूर झाले; पण ‘एटीएम’मध्ये ‘कॅश’ उपलब्ध नसल्याने, मंजूर झालेल्या पीक कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे रोखरहित (कॅशलेस) व्यवहाराच्या नावाखाली पीक कर्जाच्या रकमेसाठी शेतकऱ्यांची होणारी अडवणूक थांबवून कर्जाची रक्कम देण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.सन २०१७-१८ यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँका आणि ग्रामीण बँकमार्फत १ हजार १४० कोटी ५५ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गत १ एप्रिलपासून खरीप पीक कर्ज वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी सभासद असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत १७ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील १७ हजार ७४७ शेतकऱ्यांना १३५ कोटी ६७ लाख २१ हजार रुपयांचे पीक कर्ज मंजूर करण्यात आले. शासनाच्या रोखरहित (कॅशलेस) धोरणानुसार पीक कर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना बियाणे, खते खरेदीसाठी रोख रकमेऐवजी ‘किसान क्रेडिट कार्ड’ दिले जात आहे; परंतु शेतकऱ्यांना शेतीची मशागत, मजुरांना द्यावयाची मजुरी, मुला-मुलींचे लग्न व इतर खर्च भागविण्यासाठी रोख रकमेची गरज असल्याच्या पृष्ठभूमीवर मंजूर झालेल्या पीक कर्जाची रक्कम काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा ‘एटीएम’मध्ये लागत आहेत; मात्र ‘एटीएम’मध्ये पैसे नसल्याने, पीक कर्ज मंजूर झाले असले, तरी रक्कम मिळत नसल्याने खर्च भागविण्यासाठी पैसे कोठून आणणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. या पृष्ठभूमीवर ‘कॅशलेस’च्या नावाखली पीक कर्जाच्या रकमेसाठी शेतकऱ्यांची अडवणूक होत असून, मंजूर करण्यात आलेल्या पीक कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी ‘एटीएम’मध्ये रक्कम उपलब्ध करून कर्जाच्या रकमेमुळे होणारी अडवणूक थांबविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.अनेक शेतकऱ्यांकडे नाही ‘एटीएम कार्ड’!पीक कर्ज मंजूर झालेले शेतकरी कर्जाच्या रकमेसाठी शेतकऱ्यांना ‘एटीएम’मध्ये चकरा माराव्या लागत आहेत; मात्र जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांकडे ‘एटीएम कार्ड’ उपलब्ध नाही. त्यामुळे मंजूर झालेल्या पीक कर्जाची रक्कम काढणार कशी आणि खर्च भागविणार कसा, असा प्रश्न संबंधित शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.‘कॅश’अभावी ‘एटीएम’मध्ये ठणठणाट; शेतकरी हतबल!जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत १७ एप्रिलपर्यंत १३५ कोटी ६७ लाख २१ हजार रुपयांचे खरीप पीक कर्ज मंजूर करण्यात आले. त्यानुसार मंजूर पीक कर्जाची रक्कम काढण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील ४२ ‘एटीएम’मध्ये रांगा लागत आहेत; मात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाची रक्कम देण्यासाठी एटीएममध्ये रक्कम उपलब्ध नाही. ‘कॅश’अभावी ‘एटीएम’मध्ये ठणठणाट असल्याने पीक कर्जाच्या रकमेसाठी शेतकरी हतबल झाला आहे.