शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅशलेस’च्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक!

By admin | Updated: April 21, 2017 02:03 IST

अकोला : खरीप हंगामासाठी पीक कर्ज मंजूर झाले; पण ‘एटीएम’मध्ये ‘कॅश’ उपलब्ध नसल्याने, मंजूर झालेल्या पीक कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही.

पीक कर्ज मंजूर; पण रक्कम मिळेनाअकोला : खरीप हंगामासाठी पीक कर्ज मंजूर झाले; पण ‘एटीएम’मध्ये ‘कॅश’ उपलब्ध नसल्याने, मंजूर झालेल्या पीक कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे रोखरहित (कॅशलेस) व्यवहाराच्या नावाखाली पीक कर्जाच्या रकमेसाठी शेतकऱ्यांची होणारी अडवणूक थांबवून कर्जाची रक्कम देण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.सन २०१७-१८ यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँका आणि ग्रामीण बँकमार्फत १ हजार १४० कोटी ५५ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गत १ एप्रिलपासून खरीप पीक कर्ज वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी सभासद असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत १७ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील १७ हजार ७४७ शेतकऱ्यांना १३५ कोटी ६७ लाख २१ हजार रुपयांचे पीक कर्ज मंजूर करण्यात आले. शासनाच्या रोखरहित (कॅशलेस) धोरणानुसार पीक कर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना बियाणे, खते खरेदीसाठी रोख रकमेऐवजी ‘किसान क्रेडिट कार्ड’ दिले जात आहे; परंतु शेतकऱ्यांना शेतीची मशागत, मजुरांना द्यावयाची मजुरी, मुला-मुलींचे लग्न व इतर खर्च भागविण्यासाठी रोख रकमेची गरज असल्याच्या पृष्ठभूमीवर मंजूर झालेल्या पीक कर्जाची रक्कम काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा ‘एटीएम’मध्ये लागत आहेत; मात्र ‘एटीएम’मध्ये पैसे नसल्याने, पीक कर्ज मंजूर झाले असले, तरी रक्कम मिळत नसल्याने खर्च भागविण्यासाठी पैसे कोठून आणणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. या पृष्ठभूमीवर ‘कॅशलेस’च्या नावाखली पीक कर्जाच्या रकमेसाठी शेतकऱ्यांची अडवणूक होत असून, मंजूर करण्यात आलेल्या पीक कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी ‘एटीएम’मध्ये रक्कम उपलब्ध करून कर्जाच्या रकमेमुळे होणारी अडवणूक थांबविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.अनेक शेतकऱ्यांकडे नाही ‘एटीएम कार्ड’!पीक कर्ज मंजूर झालेले शेतकरी कर्जाच्या रकमेसाठी शेतकऱ्यांना ‘एटीएम’मध्ये चकरा माराव्या लागत आहेत; मात्र जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांकडे ‘एटीएम कार्ड’ उपलब्ध नाही. त्यामुळे मंजूर झालेल्या पीक कर्जाची रक्कम काढणार कशी आणि खर्च भागविणार कसा, असा प्रश्न संबंधित शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.‘कॅश’अभावी ‘एटीएम’मध्ये ठणठणाट; शेतकरी हतबल!जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत १७ एप्रिलपर्यंत १३५ कोटी ६७ लाख २१ हजार रुपयांचे खरीप पीक कर्ज मंजूर करण्यात आले. त्यानुसार मंजूर पीक कर्जाची रक्कम काढण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील ४२ ‘एटीएम’मध्ये रांगा लागत आहेत; मात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाची रक्कम देण्यासाठी एटीएममध्ये रक्कम उपलब्ध नाही. ‘कॅश’अभावी ‘एटीएम’मध्ये ठणठणाट असल्याने पीक कर्जाच्या रकमेसाठी शेतकरी हतबल झाला आहे.