शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

नाले बांधकामाच्या नियाेजनाचा फज्जा; प्रभाग ८ मध्ये तुंबले सांडपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:13 IST

हद्दवाढ क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये मागील चार वर्षांत रस्ते, नाले व जलवाहिनीची कामे करण्यात आल्याचा गवगवा केला जात ...

हद्दवाढ क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये मागील चार वर्षांत रस्ते, नाले व जलवाहिनीची कामे करण्यात आल्याचा गवगवा केला जात असला तरी प्रत्यक्षात दर्जाहीन रस्त्यांचे पितळ उघडे पडले आहे. मनपाच्या बांधकाम विभागाने रस्ते, नाल्यांचे याेग्यरित्या नियाेजन न केल्यामुळे ठिकठिकाणी सांडपाण्याची समस्या निर्माण झाली आहे. अनेक भागात रस्त्याच्या उंचीपेक्षा नाल्यांची उंची वाढविण्यात आल्याचा अजब प्रकार दिसून येताे. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा न हाेता पावसाळ्यात नाल्यांमधील घाण पाणी रहिवाशांच्या अंगणात शिरत असल्याचे महिलांनी सांगितले. यामुळे पावसाळ्यातच नव्हे तर नागरिकांना बाराही महिने दुर्गंधी असलेल्या घाण पाण्याचा सामना करावा लागत आहे. प्रभागात भाजपचे तीन नगरसेवक असून ते नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे ढुंकूनही पाहत नसल्याचा आराेप महिला वर्गातून केला जात आहे.

थातूरमातूर नालेसफाई

पावसाळ्याच्या ताेंडावर मनपाने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने मेहरे नगर, बाळापूर राेड ते गाेकर्णा पार्कपर्यंत येणाऱ्या मुख्य नाल्याची थातूरमातूर सफाई केली. नाले सफाई हाेत नसल्यामुळे लक्ष्मी नगर, अमरप्रीत काॅलनी, बालाजी नगर, संताजी नगर, पाेलिस वसाहत, गजानन नगर गल्ली क्रमांक १, मनाेरथ काॅलनी, गंगा नगर, कायनात काॅलनी, काळे नगर, साइ नगर, नारायण नगरमध्ये सांडपाण्याची कायम आहे.

नाल्यांचे बांधकाम करताना नियाेजन न केल्यामुळे नाल्यांमधील सांडपाण्याचा निचरा हाेत नाही. पावसाळ्यात नाल्यांमधील पाणी अंगणात शिरते. नगरसेवक फिरकतही नाहीत.

-नंदा राऊत, रहिवासी

आमच्या भागात नाले सफाईकडे काेणी ढुंकूनही पाहत नसल्याने नाल्या घाणीने तुडुंब साचल्या आहेत. पावसाळ्यात या समस्येत अधिकच वाढ हाेते. मनपा प्रशासन गाढ झाेपेत आहे.

- विमल नंदनवार, रहिवासी

माेठ्या नाल्यांचे बांधकाम करताना पाण्याचा प्रवाह काेणत्या दिशेने जाईल, याकडे दुर्लक्ष करीत थातूरमातूरपणे नाले बांधण्यात आले. मुख्य रस्त्यावरील क्वालिटी दुकानापासून ते दळवी यांच्या घरापर्यंत नाल्याचा उलटा प्रवास केला. परिणामी सांडपाणी तुंबले आहे.

-दिनेश सराेदे, रहिवासी

हद्दवाढ केल्यानंतर मनपाने केवळ टॅक्सच्या रकमेत वाढ केली. त्याबदल्यात स्वच्छतेच्या कामांचा पुरता बाेजवारा उडाला असून यामुळे लहान मुलांच्या आराेग्याला धाेका निर्माण झाला आहे.

- गणेश गांडाळ, रहिवासी