शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

नाबार्डच्या प्राधान्य क्षेत्र कर्ज वितरण आराखड्यास मंजुरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:51 IST

जिल्ह्यातील बँक प्रतिनिधींचा समावेश असलेल्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीची (डीएलसीसी) बैठक गुरुवार, १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये ‘नाबार्ड’मार्फत सन २0१८-१९ साठी तयार करण्यात आलेल्या प्राधान्य क्षेत्र कर्ज वितरण आराखड्यावर चर्चा झाली. तसेच या समितीने १७९६ कोटी ५२ लाख रुपयांच्या आराखड्यास मंजुरी प्रदान केली. 

ठळक मुद्दे१७९६ कोटींचा आराखडासल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील बँक प्रतिनिधींचा समावेश असलेल्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीची (डीएलसीसी) बैठक गुरुवार, १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये ‘नाबार्ड’मार्फत सन २0१८-१९ साठी तयार करण्यात आलेल्या प्राधान्य क्षेत्र कर्ज वितरण आराखड्यावर चर्चा झाली. तसेच या समितीने १७९६ कोटी ५२ लाख रुपयांच्या आराखड्यास मंजुरी प्रदान केली. याप्रसंगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे एस.पी. सिंग, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक विजय खंडरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक प्रदीप पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्याम कडेकर यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.नाबार्डचे खंडरे यांनी सन २0१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता प्राधान्य क्षेत्रांमध्ये कर्जवाटप करण्यासाठी नाबार्डमार्फत तयार करण्यात आलेल्या आराखड्याची माहिती दिली. त्यानुसार खरीप व रब्बी हंगामातील पीक कर्ज वाटपासाठी १,४३0 कोटी १८ लक्ष रुपयांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. तसेच शेतीपूरक उपक्रम, अन्न प्रक्रिया, फळबाग लागवड, शिक्षण, घरकुल यासह इतर क्षेत्रांचाही या आराखड्यात समावेश करण्यात आला. या आराखड्याविषयी सविस्तर चर्चा झाल्यानंतर समितीने सदर आराखड्याला मंजुरी दिली. याप्रसंगी जिल्हा स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम) सह बँकांशी संबंधित इतर योजनांचा आढावा घेण्यात आला.