शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांपासून मूर्तिजापूरची पाणीपुरवठा योजना थंड बस्त्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:21 IST

मूर्तिजापूर : गत दहा वर्षांपासून शहरातील पाणीपुरवठा योजना थंड बस्त्यात पडून असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत ...

मूर्तिजापूर : गत दहा वर्षांपासून शहरातील पाणीपुरवठा योजना थंड बस्त्यात पडून असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या शहराला दर दहा दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे. याकडे लक्ष देऊन योजनेचे काम पूर्ण करण्याची मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

शहरातील गोयनकानगर येथे असलेल्या पंप हाऊस येथून पाणीपुरवठा केला जातो. शहर हे दोन विभागात असल्याने प्रथम स्टेशन विभाग व त्यानंतर जुनी वस्तीत प्रभागनिहाय पाणीपुरवठा केला जातो. जीवन प्राधिकरणाने सन २०१० मध्ये २६ कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना सुरू केली होती. दहा वर्ष लोटूनही सन २०२१ पर्यंत योजनेचे काम पूर्ण झाले नाही. योजना तब्बल २६ कोटी रुपयांची असून, त्यापैकी १२ कोटी रुपयांचे काम जीवन प्राधिकरणाने केले. केलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांनी आदेश दिल्यावर ३ कि.मी.चे काम करण्यात आले; परंतु खोदकाम करून त्यावर कॉंक्रिटीकरण करण्यात आले नाही. ते तत्काळ पूर्ण करण्यात यावे. प्रभाग क्र.६ मध्ये झोन करण्याचे काम अपूर्ण आहे. याकडे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी दि. २४ जून २०२० रोजी काम सुरू करण्याचे आदेश देऊनही काम अद्याप अपूर्ण आहे. तरी कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कंत्राटदार, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रति विभागीय आयुक्त अमरावती व आमदार गोपीकिशन बाजोरिया अकोला, जिल्हाधिकारी अकोला यांनाही देण्यात आल्या आहेत.

----------------------------------------------------

लाखो लिटर पाण्याचा अपव्यय!

खांबोरा-मूर्तिजापूर जलवाहिनीवर अनेक ठिकाणी लिकेज असल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उशीर होत आहे. त्यामुळे लिकेजची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. मूर्तीजापूर शहरातील गोयनका नगरात घरासमोर मोठे लिकेज आहे. या बाजूलाच पाण्याचे जलकुंभ असून, त्यामधून ४ ते ५ लाख लिटर शुद्ध केलेले पाणी नाल्यात वाहून जात असल्याचे चित्र आहे.