शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

दहा वर्षांपासून मूर्तिजापूरची पाणीपुरवठा योजना थंड बस्त्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:21 IST

मूर्तिजापूर : गत दहा वर्षांपासून शहरातील पाणीपुरवठा योजना थंड बस्त्यात पडून असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत ...

मूर्तिजापूर : गत दहा वर्षांपासून शहरातील पाणीपुरवठा योजना थंड बस्त्यात पडून असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या शहराला दर दहा दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे. याकडे लक्ष देऊन योजनेचे काम पूर्ण करण्याची मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

शहरातील गोयनकानगर येथे असलेल्या पंप हाऊस येथून पाणीपुरवठा केला जातो. शहर हे दोन विभागात असल्याने प्रथम स्टेशन विभाग व त्यानंतर जुनी वस्तीत प्रभागनिहाय पाणीपुरवठा केला जातो. जीवन प्राधिकरणाने सन २०१० मध्ये २६ कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना सुरू केली होती. दहा वर्ष लोटूनही सन २०२१ पर्यंत योजनेचे काम पूर्ण झाले नाही. योजना तब्बल २६ कोटी रुपयांची असून, त्यापैकी १२ कोटी रुपयांचे काम जीवन प्राधिकरणाने केले. केलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांनी आदेश दिल्यावर ३ कि.मी.चे काम करण्यात आले; परंतु खोदकाम करून त्यावर कॉंक्रिटीकरण करण्यात आले नाही. ते तत्काळ पूर्ण करण्यात यावे. प्रभाग क्र.६ मध्ये झोन करण्याचे काम अपूर्ण आहे. याकडे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी दि. २४ जून २०२० रोजी काम सुरू करण्याचे आदेश देऊनही काम अद्याप अपूर्ण आहे. तरी कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कंत्राटदार, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रति विभागीय आयुक्त अमरावती व आमदार गोपीकिशन बाजोरिया अकोला, जिल्हाधिकारी अकोला यांनाही देण्यात आल्या आहेत.

----------------------------------------------------

लाखो लिटर पाण्याचा अपव्यय!

खांबोरा-मूर्तिजापूर जलवाहिनीवर अनेक ठिकाणी लिकेज असल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उशीर होत आहे. त्यामुळे लिकेजची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. मूर्तीजापूर शहरातील गोयनका नगरात घरासमोर मोठे लिकेज आहे. या बाजूलाच पाण्याचे जलकुंभ असून, त्यामधून ४ ते ५ लाख लिटर शुद्ध केलेले पाणी नाल्यात वाहून जात असल्याचे चित्र आहे.