शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

लसीकरणात मनपा रुग्णालय, नागरी आराेग्य केंद्र आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:19 IST

मागील काही दिवसांपासून काेराेनाचा अतिशय वेगाने प्रसार हाेत असल्याचे दिसून येत आहे. काेराेना रुग्णांच्या संख्येत हाेणारी वाढ पाहता जिल्हा ...

मागील काही दिवसांपासून काेराेनाचा अतिशय वेगाने प्रसार हाेत असल्याचे दिसून येत आहे. काेराेना रुग्णांच्या संख्येत हाेणारी वाढ पाहता जिल्हा सामान्य रुग्णालय व मनपाच्या चिंतेत भर पडली आहे. यादरम्यान, शासनाने लसीकरणाचा वेग वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. त्या आनुषंगाने शासकीय वैद्यकीय आराेग्य यंत्रणांसाेबतच काही खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाला परवानगी देण्यात आली. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, महापालिकेचे रुग्णालय तसेच मनपाच्या अखत्यारित असणाऱ्या नागरी आराेग्य केंद्रांमध्ये लस उपलब्ध आहे. अर्थात शासकीय लसीकरण केंद्रांची संख्या १२ असून, याव्यतिरिक्त दहा खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. अशा एकूण २२ ठिकाणी ६० व ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांचे लसीकरण केल्या जात असले तरी मागील काही दिवसांपासून खासगी रुग्णालयांमधील गर्दी ओसरत असल्याचे समाेर आले आहे. त्यातुलनेत महापालिकेचे कस्तुरबा गांधी रुग्णालय, किसनीबाई भरतिया रुग्णालय, ‘जीएमसी’ तसेच नागरी आराेग्य केंद्र आघाडीवर आहेत.

‘या’ रुग्णालयांना नागरिकांचा प्रतिसाद

शासनाने शहरातील दहा खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी दिली आहे. यापैकी संत तुकाराम हाॅस्पिटल, बसंती हाॅस्पिटल, आयुर्वेदिक रुग्णालय तसेच आयुर्वेदिक महाविद्यालयात नागरिक लसीकरणासाठी पुढाकार घेत असल्याचे चित्र आहे.

सुटीच्या दिवशीही लसीकरण

शहरातील लाेकसंख्येच्या निकषानुसार शासकीय रुग्णालयांना दरराेज १०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. खासगी रुग्णालयांना चाेवीस तास लसीकरण सुरू ठेवता येइल. परंतु तसे त्यांना बंधनकारक नाही. दरम्यान, ३० एप्रिलपर्यंत शासकीय रुग्णालयांना सुटीच्या दिवशी तसेच रविवारीदेखील लसीकरण सुरू ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

गर्दी का ओसरली?

खासगी रुग्णालयांत लस टाेचण्यासाठी २५० रुपये शुल्क आकारल्या जाते. लस घेतल्यानंतर काही काळ रुग्णालयात थांबावे लागत असल्याने उपलब्ध साेयी-सुविधा ध्यानात घेता नागरिकांनी खासगी रुग्णालयांना प्राधान्य दिले. लस घेतल्यानंतर काेणतेही दुष्परिणाम समाेर न आल्यामुळे तसेच हीच लस शासकीय रुग्णालयांमध्ये माेफत असल्यामुळे नागरिकांचा ओढा शासकीय रुग्णालयांकडे वाढल्याची माहिती आहे.