शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेने खरेदी केल्या २५ ई-कचरा घंटागाडी, कार्यादेश जारी; इंधन खर्चात होणार कपात

By आशीष गावंडे | Updated: December 28, 2023 20:37 IST

या वाहनांमुळे महापालिकेच्या इंधन खर्चात मोठी कपात होणार आहे.

अकोला: 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत पर्यावरणाचा ऱ्हास कमी व्हावा तसेच शहरातील प्रदूषण कमी व्हावे,  या उद्देशातून महापालिका प्रशासनाने २५ ई-कचरा घंटागाडी खरेदी केल्या आहेत. या संदर्भात श्रीनिवास व्हेईकल इंडिया एजन्सीला 'वर्क ऑर्डर' दिली आहे. या वाहनांमुळे महापालिकेच्या इंधन खर्चात मोठी कपात होणार आहे.

'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत केंद्र शासनामार्फत तसेच महापालिकेला दिल्या जाणाऱ्या १५ व्या वित्त आयोगातून घनकचरा व्यवस्थापनासाठी यापुढे कचरा संकलनासाठी  इंधनावर धावणाऱ्या वाहनांऐवजी  ई - वाहनांचा वापर करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले आहेत. वर्तमानस्थितीत शहरात इंधनावर धावणाऱ्या घंटागाडीमुळे प्रदूषणाला हातभार लागत आहे. ही बाब लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाकडून चार्जिंगवर धावणाऱ्या वाहनांचा वापर करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. अशी वाहने खरेदी करण्यासाठी महापालिकेला निधी दिला जात आहे. स्वच्छ भारत अभियान तसेच १५ व्या वित्त आयोगातून घनकचरा व्यवस्थापनासाठी दिल्या जाणाऱ्या निधीतून टप्प्याटप्प्याने ई-कचरा घंटागाडी खरेदी करण्यासाठी मनपा प्रशासनाने नोव्हेंबर महिन्यात निविदा प्रसिद्ध केली होती. यामध्ये मनपाकडे चार निविदा अर्ज प्राप्त झाले असता यापैकी कमी दर असलेल्या श्रीनिवास व्हेईकल इंडिया एजन्सीची निविदा मंजूर करण्यात आली असून एजन्सीला कार्यादेश दिले आहेत.  या एजन्सी कडून ५०० किलो क्षमतेपेक्षा अधिक कचरा वाहून नेण्याची क्षमता असणारे प्रती वाहन १२ लाख ५० हजार रुपये नुसार २५ वाहनांची खरेदी करण्यास महापालिका तयार झाली आहे. वाहन चार्ज केल्यावर १४० किलोमीटर अंतर धावणारमनपा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात २५ ई- वाहनांची खरेदी केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित २० वाहनांची खरेदी केल्या जाणार आहे. एकदा चार्ज केल्यानंतर सदर वाहन १४० किलोमीटर पेक्षा अधिक अंतर धावणार आहे. याकरिता शहरात दक्षिण झोनमध्ये उभारण्यात आलेल्या ट्रान्सफर स्टेशनमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. इंधन खर्चात होणार बचतमहापालिका क्षेत्रात कचरा संकलन करण्यासाठी १२१ वाहने आहेत. यापैकी २६ वाहने नादुरुस्त असल्याची माहिती आहे. दरम्यान, या संपूर्ण वाहनांच्या इंधनापोटी महापालिकेला महिन्याकाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. ई-वाहनांमुळे महापालिकेच्या इंधन खर्चात मोठी बचत होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. 

टॅग्स :Akolaअकोला