शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

मनपा प्रशासन, व्यावसायिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:19 IST

तत्कालीन नगर परिषदेच्या कालावधीपासून जनता भाजी बाजाराच्या जागेवर भाजीपाला व फळ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना मनपा आयुक्त निमा अराेरा यांच्या ...

तत्कालीन नगर परिषदेच्या कालावधीपासून जनता भाजी बाजाराच्या जागेवर भाजीपाला व फळ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना मनपा आयुक्त निमा अराेरा यांच्या आदेशानुसार दुकाने हटविण्यासाठी नाेटिसा बजावण्यात आल्या़ याप्रकरणी २४ व २५ मे राेजी मनपात प्रभारी उपायुक्त वैभव आवारे यांच्या दालनात पूर्व झाेनचे प्रभारी क्षेत्रीय अधिकारी दिलीप जाधव यांनी सुनावणीदरम्यान व्यावसायिकांची बाजू ऐकून घेतली़ यादरम्यान, मनपाच्या वेगवान हालचाली पाहता व्यावसायिकांनी प्रशासनाच्या हेतूवर शंकाकुशंका निर्माण केल्या आहेत़ बाजू समजून न घेताच प्रशासन एकतर्फी कार्यवाही करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येताच भाजी बाजारातील सर्व संघटनांनी एकत्र येत शिवसेना आ़ नितीन देशमुख यांची भेट घेतली़ याप्रकरणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे बैठक आयाेजित करून सामंजस्याने ताेडगा काढण्यावर एकमत करण्यात आले़ यासंदर्भात आ़ देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे बैठकीची मागणी केली़ त्यावर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २७ मे राेजी दुपारी १ वाजता मनपा आयुक्त निमा अराेरा यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत़

मंगळवारी ४० व्यावसायिकांची सुनावणी

दुकाने हटविण्याच्या मुद्यावर प्रशासनाने बजावलेल्या नाेटिसीला उत्तर देण्यासाठी मंगळवारी ४० व्यावसायिकांनी हजेरी लावली़ पूर्व झाेनचे प्रभारी क्षेत्रीय अधिकारी दिलीप जाधव यांनी प्रक्रिया पूर्ण केली़

तरीही सुनावणी कशी ?

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात यांनी जनता भाजी बाजाराच्या जागा हस्तांतरण प्रक्रियेला २१ मे राेजी स्थगिती दिली़ हा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना प्राप्त झाला आहे़ जागा हस्तांतरणाला स्थगिती असल्यामुळे मनपाकडून काेणतीही कार्यवाही हाेणे अपेक्षित नाही़ तरीही २४ व २५ मे राेजी मनपात व्यावसायिकांची सुनावणी का घेण्यात आली,असा सवाल उपस्थित झाला आहे़