शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, पुणे एसटी रिकामीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:18 IST

राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यासोबतच प्रवाशांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. अनेकांनी बाहेरगावी जाणे थांबविले आहे. अत्यंत आवश्यकता ...

राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यासोबतच प्रवाशांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. अनेकांनी बाहेरगावी जाणे थांबविले आहे. अत्यंत आवश्यकता असेल, तरच प्रवासी बाहेरगावी जाताना दिसतात. यामुळे परिवहन महामंडळानेही ज्या ठिकाणी जास्त प्रवासी ये-जा करतात अशाच बसफेऱ्या सुरू ठेवल्या आहेत. अकोला शहरातून दरदिवशी हजारो प्रवासी बाहेरगावी जात होते, आता ही संख्या कमालीची कमी झाली आहे. १४०-१५० बसफेऱ्यांचे शेड्यूल होते. हे शेड्यूल आता कमी होत आहे. ॲडव्हान्स बुकिंग सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थानिक परिस्थितीनुसार बदल झाले आहेत. यामुळे अशा ठिकाणच्या बसफेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी प्रवासी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावरही होत आहे.

--बॉक्स--

४० बस रोज

सध्या जिल्हा मुख्यालयातून विविध मार्गांवर जाणाऱ्या ४० बस कार्यान्वित आहेत. यामध्ये ग्रामीण भागासह शहरी भागाचाही समावेश आहे.

अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. खेड्यापाड्यातील प्रवासी संख्या अधिक असलेल्या एसटी बस सुरू आहेत. यामध्ये पुणे, मुंबई, औरंगाबाद अशा गाड्यांचा समावेश आहे.

--बॉक्स--

रातराणी केवळ एक

लांब पल्ल्याच्या दिवसा धावणाऱ्या एसटी बसना पुरेसे प्रवासी मिळत नाहीत. लांबच्या प्रवासासाठी रातराणी गाडीला पसंती दिली जाते; परंतु या मार्गावरील प्रवासी संख्या घटल्याने अनेक ठिकाणची रातराणी बससेवा बंद करण्यात आली आहे. केवळ पुणे येथे एकमेव गाडी सुरू आहे, तर नागपूर येथून पुण्यासाठी दोन गाड्या येतात.

--बॉक्स--

केवळ दोन-चार सीट रिझर्व्ह

कोरोनामुळे प्रवासी प्रवास टाळत आहेत. आता जाणारे प्रवासीच नसल्याने प्रत्येकाला गाडीमध्ये जागा उपलब्ध होते. यातून एसटी बसमध्ये दोन-चार सीट रिझर्व्ह असल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे.

--कोट--

जिल्ह्यात लांब पल्ल्याच्या आणि मध्यम पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवासी संख्या घटली आहे. यामुळे परिवहन महामंडळाने अनेक फेरबदल केले आहेत. दैनंदिन जवळपास ४० फेऱ्या सुरू आहेत.

अरविंद पिसोळे, स्थानक प्रमुख

--बॉक्स--

जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची संख्या घटली

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातून बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या घटली आहे. परिस्थिती चांगली होईपर्यंत प्रवासी संख्या वाढण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे बसफेऱ्याही कमी झाल्या आहेत.