शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर विशेष गाड्यांना मे अखेरपर्यंत मुदतवाढ

By atul.jaiswal | Updated: February 15, 2024 18:42 IST

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने अकोला मार्गे धावणाऱ्या मुंबई-नागपूर द्विसाप्ताहिक विशेष व पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष गाड्यांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

अकोला : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने अकोला मार्गे धावणाऱ्या मुंबई-नागपूर द्विसाप्ताहिक विशेष व पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष गाड्यांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात या दोन्ही रेल्वे गाड्यांच्या अप व डाऊन मार्गावर एकूण ९० फेऱ्या होणार असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय झाली आहे.

मध्य रेल्वेच्या भूसावळ विभाग कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, १५फेब्रुवारीपर्यंत अधिसूचीत असलेली गाडी क्र. ०२१३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागपूर द्वि-साप्ताहिक विशेषला आता ३० मे २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उपरोक्त कालावधीत या गाडीच्या ३० फेऱ्या होणार आहेत. १७ फेब्रुवारीपर्यंत अधिसूचीत असलेली गाडी क्र. ०२१४० नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष आता १ जून २०२४ पर्यंत धावणार असून, या गाडीच्या ३० फेऱ्या होतील. या गाड्यांची वेळ, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नसल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पुणे-नागपूर-पुणे एक्स्प्रेसच्या ३० फेऱ्या

पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसच्या एकूण ३० फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. १५फेब्रुवारीपर्यंत अधिसूचीत असलेली गाडी क्र. ०२१४४ नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष आता ३० मे २०२४ (१५ फेऱ्या) पर्यंत वाढविण्यात येत आहे. तर १६ फेब्रुवारीपर्यंत अधिसूचीत असलेली गाडी क्र. ०२१४३ पुणे-नागपूर साप्ताहिक आता दि. ३१ मे .२०२४ (१५ फेऱ्या) पर्यंत वाढविण्यात येत आहे.