शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व तयारीत महावितरण नापास; विजेचा लपंडाव सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:16 IST

संतोषकुमार गवई पातूर: यंदाही मान्सूनपूर्व तयारीत महावितरण नापास झाल्याचे चित्र असून, तालुक्यातील असा एकही गाव नाही की, जेथे ...

संतोषकुमार गवई

पातूर: यंदाही मान्सूनपूर्व तयारीत महावितरण नापास झाल्याचे चित्र असून, तालुक्यातील असा एकही गाव नाही की, जेथे वीजपुरवठा बंद पडत नाही. सातत्याने वीज बंद पडत असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व प्रकाराकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून, नागरिक त्रस्त झाले आहेत.

तालुक्यात गत आठवड्यात सर्वत्र वादळी वारे सुटले होते. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावात वादळाच्या प्रभावाने भुईमुगासह भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आंब्यांसह फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळाने तालुक्यातील महावितरणच्या वीजपुरवठा व्यवस्थेच्या मर्यादाही उघड्या पाडल्या आहेत. महावितरण मान्सूनपूर्व तयारीत नापास झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील असा एकही भाग नाही, की जेथे वीज वितरण व्यवस्था कोलमडली नसेल. वादळ आणि वारा सुटला की, दररोज अनेक भागात वीज पुरवठा बंद होतो. बहुतांश भागात एकदा गेलेली वीज २४ तास झाले तरी परतलेली नव्हती. ग्रामीण भागात तर सातत्याने वीज वितरण व्यवस्था कोलमडत आहे.

-------------------------------------

अद्याप सिंगल फेज पुरवठा नाही!

कोरोनाच्या प्रभावामुळे अनेक ग्रामीण भागातील नागरिक वास्तव्य करण्यासाठी शेतात गेले आहेत. त्यांना रात्री वीज उपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, महावितरणने अद्याप सिंगल फेज वितरणाची व्यवस्था केलेली नाही. यामुळे रात्री त्यांना अंधारात राहावे लागते.

-----------------------------------------

कमी कर्मचाऱ्यांवर चालतो महावितरणचा डोलारा!

एकतर महावितरणचे नियमित कर्मचारी कमी आहेत. ऑऊटसोर्स पद्धतीने नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेण्यात येत आहेत. त्यांना सुरक्षेची साधनेही देण्यात येत नसल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे त्यांना जीव धोक्यात घालून कामे करावी लागत आहेत. कोरोनाच्या संकटकाळातही कोरोना योद्धा म्हणून काम करीत आहेत. यासंदर्भात सातत्याने त्यांच्याकडून मागणी करूनही साहित्य उपलब्ध करण्यात येत नाही. परिणामी अनेकांना काम करताना जीव गमावण्याची वेळ येऊ शकते.

--------------------------------------

इन्सुलेटर फुटण्याचे प्रमाण वाढले!

अनेक ठिकाणी तारा तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. तारांना खांबावर धरून ठेवण्याचे काम इन्सुलेटरच्या माध्यमातून होते. चिनी मातीच्या या इन्सुलेटरमुळे तारा सरकत नाहीत. तसेच एकमेकांना स्पर्श करत नाहीत. मात्र, तालुक्यातील अनेक ठिकाणी इन्सुलेटर अनेक वर्षांपासून बदललेले नाहीत. परिणामी पाणी पडल्यानंतर ते फुटत आहेत. परिणामी तारा सुट्या होऊन त्या एकमेकांना स्पर्श करत आहेत. परिणामी ठिणग्या उडून तारा तुटल्या आहेत. यामुळेच वीज बंद पडत आहे.

-------------------------------------------------

५० वर्षांपासून वीज तारा ‘जैसे थे’!

तालुक्यातील अनेक भागात वीज तारा ५० वर्षांपासून बदललेल्या नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील काही भागात वीज तारा तुटत असल्याचे प्रकार घडत आहेत. याकडे महावितरणने लक्ष देऊन वीज तारांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.