अकोला: राज्यात राबविण्यात येत असलेल्या आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत आमदारांकडून गावांची निवड लवकरच करण्यात येणार आहे. खासदार आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवरच राज्यात आमदार आदर्श ग्राम योजना राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या खासदार आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आमदार आदर्श ग्राम योजना राबविण्यास मंजुरी देण्यात येत असल्याचा निर्णय राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत २0 मे रोजी घेण्यात आला. त्यानुसार राज्यात आमदार आदर्श ग्राम योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेत प्रत्येक आमदारांकडून त्यांच्या मतदारसंघातील तीन ग्रामपंचायती जुलै २0१९ पर्यंंत विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत आमदारांकडून लवकरच गावांची निवड करण्या त येणार आहे.
आमदार आदर्श ग्रामसाठी लवकरच गावांची निवड
By admin | Updated: May 26, 2015 02:34 IST