शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

चान्नी पोलिसांच्या दंडेलशाहीविरोधात खासदार-आमदार आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:50 IST

अकोला: मळसूर येथे झालेल्या अपघातातील मृतकाची हत्या झाल्याचा आरोप चान्नी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केल्यानंतर पोलिसांनी एका वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरून मळसूर, अंबाशी व चरणगाव येथील ग्रामस्थांना चार दिवस बेदम मारहाण केली. या मारहाणीतील जखमींनी खा. संजय धोत्रे व आ. रणधीर सावरकर यांना आपबिती सांगताच त्यांनी तातडीने पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांची भेट घेतली.

ठळक मुद्देपोलिसांची ग्रामस्थांना बेदम मारहाण, पोलीस अधीक्षकांची घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मळसूर येथे झालेल्या अपघातातील मृतकाची हत्या झाल्याचा आरोप चान्नी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केल्यानंतर पोलिसांनी एका वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरून मळसूर, अंबाशी व चरणगाव येथील ग्रामस्थांना चार दिवस बेदम मारहाण केली. या मारहाणीतील जखमींनी खा. संजय धोत्रे व आ. रणधीर सावरकर यांना आपबिती सांगताच त्यांनी तातडीने पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांची भेट घेतली. चान्नी पोलिसांच्या या दंडेलशाहीविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.मळसूर परिसरात दीपक गडदे नामक युवकाचा २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अपघात झाला होता. या अपघातस्थळाच्या काही अंतरावर एक काठी मिळाली असून, या काठीवर रक्त सांडलेले होते. तसेच रोडवरही तीन ते चार ठिकाणी रक्ताचा सळा होता. यावरून दीपक गडदेचा अपघात झाला नसून, हत्या झाल्याची तक्रार त्यांचे मामा शिवाजी काळे यांनी चान्नी पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीच्या आधारे तसेच एका नेत्याच्या सांगण्यावरून चान्नी पोलिसांनी अंबाशी येथील रहिवासी गुणवंत रामकृष्ण महल्ले, मळसूर येथील उमेश नाना बोचरे, चरणगाव येथील गजानन सुंदरलाल देशमुख, गजानन बाबूलाल काळे, मळसूरचे सरपंच जगदीश देवकते व पंजाब हिरामन राठोड यांना मंगळवार, ६ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले. त्यानंतर पंजाब राठोड व जगदीश देवकते या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अकोल्यात आणले, तर उर्वरित चार ग्रामस्थांना चान्नी पोलिसांनी दोराने बांधून मारहाण केली. गजानन देशमुख, गजानन काळे, उमेश बोचरे व गुणवंत महल्ले या चार जणांना बाजीराव तसेच पट्टय़ाने मारहाण केल्याने ते प्रचंड दहशतीत आहेत. मंगळवारी रात्री मारहाण केल्यानंतर त्यांना अटक तसेच ताब्यात घेतले नसल्याचे दाखवून शुक्रवारपर्यंत मारहाण केली. या मारहाणीमुळे चारही जण प्रचंड भेदरल्याने त्यांनी खा. संजय धोत्रे व आ. रणधीर सावरकर यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर धोत्रे व सावरकर यांनी सोमवारी पोलीस अधीक्षक कलासागर यांची भेट घेऊन ग्रामस्थांवर अत्याचार करणार्‍या पोलिसांवर कारवाईची मागणी केली. या सहा जणांपैकी कुणीही या अपघात किंवा खुनात सहभागी असेल, तर त्यांच्यावर काहीही कारवाई करा, मात्र काहीही संबंध नसताना केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन पोलिसांनी ग्रामस्थांना मारहाण करणे चुकीचे असल्याचेही यावेळी धोत्रे व सावरकर यांनी पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिले.केवळ कुणाच्या सांगण्यावरून पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांना रेकॉर्डवर न घेता तब्बल मंगळवार ते शुक्रवार चार दिवस मारहाण करणे चुकीचे असल्याचा आरोप खा. संजय धोत्रे व आ. रणधीर सावरकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनी केला. कोणत्याही व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चोवीस तासांच्या आत न्यायालयासमोर हजर करणे बंधनकारक आहे. मात्र, चान्नी प्रकरणात पोलिसांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे दिसून येत आहे.

चौकशी करून कारवाईचान्नी पोलिसांनी केलेला प्रकार, तसेच मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात घडलेल्या लाचखोरीच्या गंभीर प्रकरणानंतरही पोलीस अधीक्षकांनी अद्याप कारवाई केली नसल्याचाही मुद्दा यावेळी उपस्थित झाला. त्यावर पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून लवकरच कारवाई करणार असल्याचे आश्‍वासन दिले. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासणार असल्याचेही यावेळी पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

तर उपोषणास बसू - आ. सावरकरचान्नी व मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकारानंतरही पोलिसांनी या दोषी अधिकारी, कर्मचार्‍यांना पाठीशी घातल्यास वरिष्ठ पोलीस अधीकार्‍यांविरोधात उपोषणास बसणार असल्याचा इशारा आ. रणधीर सावरकर यांनी दिला. गुरुवारपर्यंत कारवाई न झाल्यास भाजपाच्या हजारो कार्यकर्त्यांसह उपोषणास प्रारंभ करणार असल्याचेही यावेळी आ. रणधीर सावरकर यांनी पोलीस अधीक्षकांसमोर स्पष्ट केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महापौर विजय अग्रवाल, नगरसेवक विनोद बोर्डे, गणेश पावसाळे, गिरीष जोशीही उपस्थित होते.

टॅग्स :Sanjay Dhotreसंजय धोत्रेRandhir Savarkarरणधीर सावरकर