शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

चान्नी पोलिसांच्या दंडेलशाहीविरोधात खासदार-आमदार आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:50 IST

अकोला: मळसूर येथे झालेल्या अपघातातील मृतकाची हत्या झाल्याचा आरोप चान्नी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केल्यानंतर पोलिसांनी एका वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरून मळसूर, अंबाशी व चरणगाव येथील ग्रामस्थांना चार दिवस बेदम मारहाण केली. या मारहाणीतील जखमींनी खा. संजय धोत्रे व आ. रणधीर सावरकर यांना आपबिती सांगताच त्यांनी तातडीने पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांची भेट घेतली.

ठळक मुद्देपोलिसांची ग्रामस्थांना बेदम मारहाण, पोलीस अधीक्षकांची घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मळसूर येथे झालेल्या अपघातातील मृतकाची हत्या झाल्याचा आरोप चान्नी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केल्यानंतर पोलिसांनी एका वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरून मळसूर, अंबाशी व चरणगाव येथील ग्रामस्थांना चार दिवस बेदम मारहाण केली. या मारहाणीतील जखमींनी खा. संजय धोत्रे व आ. रणधीर सावरकर यांना आपबिती सांगताच त्यांनी तातडीने पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांची भेट घेतली. चान्नी पोलिसांच्या या दंडेलशाहीविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.मळसूर परिसरात दीपक गडदे नामक युवकाचा २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अपघात झाला होता. या अपघातस्थळाच्या काही अंतरावर एक काठी मिळाली असून, या काठीवर रक्त सांडलेले होते. तसेच रोडवरही तीन ते चार ठिकाणी रक्ताचा सळा होता. यावरून दीपक गडदेचा अपघात झाला नसून, हत्या झाल्याची तक्रार त्यांचे मामा शिवाजी काळे यांनी चान्नी पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीच्या आधारे तसेच एका नेत्याच्या सांगण्यावरून चान्नी पोलिसांनी अंबाशी येथील रहिवासी गुणवंत रामकृष्ण महल्ले, मळसूर येथील उमेश नाना बोचरे, चरणगाव येथील गजानन सुंदरलाल देशमुख, गजानन बाबूलाल काळे, मळसूरचे सरपंच जगदीश देवकते व पंजाब हिरामन राठोड यांना मंगळवार, ६ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले. त्यानंतर पंजाब राठोड व जगदीश देवकते या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अकोल्यात आणले, तर उर्वरित चार ग्रामस्थांना चान्नी पोलिसांनी दोराने बांधून मारहाण केली. गजानन देशमुख, गजानन काळे, उमेश बोचरे व गुणवंत महल्ले या चार जणांना बाजीराव तसेच पट्टय़ाने मारहाण केल्याने ते प्रचंड दहशतीत आहेत. मंगळवारी रात्री मारहाण केल्यानंतर त्यांना अटक तसेच ताब्यात घेतले नसल्याचे दाखवून शुक्रवारपर्यंत मारहाण केली. या मारहाणीमुळे चारही जण प्रचंड भेदरल्याने त्यांनी खा. संजय धोत्रे व आ. रणधीर सावरकर यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर धोत्रे व सावरकर यांनी सोमवारी पोलीस अधीक्षक कलासागर यांची भेट घेऊन ग्रामस्थांवर अत्याचार करणार्‍या पोलिसांवर कारवाईची मागणी केली. या सहा जणांपैकी कुणीही या अपघात किंवा खुनात सहभागी असेल, तर त्यांच्यावर काहीही कारवाई करा, मात्र काहीही संबंध नसताना केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन पोलिसांनी ग्रामस्थांना मारहाण करणे चुकीचे असल्याचेही यावेळी धोत्रे व सावरकर यांनी पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिले.केवळ कुणाच्या सांगण्यावरून पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांना रेकॉर्डवर न घेता तब्बल मंगळवार ते शुक्रवार चार दिवस मारहाण करणे चुकीचे असल्याचा आरोप खा. संजय धोत्रे व आ. रणधीर सावरकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनी केला. कोणत्याही व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चोवीस तासांच्या आत न्यायालयासमोर हजर करणे बंधनकारक आहे. मात्र, चान्नी प्रकरणात पोलिसांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे दिसून येत आहे.

चौकशी करून कारवाईचान्नी पोलिसांनी केलेला प्रकार, तसेच मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात घडलेल्या लाचखोरीच्या गंभीर प्रकरणानंतरही पोलीस अधीक्षकांनी अद्याप कारवाई केली नसल्याचाही मुद्दा यावेळी उपस्थित झाला. त्यावर पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून लवकरच कारवाई करणार असल्याचे आश्‍वासन दिले. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासणार असल्याचेही यावेळी पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

तर उपोषणास बसू - आ. सावरकरचान्नी व मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकारानंतरही पोलिसांनी या दोषी अधिकारी, कर्मचार्‍यांना पाठीशी घातल्यास वरिष्ठ पोलीस अधीकार्‍यांविरोधात उपोषणास बसणार असल्याचा इशारा आ. रणधीर सावरकर यांनी दिला. गुरुवारपर्यंत कारवाई न झाल्यास भाजपाच्या हजारो कार्यकर्त्यांसह उपोषणास प्रारंभ करणार असल्याचेही यावेळी आ. रणधीर सावरकर यांनी पोलीस अधीक्षकांसमोर स्पष्ट केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महापौर विजय अग्रवाल, नगरसेवक विनोद बोर्डे, गणेश पावसाळे, गिरीष जोशीही उपस्थित होते.

टॅग्स :Sanjay Dhotreसंजय धोत्रेRandhir Savarkarरणधीर सावरकर