शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

शाळा सुरू करण्याच्या हालचाली; मग महाविद्यालये का नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST

अकोला : गत दीड वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षणपद्धतीने अध्यापनाचे ...

अकोला : गत दीड वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षणपद्धतीने अध्यापनाचे कार्य सुरू होते; मात्र ऑनलाईन पद्धतीचा ग्रामीण भागात फज्जा उडाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाने नुकत्याच कोरोनामुक्त झालेल्या गावांतील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या हालचाली स्थानिक प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे, महाविद्यालये बंद असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी हा समजदार असून, कोरोना‌विषयक नियमांचे पालन करू शकतो. त्यामुळे महाविद्यालये सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून जोर धरत आहे.

कोरोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत; मात्र आता कोरोना रुग्णांची संख्या घसरत असल्याने विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोनामुक्त गावांत इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय नुकताच शासनाने घेतला असून, ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठराव घेऊन व पालकांच्या संमतीने हे वर्ग सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दुसरीकडे, शाळा सुरू होण्याच्या हालचाली वाढल्या; मात्र महाविद्यालये बंद असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा हिरमोड होत आहे. आता कोरोनाची परिस्थिती हळूहळू सावरायला सुरुवात झाली असून, शहरासह ग्रामीण भागातील महाविद्यालये सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.

-----------------------------------------------

महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास आमची तयारी पूर्ण झाली आहे. जर महाविद्यालये सुरू झाली, तर ५० टक्के उपस्थितीत वर्ग सुरू करणार आहोत. यामध्ये कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना एकत्र न बोलविता एकाचदिवशी एका शाखेतील विद्यार्थी बोलावून अध्यापन केले जाणार, असे नियोजन केले आहे. तसेच कॉलेजमधील ९९ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले आहे. शासनाने विचार करून अटी व शर्तींनुसार महाविद्यालये सुरू करावीत.

- रामेश्वर भिसे, प्राचार्य, श्री. शिवाजी महाविद्यालय, अकोला.

----------------------------------------

कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घ्यावा. महाविद्यालयीन विद्यार्थी हा १८ वर्षांवरील असल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांचे लसीकरणही झाले असणार. महाविद्यालये सुरू केल्यास तयारी पूर्ण झाली आहे. शासनाने अटी व शर्तींनुसार महाविद्यालये सुरू करावीत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

- डॉ. आर. डी. सीकची, प्राचार्य,

सीताबाई कला महाविद्यालय, अकोला.

----------------------------

महाविद्यालये बंद असल्याने अभ्यासात खंड पडला आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांसह पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. महाविद्यालये सुरू केल्यास एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. महाविद्यालये सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

- उमेश शिंदे, विद्यार्थी.

-------------------------

महाविद्यालयांबाबत शासनाने त्वरित निर्णय घेऊन सुरू करावीत. बहुतांश महाविद्यालयीन विद्यार्थांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तसेच कोरोनाविषयक नियमांचे पालनही विद्यार्थी करणार आहेत. त्यामुळे शासनाने योग्य तो निर्णय घेऊन अटी व शर्तींनुसार महाविद्यालये सुरू करावीत.

- अभिषेक जाधव, विद्यार्थी.