शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

शेतक-यांसाठी आंदोलने उभारा!

By admin | Updated: May 7, 2017 02:47 IST

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जिल्हाप्रमुखांना आदेश.

अकोला: भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकर्‍यांवर संकट ओढवले आहे. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी बाळापूर तालुक्यात काढण्यात आलेला ह्यरुमणेह्ण मोर्चा सीमित न ठेवता संपूर्ण जिल्ह्यात शेतकर्‍यांसाठी आंदोलने उभारण्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना दिला. अकोला जिल्ह्यातील रुमणे मोर्चा यानंतर राज्यभरात आयोजित केला जाण्याचे संकेत आहेत. गतवर्षी निसर्गाने साथ दिल्याने सोयाबीन, तूर, कापसाचे भरघोस उत्पादन झाले. सोयाबीनची आवक वाढताच भावात जाणीवपूर्वक घसरण करण्यात आली. हाच प्रकार तुरीच्या बाबतीत घडला. तुरीचे भाव पाडून नाफेडमार्फत शेतकर्‍यांची तूर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तूर खरेदीची पद्धत, उपलब्ध बारदाणा, एकाच दिवशी अवघ्या काही क्विंटल तुरीचे होणारे मोजमाप आदी प्रकार पाहता तूर खरेदीवरून भाजपने शेतकर्‍यांची चेष्टा केल्याचा आरोप करत जिल्हा शिवसेनेने बंद पडलेली तूर खरेदी सुरू करण्यासाठी आंदोलन छेडल्याचे दिसून आले. शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी ५ मे रोजी बाळापूर तालुक्यात ह्यरुमणेह्णमोर्चा काढला. मोर्चात सहभागी शेतकर्‍यांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पश्‍चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चाची दखल घेत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे सविस्तर चर्चा केली. शेतकर्‍यांच्या विविध समस्यांचे जोपर्यंत निराकरण होत नाही, कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत सरकारला जागे करण्यासाठी जिल्हाभरात तीव्र आंदोलने उभारण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. जिल्हाप्रमुखांनी घेतली बैठकपक्ष प्रमुखांच्या सूचनेमुळे शिवसेनेची जिल्हा कार्यकारिणी सक्रिय झाल्याचे दिसून आले. जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी शनिवारी उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख यांची तातडीने बैठक घेतली. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. बैठकीला उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ ढोरे, निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, दिलीप बोचे, तालुका प्रमुख विजय मोहोड, अप्पू तिडके, गजानन मानतकार, संजय शेळके, श्याम गावंडे आदी उपस्थित होते. शेतकर्‍यांसाठी तीव्र आंदोलन उभारण्याचे पक्षप्रमुखांनी आदेश दिले आहेत. संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत, आमदार गोपीकिशन बाजोरिया तसेच स्थानिक पदाधिकार्‍यांसोबत चर्चा विनिमय करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल. -नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख शिवसेना