शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शांततामय मार्गाने आंदोलन करा!

By admin | Updated: June 7, 2017 01:11 IST

शेतकरी बचाव आंदोलनाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमुक्तीसह स्वामिनाथन आयोगाप्रमाणे शेतमालाचे भाव मिळावेत, शेती लागवडीस सरकारने तगाई द्यावी, वीज बिल माफ करावे, आठ पदरी समृद्धी मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात येऊ नये, तसेच संपूर्ण दारूबंदी करावी, आदी महत्त्वपूर्ण मागण्यांकरिता शेतकरी बचाओ आंदोलनाने महाराष्ट्रातील क्रांती मोर्चास पाठिंबा जाहीर केला आहे.शेतकरी बचाओ आंदोलनाचे विदर्भातील कार्यकर्ते सक्रिय आंदोलनात सहभागी झलो होते. सरकार जोपर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती व अन्य मागण्या मान्य करीत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचा हा लढा सुरू राहील. शेतकरी स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांनी आपल्या आमदारांना मागण्यांची निवेदने द्यावीत. तहसील, गाव परिसरात शांततामय साखळी धरणे, उपोषण, बंद, मिरवणुका काढून आंदोलन करावे. हिंसाचारी आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन शेतकरी बचाओ आंदोलनाचे संयोजक भाई रजनीकांत, संघटक अ‍ॅड. ग्यानेंद्रकुमार कुशवाह यवतमाळ, गजानन मांडवडे, नेताजी अरुण जाधव बुलडाणा, अनिल ठाकरे अमरावती, नंदु लोखंडे,पुरुषोत्तम पोटे अकोट, पुरुषोत्तम मनवर, मंगला देशमुख कारंजा, रत्ना खंडारे, अतुल थोरात आदी विदर्भातील शेतकरी स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले, तसेच ५ जूनचे शेतकरी मागण्यांकरिता होऊ घातलेल्या बंदमध्ये शांततामय पद्धतीने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी संपाला जिल्ह्यात प्रतिसादसध्या राज्यभर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाला अकोला जिल्ह्यात अकोट,मुर्तिजापूरसह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात व्यापक प्रतिसाद मिळत आहे. या संपाला विविध संघटना आपला पाठिंबा व्यक्त करीत आहे.