शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

मोर्णा, निगरुणातून होणार जिल्ह्यात सिंचन!

By admin | Updated: November 14, 2014 00:52 IST

सिंचन विभागाने केले तीन हजार हेक्टरचे नियोजन.

अकोला : जिल्ह्यातील ५0 टक्कय़ांच्या आत जलसाठा असणार्‍या धरणांतून यावर्षी सिंचनासाठी पाणी सोडले जाणार नसले तरी मोर्णा व निगरुणा या दोन मध्यम सिंचन प्रकल्पांतील पाण्यावर रब्बीतील ओलिताचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यामुळे या धरणाच्या क्षेत्रात येणार्‍या शेतकर्‍यांना यावर्षी दिलासा मिळाला आहे. गतवर्षी जिल्ह्यात १ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करण्यात आली होती आणि पावसाचा ओलावा अधिक असल्याने रब्बी पिके चांगली होती; परंतु यावर्षी परिस्थिती उलट आहे. यंदा कृषी विभागाने तेवढेच नियोजन केले असले तरी प्रत्यक्षात काटेपूर्णा या मोठय़ा धरणातून यावर्षी सिंचनाला पाणी सोडण्यात येणार नाही. या धरणात आजमितीस ३१ टक्के जलसाठा शिल्लक असून, ते पिण्याकरिता आरक्षित केले आहे. जिल्ह्यातील रब्बी हंगामात सर्वाधिक हरभरा, तर पूर्व विदर्भात जवस या पिकाची पेरणी करतात. करडी, मोहरी व गहू या पिकांचा पेराही केला जातो. गहू पिकाला पाण्याची गरज असल्याने संरक्षित सिंचनाची ज्यांच्याकडे सोय आहे, ते शेतकर्‍यांनी गहू पेरणी केली आहे. तथापि, उपलब्ध संरक्षित पाणी संपूर्ण हंगामात पुरेल, याची शाश्‍वती नसल्याने गहू पिकाचे क्षेत्रही यावर्षी घटले आहे. पण, मोर्णा व निगरुणा या मध्यम प्रकल्पात अनुक्रमे ५७.९४ व ९८.४७ टक्के जलसाठा असल्याने या धरणांतून सिंचनाला पाणी देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. सिंचन विभागामार्फत या धरणांमधून यावर्षी ओलीतासाठी पाणी सोडले जाणार आहे. यासाठी सिंचन विभागाने जिल्ह्यात जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्र सिचिंत करण्याचे नियोजन केले आहे.