शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

मोर्णा, निगरुणातून होणार जिल्ह्यात सिंचन!

By admin | Updated: November 14, 2014 00:52 IST

सिंचन विभागाने केले तीन हजार हेक्टरचे नियोजन.

अकोला : जिल्ह्यातील ५0 टक्कय़ांच्या आत जलसाठा असणार्‍या धरणांतून यावर्षी सिंचनासाठी पाणी सोडले जाणार नसले तरी मोर्णा व निगरुणा या दोन मध्यम सिंचन प्रकल्पांतील पाण्यावर रब्बीतील ओलिताचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यामुळे या धरणाच्या क्षेत्रात येणार्‍या शेतकर्‍यांना यावर्षी दिलासा मिळाला आहे. गतवर्षी जिल्ह्यात १ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करण्यात आली होती आणि पावसाचा ओलावा अधिक असल्याने रब्बी पिके चांगली होती; परंतु यावर्षी परिस्थिती उलट आहे. यंदा कृषी विभागाने तेवढेच नियोजन केले असले तरी प्रत्यक्षात काटेपूर्णा या मोठय़ा धरणातून यावर्षी सिंचनाला पाणी सोडण्यात येणार नाही. या धरणात आजमितीस ३१ टक्के जलसाठा शिल्लक असून, ते पिण्याकरिता आरक्षित केले आहे. जिल्ह्यातील रब्बी हंगामात सर्वाधिक हरभरा, तर पूर्व विदर्भात जवस या पिकाची पेरणी करतात. करडी, मोहरी व गहू या पिकांचा पेराही केला जातो. गहू पिकाला पाण्याची गरज असल्याने संरक्षित सिंचनाची ज्यांच्याकडे सोय आहे, ते शेतकर्‍यांनी गहू पेरणी केली आहे. तथापि, उपलब्ध संरक्षित पाणी संपूर्ण हंगामात पुरेल, याची शाश्‍वती नसल्याने गहू पिकाचे क्षेत्रही यावर्षी घटले आहे. पण, मोर्णा व निगरुणा या मध्यम प्रकल्पात अनुक्रमे ५७.९४ व ९८.४७ टक्के जलसाठा असल्याने या धरणांतून सिंचनाला पाणी देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. सिंचन विभागामार्फत या धरणांमधून यावर्षी ओलीतासाठी पाणी सोडले जाणार आहे. यासाठी सिंचन विभागाने जिल्ह्यात जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्र सिचिंत करण्याचे नियोजन केले आहे.