शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

मोर्णा स्वच्छता चळवळ व्हावी

By admin | Updated: December 15, 2014 01:10 IST

मोर्णेची गती सरस्वतीसारखी होऊ नये.

अकोला : शहराच्या भल्यासाठी का होईना मोर्णा नदी स्वच्छतेची मोहीम सुरू होणे गरजेचे आहे. मोर्णा ही अकोलेकरांसाठी भविष्यात वरदान ठरू शकते, हे लक्षात घेऊन मोर्णा स्वच्छतेच्या मोहिमेचे चळवळीत रूपांतर होणे गरजेचे आहे. यासाठी सर्वच अकोलेकरांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मोर्णा नदीला खरा धोका हा अकोला शहरातच आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. कौलखेडपासून ते पोलीस प्रशिक्षण केंद्रापर्यंत मोर्णा नदीत येणार्‍या सर्व नाल्यांचे पाणी दुसरीकडे वळविण्याला सर्वप्रथम प्राधान्य दिले पाहिजे. अकोला शहरात नदी काठावर कुठलाही मोठा कारखाना नाही. त्यामुळे कारखान्याचे दूषित पाणी नदीत सोडल्या जाण्याचा प्रश्नच नाही. मोर्णा नदीच्या दोन्ही काठावरील अतिक्रमण काढले जाणेदेखील गरजेचे आहे. अतिक्रमण करणार्‍यांचा धोका ज्याप्रमाणे मोर्णेला आहे, त्याचप्रमाणे मोर्णेचा धोका या अतिक्रमणकर्त्यांना आहे. नदीचे दोन्ही काठ स्वच्छ करून त्यांचे सुशोभीकरण केले जावे. मोर्णेतील जलकुंभी काढून मोर्णेचा प्रवाह मोकळा केला पाहिजे. तिचे खोलीकरणदेखील होणे आवश्यक आहे. गाळ काढून पात्र खुले केले गेले पाहिजे. एवढी कामे जरी झाली तरी मोर्णा पूर्वीसारखी वाहू लागले. अकोला शहराची लोकसंख्या भरपूर आहे. शहरात सामाजिक संस्थांची संख्यादेखील मोठी आहे. या सामाजिक संस्थांनी इतर कामे काही दिवस बाजूला ठेवून जर मोर्णा स्वच्छतेचे काम हाती घेतले तर एक महिन्याच्या आत मोर्णा मोकळी होऊन जाईल. सध्या संपूर्ण देशात स्वच्छतेची मोहीम मोठय़ा जोरात सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी सर्वांच्या हातात झाडू दिला. अकोल्यातदेखील झाडू हातात घेणार्‍यांची संख्या कमी नाही. झाडू हातात घेऊन फोटो काढून स्वत:ला गाडगेबाबानंतर आम्हीच, असे समजणारेदेखील भरपूर आहेत. या सर्वांनी महिनाभर एक तास मोर्णेच्या स्वच्छतेसाठी द्यावा, म्हणजे मोर्णाही स्वच्छ होईल आणि त्यांनाही आपण काहीतरी केले याचे समाधान मिळेल.गाव आपले आहे आणि नदी आपली आहे, ही भावना यापुढे सर्व नागरिकांना ठेवावी लागणार आहे. भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी मोर्णा जर प्रवाही राहिली तर त्याचा फायदा अकोलेकरांना मिळू शकतो. हे सर्व लक्षात घेऊन मोर्णा स्वच्छता मोहीम एक चळवळ म्हणून हाती घेण्याची आवश्यकता आहे. आजच जर आपण सावध होऊन मोर्णेचे संरक्षण केले नाही तर उद्या मोर्णा भावी पिढीला फक्त चित्रातच दाखवावी लागेल. प्रयाग येथील धार्मिक मान्यता असलेली सरस्वती नदी आज लुप्त झाली आहे. ही नदी लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळेच लुप्त झाली. तशी अवस्था मोर्णेची होऊ नये यासाठी अकोलेकरांनी आतापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे.