शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

मोर्णा स्वच्छता चळवळ व्हावी

By admin | Updated: December 15, 2014 01:10 IST

मोर्णेची गती सरस्वतीसारखी होऊ नये.

अकोला : शहराच्या भल्यासाठी का होईना मोर्णा नदी स्वच्छतेची मोहीम सुरू होणे गरजेचे आहे. मोर्णा ही अकोलेकरांसाठी भविष्यात वरदान ठरू शकते, हे लक्षात घेऊन मोर्णा स्वच्छतेच्या मोहिमेचे चळवळीत रूपांतर होणे गरजेचे आहे. यासाठी सर्वच अकोलेकरांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मोर्णा नदीला खरा धोका हा अकोला शहरातच आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. कौलखेडपासून ते पोलीस प्रशिक्षण केंद्रापर्यंत मोर्णा नदीत येणार्‍या सर्व नाल्यांचे पाणी दुसरीकडे वळविण्याला सर्वप्रथम प्राधान्य दिले पाहिजे. अकोला शहरात नदी काठावर कुठलाही मोठा कारखाना नाही. त्यामुळे कारखान्याचे दूषित पाणी नदीत सोडल्या जाण्याचा प्रश्नच नाही. मोर्णा नदीच्या दोन्ही काठावरील अतिक्रमण काढले जाणेदेखील गरजेचे आहे. अतिक्रमण करणार्‍यांचा धोका ज्याप्रमाणे मोर्णेला आहे, त्याचप्रमाणे मोर्णेचा धोका या अतिक्रमणकर्त्यांना आहे. नदीचे दोन्ही काठ स्वच्छ करून त्यांचे सुशोभीकरण केले जावे. मोर्णेतील जलकुंभी काढून मोर्णेचा प्रवाह मोकळा केला पाहिजे. तिचे खोलीकरणदेखील होणे आवश्यक आहे. गाळ काढून पात्र खुले केले गेले पाहिजे. एवढी कामे जरी झाली तरी मोर्णा पूर्वीसारखी वाहू लागले. अकोला शहराची लोकसंख्या भरपूर आहे. शहरात सामाजिक संस्थांची संख्यादेखील मोठी आहे. या सामाजिक संस्थांनी इतर कामे काही दिवस बाजूला ठेवून जर मोर्णा स्वच्छतेचे काम हाती घेतले तर एक महिन्याच्या आत मोर्णा मोकळी होऊन जाईल. सध्या संपूर्ण देशात स्वच्छतेची मोहीम मोठय़ा जोरात सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी सर्वांच्या हातात झाडू दिला. अकोल्यातदेखील झाडू हातात घेणार्‍यांची संख्या कमी नाही. झाडू हातात घेऊन फोटो काढून स्वत:ला गाडगेबाबानंतर आम्हीच, असे समजणारेदेखील भरपूर आहेत. या सर्वांनी महिनाभर एक तास मोर्णेच्या स्वच्छतेसाठी द्यावा, म्हणजे मोर्णाही स्वच्छ होईल आणि त्यांनाही आपण काहीतरी केले याचे समाधान मिळेल.गाव आपले आहे आणि नदी आपली आहे, ही भावना यापुढे सर्व नागरिकांना ठेवावी लागणार आहे. भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी मोर्णा जर प्रवाही राहिली तर त्याचा फायदा अकोलेकरांना मिळू शकतो. हे सर्व लक्षात घेऊन मोर्णा स्वच्छता मोहीम एक चळवळ म्हणून हाती घेण्याची आवश्यकता आहे. आजच जर आपण सावध होऊन मोर्णेचे संरक्षण केले नाही तर उद्या मोर्णा भावी पिढीला फक्त चित्रातच दाखवावी लागेल. प्रयाग येथील धार्मिक मान्यता असलेली सरस्वती नदी आज लुप्त झाली आहे. ही नदी लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळेच लुप्त झाली. तशी अवस्था मोर्णेची होऊ नये यासाठी अकोलेकरांनी आतापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे.