शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मोर्णा स्वच्छता चळवळ व्हावी

By admin | Updated: December 15, 2014 01:10 IST

मोर्णेची गती सरस्वतीसारखी होऊ नये.

अकोला : शहराच्या भल्यासाठी का होईना मोर्णा नदी स्वच्छतेची मोहीम सुरू होणे गरजेचे आहे. मोर्णा ही अकोलेकरांसाठी भविष्यात वरदान ठरू शकते, हे लक्षात घेऊन मोर्णा स्वच्छतेच्या मोहिमेचे चळवळीत रूपांतर होणे गरजेचे आहे. यासाठी सर्वच अकोलेकरांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मोर्णा नदीला खरा धोका हा अकोला शहरातच आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. कौलखेडपासून ते पोलीस प्रशिक्षण केंद्रापर्यंत मोर्णा नदीत येणार्‍या सर्व नाल्यांचे पाणी दुसरीकडे वळविण्याला सर्वप्रथम प्राधान्य दिले पाहिजे. अकोला शहरात नदी काठावर कुठलाही मोठा कारखाना नाही. त्यामुळे कारखान्याचे दूषित पाणी नदीत सोडल्या जाण्याचा प्रश्नच नाही. मोर्णा नदीच्या दोन्ही काठावरील अतिक्रमण काढले जाणेदेखील गरजेचे आहे. अतिक्रमण करणार्‍यांचा धोका ज्याप्रमाणे मोर्णेला आहे, त्याचप्रमाणे मोर्णेचा धोका या अतिक्रमणकर्त्यांना आहे. नदीचे दोन्ही काठ स्वच्छ करून त्यांचे सुशोभीकरण केले जावे. मोर्णेतील जलकुंभी काढून मोर्णेचा प्रवाह मोकळा केला पाहिजे. तिचे खोलीकरणदेखील होणे आवश्यक आहे. गाळ काढून पात्र खुले केले गेले पाहिजे. एवढी कामे जरी झाली तरी मोर्णा पूर्वीसारखी वाहू लागले. अकोला शहराची लोकसंख्या भरपूर आहे. शहरात सामाजिक संस्थांची संख्यादेखील मोठी आहे. या सामाजिक संस्थांनी इतर कामे काही दिवस बाजूला ठेवून जर मोर्णा स्वच्छतेचे काम हाती घेतले तर एक महिन्याच्या आत मोर्णा मोकळी होऊन जाईल. सध्या संपूर्ण देशात स्वच्छतेची मोहीम मोठय़ा जोरात सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी सर्वांच्या हातात झाडू दिला. अकोल्यातदेखील झाडू हातात घेणार्‍यांची संख्या कमी नाही. झाडू हातात घेऊन फोटो काढून स्वत:ला गाडगेबाबानंतर आम्हीच, असे समजणारेदेखील भरपूर आहेत. या सर्वांनी महिनाभर एक तास मोर्णेच्या स्वच्छतेसाठी द्यावा, म्हणजे मोर्णाही स्वच्छ होईल आणि त्यांनाही आपण काहीतरी केले याचे समाधान मिळेल.गाव आपले आहे आणि नदी आपली आहे, ही भावना यापुढे सर्व नागरिकांना ठेवावी लागणार आहे. भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी मोर्णा जर प्रवाही राहिली तर त्याचा फायदा अकोलेकरांना मिळू शकतो. हे सर्व लक्षात घेऊन मोर्णा स्वच्छता मोहीम एक चळवळ म्हणून हाती घेण्याची आवश्यकता आहे. आजच जर आपण सावध होऊन मोर्णेचे संरक्षण केले नाही तर उद्या मोर्णा भावी पिढीला फक्त चित्रातच दाखवावी लागेल. प्रयाग येथील धार्मिक मान्यता असलेली सरस्वती नदी आज लुप्त झाली आहे. ही नदी लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळेच लुप्त झाली. तशी अवस्था मोर्णेची होऊ नये यासाठी अकोलेकरांनी आतापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे.