शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त सोयाबीन बियाणे नापास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:14 IST

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने यावर्षी खरीप हंगामासाठी बियाणांचे नियोजन केले होते; परंतु गतवर्षी सोयाबीन पिकाला अतिवृष्टीचा फटका ...

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने यावर्षी खरीप हंगामासाठी बियाणांचे नियोजन केले होते; परंतु गतवर्षी सोयाबीन पिकाला अतिवृष्टीचा फटका बसल्याने मोठ्या प्रमाणात पीक खराब झाले. बहुतांश सोयाबीनची उगवणक्षमता नसल्याने राज्यात ५० टक्केपेक्षा अधिक सोयाबीन बियाणे नापास झाले. यावर्षी बीज परीक्षण प्रयोगशाळेला सात लाख ३२ हजार ८९१ क्विंटल बियाणे प्राप्त झाले होेते.

राज्यात खरीप हंगामासाठी जवळपास ७ ते ८ लाख क्विंटल सोयाबीन बियाणांची आवश्यकता भासते. या बियाणांच्या पुरवठ्यामध्ये अर्धा वाटा हा महाबीजचा असतो. महाबीजमार्फत राज्यभरात बियाणांचे वितरण केले जाते. मागील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. विदर्भातील अनेक शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला. दरम्यान, राज्यात सोयाबीन उत्पादनात घट आली. बियाणांसाठी लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकावर याचा परिणाम झाला. या शेतकऱ्यांकडून बीज परीक्षण प्रयोगशाळेला सात लाख ३२ हजार ८९१ क्विंटल सोयाबीन बियाणे प्राप्त झाले; परंतु प्रक्रिया झाल्यानंतर चार लाख ४२ हजार ४३३ क्विंटल सोयाबीन बियाणे नापास झाले. यातील काही बियाणे काडी-कचरा साफ करून दाना लहान असल्याने प्रक्रियेआधीच काढून टाकण्यात आले होते.

प्रक्रियेसाठी प्राप्त बियाणे

७,३२,८९१ क्विंटल

प्रक्रिया झालेले बियाणे

५,८५,१३१ क्विंटल

चांगले बियाणे

४,८१,१८९ क्विंटल

प्रमाणीकरण झालेले बियाणे

२,९०,४५८

८० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी

गतवर्षी सोयाबीन बियाणाची राज्यातील ८४ हजार ९४१ हेक्टर क्षेत्रावर पेरणीसाठी नोंदणी करण्यात आली होती; परंतु यातील ८० हजार ३२७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचे पीक घेण्यात आले.

महाबीजची नियोजित उद्दिष्टपूर्ती नाही!

यंदाच्या खरीप हंगामात महाबीजचे चार लाख क्विंटल सोयाबीन बियाणे वितरणाचे उद्दिष्ट होते; परंतु मोठ्या प्रमाणात बियाणे नापास झाले. त्यामुळे राज्यात जवळपास दोन लाख क्विंटल बियाणांचे वितरण केले असून, नियोजित उद्दिष्टपूर्ती होऊ शकली नाही.

इतर पिकांचे ५३ हजार क्विंटल बियाणे प्रमाणित

राज्यातील परीक्षण प्रयोगशाळेत सोयाबीन सोबत उडीद, मूग, तूर, धान व इतर पिकांचे प्रमाणीकरण केले जाते. यामध्ये सोयाबीनवगळता इतर पिकांचे ५३ हजार क्विंटल बियाणे प्रमाणित झाले.