शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त सोयाबीन बियाणे नापास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:14 IST

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने यावर्षी खरीप हंगामासाठी बियाणांचे नियोजन केले होते; परंतु गतवर्षी सोयाबीन पिकाला अतिवृष्टीचा फटका ...

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने यावर्षी खरीप हंगामासाठी बियाणांचे नियोजन केले होते; परंतु गतवर्षी सोयाबीन पिकाला अतिवृष्टीचा फटका बसल्याने मोठ्या प्रमाणात पीक खराब झाले. बहुतांश सोयाबीनची उगवणक्षमता नसल्याने राज्यात ५० टक्केपेक्षा अधिक सोयाबीन बियाणे नापास झाले. यावर्षी बीज परीक्षण प्रयोगशाळेला सात लाख ३२ हजार ८९१ क्विंटल बियाणे प्राप्त झाले होेते.

राज्यात खरीप हंगामासाठी जवळपास ७ ते ८ लाख क्विंटल सोयाबीन बियाणांची आवश्यकता भासते. या बियाणांच्या पुरवठ्यामध्ये अर्धा वाटा हा महाबीजचा असतो. महाबीजमार्फत राज्यभरात बियाणांचे वितरण केले जाते. मागील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. विदर्भातील अनेक शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला. दरम्यान, राज्यात सोयाबीन उत्पादनात घट आली. बियाणांसाठी लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकावर याचा परिणाम झाला. या शेतकऱ्यांकडून बीज परीक्षण प्रयोगशाळेला सात लाख ३२ हजार ८९१ क्विंटल सोयाबीन बियाणे प्राप्त झाले; परंतु प्रक्रिया झाल्यानंतर चार लाख ४२ हजार ४३३ क्विंटल सोयाबीन बियाणे नापास झाले. यातील काही बियाणे काडी-कचरा साफ करून दाना लहान असल्याने प्रक्रियेआधीच काढून टाकण्यात आले होते.

प्रक्रियेसाठी प्राप्त बियाणे

७,३२,८९१ क्विंटल

प्रक्रिया झालेले बियाणे

५,८५,१३१ क्विंटल

चांगले बियाणे

४,८१,१८९ क्विंटल

प्रमाणीकरण झालेले बियाणे

२,९०,४५८

८० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी

गतवर्षी सोयाबीन बियाणाची राज्यातील ८४ हजार ९४१ हेक्टर क्षेत्रावर पेरणीसाठी नोंदणी करण्यात आली होती; परंतु यातील ८० हजार ३२७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचे पीक घेण्यात आले.

महाबीजची नियोजित उद्दिष्टपूर्ती नाही!

यंदाच्या खरीप हंगामात महाबीजचे चार लाख क्विंटल सोयाबीन बियाणे वितरणाचे उद्दिष्ट होते; परंतु मोठ्या प्रमाणात बियाणे नापास झाले. त्यामुळे राज्यात जवळपास दोन लाख क्विंटल बियाणांचे वितरण केले असून, नियोजित उद्दिष्टपूर्ती होऊ शकली नाही.

इतर पिकांचे ५३ हजार क्विंटल बियाणे प्रमाणित

राज्यातील परीक्षण प्रयोगशाळेत सोयाबीन सोबत उडीद, मूग, तूर, धान व इतर पिकांचे प्रमाणीकरण केले जाते. यामध्ये सोयाबीनवगळता इतर पिकांचे ५३ हजार क्विंटल बियाणे प्रमाणित झाले.