शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पाच जिल्ह्यांतील आयुक्तांचे निरीक्षण ठरले औपचारिकता; २० हजारांपेक्षाही अधिक आक्षेप कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 13:39 IST

अकोला : ग्रामविकास विभागाची धुरा हाकणाऱ्या जिल्हा परिषदेतील विविध प्रशासकीय, विकास कामांतील अनियमिततांवर बोट ठेवून त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडून केले जाणारे वार्षिक निरीक्षण केवळ औपचारिकता ठरत आहे.

अकोला : ग्रामविकास विभागाची धुरा हाकणाऱ्या जिल्हा परिषदेतील विविध प्रशासकीय, विकास कामांतील अनियमिततांवर बोट ठेवून त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडून केले जाणारे वार्षिक निरीक्षण केवळ औपचारिकता ठरत आहे. अमरावती विभागात २००३ पासून आयुक्तांच्या निरीक्षणातील निकाली न निघालेले २० हजारांपेक्षाही अधिक आक्षेप केवळ कागदावर आहेत. पंचायत राज समितीने त्या आक्षेपावरही बोट ठेवल्याने आता ठरावीक काळात ते निकाली काढण्याची कसरत सुरू झाली आहे.जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायतीचे प्रशासन, विकास कामे, योजनांचा खर्च योग्य पद्धतीने सुरू आहे की नाही, या बाबींची पडताळणी करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे वार्षिक निरीक्षणाची जबाबदारी आहे. या निरीक्षणात प्रशासकीय, विकास कामांच्या खर्चातील अनियमितता उघड होऊन त्या दुरुस्त करण्यासाठी संबंधितांना संधी दिली जाते. गेल्या काही वर्षात अमरावती विभागीय आयुक्तांनी निरीक्षण तर केले. त्यामध्ये आढळलेल्या अनियमिततेसंदर्भातील आक्षेपावर काहीच झाले नाही. हा प्रकार तब्बल २००३ पासून सुरू आहे. त्यामुळे विभागातील पाच जिल्हा परिषदांमध्ये २० हजारांपेक्षाही अधिक आक्षेप कागदावरच असल्याचा साक्षात्कार काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयाला झाला. आता ते आक्षेप तातडीने निकाली काढण्यासाठी पाचही जिल्हा परिषदेत कॅम्प घेऊन संबंधितांना धारेवर धरले जात आहे. त्यामध्ये अकोला जिल्हा परिषदेतील आक्षेपांची संख्या ४४०० पेक्षा अधिक आहे. गेल्या आठवड्यात त्यासाठी विभागीय आयुक्तांच्या पथकाने जिल्हा परिषदेत भेट देत आक्षेप निकाली काढण्याचे वेळापत्रक ठरवून दिले.

- ‘पीआरसी’च्या औरंगाबाद दौºयात उघड झाला गोंधळविभागीय आयुक्त कार्यालयाला अचानकपणे आक्षेपांची आठवण होण्याचे कारणही तसेच आहे. काही दिवसांपूर्वी पंचायत राज समितीने औरंगाबाद विभागातील जिल्हा परिषदेच्या दौºयात आयुक्तांच्या निरीक्षणातील आक्षेपावर काय केले, हा मुद्दाही विचारला. तेथेही आक्षेपावर काहीच झाले नसल्याचे पुढे आले. त्यामुळे अमरावती विभागातील आक्षेप तातडीने निकाली काढण्यासाठी कॅम्पचा धडाका लावण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद