शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

वारी हनुमानगड येथे पाच वर्षांत १५० हून अधिक व्यक्तींचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:22 IST

गोवर्धन गावंडे हिवरखेड : अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेले वारी हनुमानगढ हे एक निसर्गाच्या कुशीत वसलेले ...

गोवर्धन गावंडे

हिवरखेड : अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेले वारी हनुमानगढ हे एक निसर्गाच्या कुशीत वसलेले प्रेक्षणीय स्थळ. निसर्गरम्य ठिकाण असल्याने येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. मात्र, अतिउत्साहाच्या भरात अनेकांनी या ठिकाणी जीवसुद्धा गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. गत पाच वर्षांमध्ये आतापर्यंत १५० हून अधिक व्यक्तींचा मामा-भाच्याच्या डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे पर्यटनाचा आनंद लुटताना काळजी घेणे गरजेचे आहे.

तेल्हारा तालुक्यातील हिवरखेडपासून काही अंतरावर वारी हनुमानगढ प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आणि तीर्थक्षेत्र आहे. जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यभरातून या ठिकाणी भाविक तथा पर्यटक येतात. त्यामुळे येथे बारा महिनेही मोठ्या प्रमाणत गर्दी असते. चोहीकडे असलेल्या टेकड्या, हनुमानसागर प्रकल्प पर्यटकांना आकर्षित करतात, तसेच सातपुडा पर्वतरांगेत समर्थ रामदास स्वामींनी येथील हनुमान मूर्तीची स्थापना केल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी रामदास स्वामींचे छोटे मंदिर आहे. येथील देवस्थानावर भाविकांचा विश्वास असल्याने हनुमान जयंतीला या ठिकाणी मोठा उत्सव असतो. गत दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सव होऊ शकला नाही. सद्य:स्थितीत जिल्हा प्रशासनाने नियमांचे पालन करून हनुमान दर्शन व पर्यटन पूर्वरत सुरू केले आहे. त्यामुळे पर्यटकांनी मनमुराद आनंद लुटायचा असल्यास स्वत:चा जीव सांभाळणे गरजेचे आहे.

-------------------

मामा-भाच्याचा डोह धोकादायक

हनुमान मंदिर परिसरात काही डोह आहेत जे बारमाही पाण्याने भरलेले राहतात. वारी हनुमान येथे गेल्यानंतर अनेकांना पाण्यात पोहण्याचा मोह आवरता येत नाही. येथे मामा-भाच्याचा नावाने एक डोह आहे. या डोहात गेल्या पाच वर्षांत दीडशेहून अधिक व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला आहे. या डोहात कपारी असल्याने पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताच्या घटना घडतात.