शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षीही चुकले मान्सूनचे ठोकताळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2017 01:41 IST

एवढे कसे बदल झाले हो : हवामान विभागाच्या अंदाजावर शेतकऱ्यांचा प्रश्न

राजरत्न सिरसाट। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असे भाकीत भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविले होते. या अंदाजाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत कृषी निविष्ठा खरेदी केली; पण हे अंदाज सफशेल चुकल्याने शेतकऱ्यांचे दोन्ही बाजूने प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळेच एवढे अंदाज चुकतात कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून, ही जबाबदारी कोण स्वीकारण, या प्रश्नाचेही शेतक ऱ्यांना उत्तर हवे आहे.या सर्व अंदाजामुळे शेतकरी सैरभैर झाला असून, अस्मानी, सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी म्हणतो, विश्वास ठेवावा कोणावर, हवामान खात्यांची यंत्रणा एवढी कशी चुकू शकते की चुकविली, असेही प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाले आहेत. हवामान खात्यांचा एवढा मोेठा अंदाज जर चुकत असेल, तर ही यंत्रणा काय कामाची, असा सवाल शेतकरी करीत आहे. अलीकडच्या काही वर्षात अंदाज चुकले!देशातील, राज्यातील शेतकरी ‘ई-शेती‘ची कास धरीत आहेत. अनेक गावांत संगणक प्रणाली लावण्यात आली आहे. शेतकरी समूह गट तयार झाले आहेत. शेतकऱ्यांच्या कंपन्या निर्माण झाल्या आहेत. या पृष्ठभूमीवर अनेक ठिकाणी संगणक प्रणालीवर समूहाने मान्सून पावसाचा अंदाज बघतात, आता सुशिक्षित आधुनिक शेती करतानाचे चित्र आहे. यांत्रिकीकरणाचा प्रभाव वाढला आहे. कृषी अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी शेती करीत असून, अनेक यशोगाथा राज्यात आहेत. अशाच शेकडो शेतकऱ्यांना शासनाने विविध नावाने पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. एकीकडे शेतकरी आधुनिक, नवतंत्रज्ञान वापरू न शेती करीत असताना, आधुनिक तंत्रज्ञान असलेले हवामान खाते अंदाज चुकवत असल्याने आता शेती करणेच कठीण झाल्याने खिन्न मनाने युवा, शिकलेला शेतकरी सांगताना दिसतो आहे.पावसाचे अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड अािर्थक नुकसान झाले आहे. शेतकरी भरडल्या गेला आहे. याची जबादारी शासनाने स्वीकारू न शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी.- मनोज तायडे,अध्यक्ष ,शेतकरी जागर मंच, अकोला.