शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

यावर्षीही चुकले मान्सूनचे ठोकताळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2017 01:41 IST

एवढे कसे बदल झाले हो : हवामान विभागाच्या अंदाजावर शेतकऱ्यांचा प्रश्न

राजरत्न सिरसाट। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असे भाकीत भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविले होते. या अंदाजाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत कृषी निविष्ठा खरेदी केली; पण हे अंदाज सफशेल चुकल्याने शेतकऱ्यांचे दोन्ही बाजूने प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळेच एवढे अंदाज चुकतात कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून, ही जबाबदारी कोण स्वीकारण, या प्रश्नाचेही शेतक ऱ्यांना उत्तर हवे आहे.या सर्व अंदाजामुळे शेतकरी सैरभैर झाला असून, अस्मानी, सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी म्हणतो, विश्वास ठेवावा कोणावर, हवामान खात्यांची यंत्रणा एवढी कशी चुकू शकते की चुकविली, असेही प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाले आहेत. हवामान खात्यांचा एवढा मोेठा अंदाज जर चुकत असेल, तर ही यंत्रणा काय कामाची, असा सवाल शेतकरी करीत आहे. अलीकडच्या काही वर्षात अंदाज चुकले!देशातील, राज्यातील शेतकरी ‘ई-शेती‘ची कास धरीत आहेत. अनेक गावांत संगणक प्रणाली लावण्यात आली आहे. शेतकरी समूह गट तयार झाले आहेत. शेतकऱ्यांच्या कंपन्या निर्माण झाल्या आहेत. या पृष्ठभूमीवर अनेक ठिकाणी संगणक प्रणालीवर समूहाने मान्सून पावसाचा अंदाज बघतात, आता सुशिक्षित आधुनिक शेती करतानाचे चित्र आहे. यांत्रिकीकरणाचा प्रभाव वाढला आहे. कृषी अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी शेती करीत असून, अनेक यशोगाथा राज्यात आहेत. अशाच शेकडो शेतकऱ्यांना शासनाने विविध नावाने पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. एकीकडे शेतकरी आधुनिक, नवतंत्रज्ञान वापरू न शेती करीत असताना, आधुनिक तंत्रज्ञान असलेले हवामान खाते अंदाज चुकवत असल्याने आता शेती करणेच कठीण झाल्याने खिन्न मनाने युवा, शिकलेला शेतकरी सांगताना दिसतो आहे.पावसाचे अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड अािर्थक नुकसान झाले आहे. शेतकरी भरडल्या गेला आहे. याची जबादारी शासनाने स्वीकारू न शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी.- मनोज तायडे,अध्यक्ष ,शेतकरी जागर मंच, अकोला.