शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

यावर्षीही चुकले मान्सूनचे ठोकताळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2017 01:41 IST

एवढे कसे बदल झाले हो : हवामान विभागाच्या अंदाजावर शेतकऱ्यांचा प्रश्न

राजरत्न सिरसाट। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असे भाकीत भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविले होते. या अंदाजाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत कृषी निविष्ठा खरेदी केली; पण हे अंदाज सफशेल चुकल्याने शेतकऱ्यांचे दोन्ही बाजूने प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळेच एवढे अंदाज चुकतात कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून, ही जबाबदारी कोण स्वीकारण, या प्रश्नाचेही शेतक ऱ्यांना उत्तर हवे आहे.या सर्व अंदाजामुळे शेतकरी सैरभैर झाला असून, अस्मानी, सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी म्हणतो, विश्वास ठेवावा कोणावर, हवामान खात्यांची यंत्रणा एवढी कशी चुकू शकते की चुकविली, असेही प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाले आहेत. हवामान खात्यांचा एवढा मोेठा अंदाज जर चुकत असेल, तर ही यंत्रणा काय कामाची, असा सवाल शेतकरी करीत आहे. अलीकडच्या काही वर्षात अंदाज चुकले!देशातील, राज्यातील शेतकरी ‘ई-शेती‘ची कास धरीत आहेत. अनेक गावांत संगणक प्रणाली लावण्यात आली आहे. शेतकरी समूह गट तयार झाले आहेत. शेतकऱ्यांच्या कंपन्या निर्माण झाल्या आहेत. या पृष्ठभूमीवर अनेक ठिकाणी संगणक प्रणालीवर समूहाने मान्सून पावसाचा अंदाज बघतात, आता सुशिक्षित आधुनिक शेती करतानाचे चित्र आहे. यांत्रिकीकरणाचा प्रभाव वाढला आहे. कृषी अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी शेती करीत असून, अनेक यशोगाथा राज्यात आहेत. अशाच शेकडो शेतकऱ्यांना शासनाने विविध नावाने पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. एकीकडे शेतकरी आधुनिक, नवतंत्रज्ञान वापरू न शेती करीत असताना, आधुनिक तंत्रज्ञान असलेले हवामान खाते अंदाज चुकवत असल्याने आता शेती करणेच कठीण झाल्याने खिन्न मनाने युवा, शिकलेला शेतकरी सांगताना दिसतो आहे.पावसाचे अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड अािर्थक नुकसान झाले आहे. शेतकरी भरडल्या गेला आहे. याची जबादारी शासनाने स्वीकारू न शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी.- मनोज तायडे,अध्यक्ष ,शेतकरी जागर मंच, अकोला.