शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मान्सूनच्या परतीची चाहूल !

By admin | Updated: September 4, 2015 00:03 IST

राज्यात सरासरीच्या ५७ टक्केच पाऊस; ४९ टक्के पाणीसाठा.

राजरत्न सिरसाट/अकोला : यावर्षी सरासरीपेक्षा कमी बरसणार्‍या मान्सूनची परतीच्या दिशेने वाटचाल सुरू होण्याची चिन्हे असून, येत्या दोन-चार दिवसात राजस्थानातून हा मान्सून परत निघणार असल्याचा अंदाज आहे. यावर्षी सरासरीपेक्षा खूपच कमी झालेल्या पावसाने राज्यातील पीक, पाण्याची स्थिती गंभीर बनली आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ५७ टक्केच पाऊस झाल्याने सर्व धरणात केवळ ४९ टक्के जलसाठा आहे. अंदमान निकोबार बेटे, केरळ, गोवा, कोकण या राज्यात प्रवेश करणारा मान्सून सर्वात शेवटी १५ जुलैपर्यंत राजस्थानात पोहोचतो आणि १ सप्टेबरनंतर राजस्थानातूनच त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो. यावर्षी १ सप्टेंबरला मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली नाही; पण येत्या दोन-चार दिवसांत त्याचा माघारीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. राजस्थान भागात कोरडे हवामान अद्याप तयार झाले नसल्याने १ सप्टेंबरला परतणार्‍या पावसाचा सध्यातरी मुक्काम आहे. महाराष्ट्रातून दरवर्षीप्रमाणे १५ सप्टेंबरनंतर मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविली जात आहे. दरम्यान, या राज्यात आजपर्यंंत ५३0 मि.मी. पाऊस झाला असून, तो ९३६ या सरासरीच्या ५६.६ टक्के आहे. राज्यातील सर्व धरणे, जलाशयात केवळ ४९ टक्के एवढा पाणीसाठा आहे. विदर्भात सामान्य ८१४.९ मि.मी. पाऊस हवा होता. प्रत्यक्षात ६८२.८ मि.मी. पाऊस झाला आहे. म्हणजचे १६ टक्के हा पाऊस कमी आहे. आणखी पाऊस न आल्यास सामान्यापेक्षा कमी नोंद होण्याची शक्यता आहे. पश्‍चिम विदर्भातही विदारक चित्र आहे. या भागात पाऊस नाही आणि तापमान वाढल्याने पिकांचे नुकसान होत असून, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जागतिक हवामान संघटना व इतर विदेशी हवामानशास्त्राच्या अंदाजानुसार यावर्षी कमी पाऊस झाला असून, परतीच्या पावसाला सुरुवात होण्याची चिन्हे तयार झाली आहेत. पण, वातावरणात तापमान वाढत असल्याने पावसाची शक्यता पुणे येथील जेष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली.

धरणात ४९ टक्केच जलसाठा

         राज्यातील सर्व धरणात आजमितीस ४९ टक्के जलसाठा असून, गेल्यावर्षी याच सुमारास हा साठा ६६ टक्के होता. मराठवाड्यात आजमितीस ८ टक्के जलसाठा असून, कोकण ८५ टक्के, नागपूर ७३ टक्के, अमरावती विभाग ४७ टक्के, नाशिक ४१ टक्के, पुणे ५0 टक्के व इतर धरणात ७१ टक्के, असा सरासरी ४९ टक्के जलसाठा आहे. दोन हजारांवर गावांना टॅँकरने पाणीपुरवठा राज्यातील १५७६ गावे आणि २,८९६ वाड्यांना सध्या १९८९ टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

रोहयोच्या कामावर ८९ हजार मजूर

       दरम्यान, या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यात दुष्काळी कामे सुरू करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत असून, आजमितीस महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत १२ हजार २६४ कामे सुरू करण्यात आली असून, ८८ हजार ८४५ मजुरांना काम देण्यात आले आहे. राज्यात ४ लाख २६ हजार ६३५ कामे असून, त्या कामाची मंजुरी क्षमता १३0३.३८ लाख एवढी आहे.

उत्पादन घटणार

         यावर्षी राज्यात १२७.८९ लाख हेक्टर म्हणजेच ९५ टक्के क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी झाली असून, सुरुवातीला दीड महिना आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात झालेल्या किरकोळ पावसानंतर आतापर्यंंत पावसाने दडी मारली आहे. सतत पावसाचा ताण सहन करणार्‍या पिकांची वाढ खुंटली असून, बदलत्या हवामानामुळे किडींनी या पिकावर आक्रमण केले आहे. मराठवाडा व इतर कमी पाऊस झालेल्या राज्यातील मध्य, उत्तर व पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भागात उत्पादन निघणेच कठीण झाले, तर विदर्भातील स्थिती किंबहुना अशीच आहे. त्यामुळे यावर्षी शेतीचे अर्थचक्रच थांबले म्हणावे लागणार आहे.

सात-आठ तारेखला विदर्भात पावसाची शक्यता

          दरम्यान, येत्या ७ व ८ सप्टेंबर रोजी विदर्भात पाऊस येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. तसे चित्र तयार होत आहे.