शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

पावसाळा संपल्यानंतर लागला पावसाळा!

By admin | Updated: April 14, 2015 00:20 IST

ऑक्टोबर ते एप्रिलपर्यंत २६५ मि.मी.झाला पाऊस ; ऋतूचक्र बदलले?

अकोला : पावसाळा संपल्यानंतर पावसाळा लागल्याचे चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे. ऑक्टोबर ते एप्रिलपर्यंत २६५ मि.मी. पावसाची नोंद नागपूर हवामानशास्त्र विभागाने केली आहे. यावर्षी प्रत्येक महिन्यात पाऊस येत असल्याने ऋ तूचक्र बदलल्याचे हे संकेत मानले जात आहेत. अकोला जिल्हय़ात सरासरी पावसाचे प्रमाण हे ७00 मि.मी.च्यावर आहे. मागीलवर्षी पावसाने पाठ फिरवली. यावर्षी पावसाचा कालावधी समजल्या जाणार्‍या जून ते सप्टेंबर या चार महिन्यात केवळ ५७२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर २0१४ पासून ते एप्रिल २0१५ पर्यंत २६५ मि.मी. पावसाची नोंद झाली. अद्याप पावसाची शक्यता कायम असून, मागील वर्षी पडलेल्या पावसाची सरासरी हा पाऊस गाठतो की काय, असेच एकूण चित्र आहे. २0१२-१३ या जिल्हय़ात केवळ ६७४ मि.मी. पाऊस पडला. २0१३-१४ मध्ये ८९४ मि.मी. पाऊस झाला आणि १४-१५ मध्ये पावसाळ्य़ात केवळ ५७२ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. डिसेंबरपर्यंत या पावसाची ६८0.७0 मि.मी. नोंद झाली आहे. या पाच वर्षांत पावसाचे सरासरी चित्र बदलले असून, कधी कमी तर कधी जास्त, असे या पावसाचे स्वरू प आहे. २0१४-१५ या वर्षात १४0 मि.मी. पाऊस २३ जुलै व ९0 मि.मी. पाऊस ८ सप्टेंबर या एकाच दिवशी पडला आहे. म्हणजेच पावसाळ्य़ातील अर्धापाऊस हा एकाच दिवशी काही तासात कोसळत असल्याचे या पावसाच्या आकडेवारीवरू न निदर्शनास येत आहे. यासंदर्भात डॉ कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. सुभाष टाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पावसाळय़ाचे स्वरू प बदलले असल्याचे सांगीतले. अलीकडच्या काही वर्षात सरासरी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. संपूर्ण पावसाळ्य़ा तील पाऊस हा १६ ते १८ तासात पडत असून, अवेळी पाऊस वाढला आहे. संपूर्ण पावसाळ्य़ात गेल्यावर्षी केवळ ५७२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. परंतु त्यानंतर आजपर्यंत २५0 मि.मी. च्यावर पाऊस पडला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.