शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

अकोला जिल्हय़ातील तीन लाख विद्यार्थ्यांना मोदींचा संदेश

By admin | Updated: September 6, 2014 02:32 IST

भाषणातील संदेश जिल्हय़ातील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

अकोला - शिक्षक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील संदेश जिल्ह्यातील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. यासाठी शिक्षक विभाग, शाळा व्यवस्थापन, शिक्षक, मुख्याध्यापकांना चांगलीच धावपळ करावी लागल्याचे दिसून आले. पंतप्रधानांचा संदेश विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक सुविधा जिल्ह्यातील ४० टक्के शाळांमध्ये नव्हत्या; मात्र तरीही प्रशासनाने मोबाईल व रेडिओच्या माध्यमातून हा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात जवळपास १ हजार ५६४ शाळांमधील सुमारे ३ लाख ३३ हजार १२५ विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश पोहोचविण्यात आला. दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. ९० मिनिटांचा त्यांचा हा संवाद ४ वाजून ४५ मिनिटांनी आटोपला. यावेळी विद्यार्थ्यांनी मोदींशी मनमोकळेपणाने प्रश्न विचारुन विविध बाबींवर त्यांचे मत जाणून घेतले. जिल्ह्यातील तीन लाख विद्यार्थ्यांपैकी दोन ते अडीच लाख विद्यार्थ्यांना भाषण ऐकविण्याची सुविधा होती; मात्र उर्वरित जवळपास एक लाख विद्यार्थ्यांच्या कानावर पंतप्रधानांचे शब्द पडावेत, यासाठी शिक्षण विभागाने परिश्रम घेतल्याचे दिसून आले. पंतप्रधानांचे विचार देशातील विद्यार्थी व शिक्षकापर्यंत पोहोचावे, अशी केंद्र सरकारची मनीषा बहुतांश प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसून आले. माध्यमिक शिक्षण विभागाच्या जिल्ह्यात ४३० शाळा असून, त्यापैकी बहुतांश शाळांमध्ये टीव्ही व रेडिओ उपलब्ध आहेत. मागास आणि दुर्गम भागात काही टीव्ही संच उपलब्ध करण्यात आले होते. मुख्याध्यापक व शिक्षकांनी टीव्ही संच मोबाईल व रेडिओद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत संदेश पोहोचविण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पंतप्रधानांचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाने केला असल्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक सोनवने यांनी सांगीतले. माध्यमिक शिक्षण विभागाच्या ४३० शाळेमधील १ लाख २५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश पोहोचविण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाºयांनी दिली.