शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
3
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
4
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
5
घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...
6
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर किती GST आकारणार? सरकारने संसदेत दिले उत्तर
7
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
8
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
9
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
10
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का
11
टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
12
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
13
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
14
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
15
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
16
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
17
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
18
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
19
Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या
20
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?

मोदीच हवेत; पण भ्रष्टाचाराला आळा बसवा! ; अकोला ते पातूर प्रवासादरम्यान प्रवाशांचा सूर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:45 IST

राष्ट्रहिताचा मुद्दा लक्षात घेता चीन व पाकिस्तानाला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधानपदी मोदीच हवेत; पण भ्रष्टाचारालाही आळा बसावा असा सूर अकोला ते पातूर प्रवासादरम्यान एसटीतील प्रवाशांमधून उमटला.

अकोला: उण्यापुऱ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारने जागतिक स्तरावर भारताचे स्थान मजबूत केल्याचे पाकिस्तानवरील हल्ल्यावरून दिसून आले. पुलवामातील भ्याड हल्ल्यानंतर जगातील प्रमुख देश भारताच्या बाजूने उभे होते. यावरून भारताचे नेतृत्व कणखर असल्याचे दिसते. राष्ट्रहिताचा मुद्दा लक्षात घेता चीन व पाकिस्तानाला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधानपदी मोदीच हवेत; पण भ्रष्टाचारालाही आळा बसावा असा सूर अकोला ते पातूर प्रवासादरम्यान एसटीतील प्रवाशांमधून उमटला.अकोला ते पातूर प्रवासादरम्यान एसटी बसमध्ये सतीश देशमुख यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर केंद्र व राज्य शासनाने आणखी कठोर पाऊले उचलण्याची मागणी केली. भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सर्वसामान्यांना कमालीचा मानसिक त्रास होतो. आर्थिक शोषणाला आळा घालण्यासाठी शासनाने कायद्यात सुधारणा करण्याची मागणी त्यांनी केली. केंद्रात भाजप असो वा काँग्रेस सरकार त्यांनी देशहितासोबतच विकासाला प्राधान्य देण्याचे मत देशमुख यांनी मांडले. मोहन शर्मा म्हणाले की देशाचे नेतृत्व करणारा व्यक्त कणखर व सक्षम असला पाहिजे. आजच्या घडीला असे नेतृत्व लाभल्याचे दिसून येते. केवळ पदासाठी एकत्र येणाºया राजकीय पक्षांना दूर सारण्याची गरज आहे. त्यामुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोणीही असो, सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची हीच वेळ असून, मतदानाच्या माध्यमातून शक्य असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. मागील पाच वर्षांच्या कालावधीत केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात कामे केली. आजपर्यंत इतर राजकीय पक्षांना वारंवार संधी देण्यात आली. त्याचे परिणामही दिसून आले. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा मोदी यांच्या पारड्यात मतांचे दान देणार असल्याचे मत प्रणय भुईभार यांनी व्यक्त केले. वंशपरंपरेला फाटा देऊन सुशिक्षित तरुणांना निवडून देण्याचे मत यावेळी प्रवाशांनी व्यक्त केले. संजीवनी सांगळे यांनी यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांबाबत मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी भावना गवळी यांच्या कामावर समाधानी असल्याचे सांगितले. पाच वर्षानंतर हा उत्सव, मोठा पर्व आहे. मजबूत सरकार देण्यासाठी मतदानासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचा सूरही यावेळी उमटला. भंते विजय किर्ते यांनी एसटी बसच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली. जगन मोरे यांनी चीन व पाकिस्तानच्या धोरणांवर सडकून टीका केली. या दोन्ही देशांना धडा शिकवण्यासाठी मोदींची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्या!देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असली, तरी आजपर्यंत केंद्र अथवा राज्यातील कोण्याही पक्षाच्या सरकारने ठोस धोरण आखले नसल्याचे मत पातूर येथील संदीप उगले यांनी व्यक्त केले. शेतमालाला हमीभाव देणारी यंत्रणा उभारण्याची गरज असून, सिंचनाची शस्रविधा, विद्यस्रत पुरवठा तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी कठोर नियम करणारे सरकार हवे,अशी भावना उगले यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक