शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मोदीच हवेत; पण भ्रष्टाचाराला आळा बसवा! ; अकोला ते पातूर प्रवासादरम्यान प्रवाशांचा सूर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:45 IST

राष्ट्रहिताचा मुद्दा लक्षात घेता चीन व पाकिस्तानाला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधानपदी मोदीच हवेत; पण भ्रष्टाचारालाही आळा बसावा असा सूर अकोला ते पातूर प्रवासादरम्यान एसटीतील प्रवाशांमधून उमटला.

अकोला: उण्यापुऱ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारने जागतिक स्तरावर भारताचे स्थान मजबूत केल्याचे पाकिस्तानवरील हल्ल्यावरून दिसून आले. पुलवामातील भ्याड हल्ल्यानंतर जगातील प्रमुख देश भारताच्या बाजूने उभे होते. यावरून भारताचे नेतृत्व कणखर असल्याचे दिसते. राष्ट्रहिताचा मुद्दा लक्षात घेता चीन व पाकिस्तानाला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधानपदी मोदीच हवेत; पण भ्रष्टाचारालाही आळा बसावा असा सूर अकोला ते पातूर प्रवासादरम्यान एसटीतील प्रवाशांमधून उमटला.अकोला ते पातूर प्रवासादरम्यान एसटी बसमध्ये सतीश देशमुख यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर केंद्र व राज्य शासनाने आणखी कठोर पाऊले उचलण्याची मागणी केली. भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सर्वसामान्यांना कमालीचा मानसिक त्रास होतो. आर्थिक शोषणाला आळा घालण्यासाठी शासनाने कायद्यात सुधारणा करण्याची मागणी त्यांनी केली. केंद्रात भाजप असो वा काँग्रेस सरकार त्यांनी देशहितासोबतच विकासाला प्राधान्य देण्याचे मत देशमुख यांनी मांडले. मोहन शर्मा म्हणाले की देशाचे नेतृत्व करणारा व्यक्त कणखर व सक्षम असला पाहिजे. आजच्या घडीला असे नेतृत्व लाभल्याचे दिसून येते. केवळ पदासाठी एकत्र येणाºया राजकीय पक्षांना दूर सारण्याची गरज आहे. त्यामुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोणीही असो, सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची हीच वेळ असून, मतदानाच्या माध्यमातून शक्य असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. मागील पाच वर्षांच्या कालावधीत केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात कामे केली. आजपर्यंत इतर राजकीय पक्षांना वारंवार संधी देण्यात आली. त्याचे परिणामही दिसून आले. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा मोदी यांच्या पारड्यात मतांचे दान देणार असल्याचे मत प्रणय भुईभार यांनी व्यक्त केले. वंशपरंपरेला फाटा देऊन सुशिक्षित तरुणांना निवडून देण्याचे मत यावेळी प्रवाशांनी व्यक्त केले. संजीवनी सांगळे यांनी यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांबाबत मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी भावना गवळी यांच्या कामावर समाधानी असल्याचे सांगितले. पाच वर्षानंतर हा उत्सव, मोठा पर्व आहे. मजबूत सरकार देण्यासाठी मतदानासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचा सूरही यावेळी उमटला. भंते विजय किर्ते यांनी एसटी बसच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली. जगन मोरे यांनी चीन व पाकिस्तानच्या धोरणांवर सडकून टीका केली. या दोन्ही देशांना धडा शिकवण्यासाठी मोदींची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्या!देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असली, तरी आजपर्यंत केंद्र अथवा राज्यातील कोण्याही पक्षाच्या सरकारने ठोस धोरण आखले नसल्याचे मत पातूर येथील संदीप उगले यांनी व्यक्त केले. शेतमालाला हमीभाव देणारी यंत्रणा उभारण्याची गरज असून, सिंचनाची शस्रविधा, विद्यस्रत पुरवठा तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी कठोर नियम करणारे सरकार हवे,अशी भावना उगले यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक