शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोदीच हवेत; पण भ्रष्टाचाराला आळा बसवा! ; अकोला ते पातूर प्रवासादरम्यान प्रवाशांचा सूर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:45 IST

राष्ट्रहिताचा मुद्दा लक्षात घेता चीन व पाकिस्तानाला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधानपदी मोदीच हवेत; पण भ्रष्टाचारालाही आळा बसावा असा सूर अकोला ते पातूर प्रवासादरम्यान एसटीतील प्रवाशांमधून उमटला.

अकोला: उण्यापुऱ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारने जागतिक स्तरावर भारताचे स्थान मजबूत केल्याचे पाकिस्तानवरील हल्ल्यावरून दिसून आले. पुलवामातील भ्याड हल्ल्यानंतर जगातील प्रमुख देश भारताच्या बाजूने उभे होते. यावरून भारताचे नेतृत्व कणखर असल्याचे दिसते. राष्ट्रहिताचा मुद्दा लक्षात घेता चीन व पाकिस्तानाला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधानपदी मोदीच हवेत; पण भ्रष्टाचारालाही आळा बसावा असा सूर अकोला ते पातूर प्रवासादरम्यान एसटीतील प्रवाशांमधून उमटला.अकोला ते पातूर प्रवासादरम्यान एसटी बसमध्ये सतीश देशमुख यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर केंद्र व राज्य शासनाने आणखी कठोर पाऊले उचलण्याची मागणी केली. भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सर्वसामान्यांना कमालीचा मानसिक त्रास होतो. आर्थिक शोषणाला आळा घालण्यासाठी शासनाने कायद्यात सुधारणा करण्याची मागणी त्यांनी केली. केंद्रात भाजप असो वा काँग्रेस सरकार त्यांनी देशहितासोबतच विकासाला प्राधान्य देण्याचे मत देशमुख यांनी मांडले. मोहन शर्मा म्हणाले की देशाचे नेतृत्व करणारा व्यक्त कणखर व सक्षम असला पाहिजे. आजच्या घडीला असे नेतृत्व लाभल्याचे दिसून येते. केवळ पदासाठी एकत्र येणाºया राजकीय पक्षांना दूर सारण्याची गरज आहे. त्यामुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोणीही असो, सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची हीच वेळ असून, मतदानाच्या माध्यमातून शक्य असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. मागील पाच वर्षांच्या कालावधीत केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात कामे केली. आजपर्यंत इतर राजकीय पक्षांना वारंवार संधी देण्यात आली. त्याचे परिणामही दिसून आले. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा मोदी यांच्या पारड्यात मतांचे दान देणार असल्याचे मत प्रणय भुईभार यांनी व्यक्त केले. वंशपरंपरेला फाटा देऊन सुशिक्षित तरुणांना निवडून देण्याचे मत यावेळी प्रवाशांनी व्यक्त केले. संजीवनी सांगळे यांनी यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांबाबत मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी भावना गवळी यांच्या कामावर समाधानी असल्याचे सांगितले. पाच वर्षानंतर हा उत्सव, मोठा पर्व आहे. मजबूत सरकार देण्यासाठी मतदानासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचा सूरही यावेळी उमटला. भंते विजय किर्ते यांनी एसटी बसच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली. जगन मोरे यांनी चीन व पाकिस्तानच्या धोरणांवर सडकून टीका केली. या दोन्ही देशांना धडा शिकवण्यासाठी मोदींची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्या!देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असली, तरी आजपर्यंत केंद्र अथवा राज्यातील कोण्याही पक्षाच्या सरकारने ठोस धोरण आखले नसल्याचे मत पातूर येथील संदीप उगले यांनी व्यक्त केले. शेतमालाला हमीभाव देणारी यंत्रणा उभारण्याची गरज असून, सिंचनाची शस्रविधा, विद्यस्रत पुरवठा तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी कठोर नियम करणारे सरकार हवे,अशी भावना उगले यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक