शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

आधुनिक शेती, फलोत्पादनावर होणार मंथन!

By admin | Updated: November 27, 2015 01:37 IST

दापोलीत आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र परिषद; ११ देशांचे अभ्यासक, शास्त्रज्ञ घेणार सहभाग

अकोला : बदलते हवामान आणि कृषिउत्पादनावर होणारे त्यांचे दुष्परिणाम यामुळे अन्नसुरक्षेचा धोका निर्माण होण्याची शक्यता असून, कृषी संस्था, शास्त्रज्ञांपुढे हे एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी कृषीशी निगडित सर्वच पातळ्ीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. कृषी अर्थशास्त्र विषयातील तज्ज्ञांनीसुद्धा ह्यकृषी अर्थह्ण या विषयावर लक्ष केंद्रित केले आहे. या दृष्टीने महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र परिषदेने येत्या फेब्रुवारीमध्ये दापोली येथे आंतराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र परिषदेचे नियोजन केले आहे. या परिषदेत ११ देशांचे अभ्यासक, तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. देशभरात बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अर्थात कोरडवाहू शेतीचे प्रमाण हे ८0 टक्क्य़ांच्या वर आहे. अलीकडच्या काही वर्षांत नैसर्गिक संतुलन बिघडल्याने पावसाची अनिश्‍चितता वाढली आहे. याला बदलते हवामान कारणीभूत मानले जात असून, याचाच सामना करण्यासाठी या बदलत्या हवामानाला अनुकूल प्रजाती व इतर कृषिजन्य उपाययोजना करण्यावर जगभरात प्रयत्न सुरू आहेत. देशांतर्गत कृषी संस्था, विद्यापीठांनी संशोधन हाती घेतले आहे. या पृष्ठभूमीवर महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र परिषदेने मागील काही वर्षांपासून कृषी अर्थशास्त्रावर लक्ष केंद्रित केले असून, परिषदांच्या माध्यमातून अनेक विषय हाताळले जात आहेत. येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी जिलतील दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापाठात आंतराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला भारतातील कृषी अर्थशास्त्रज्ञांसह ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, थायलंड, ब्रिटन, अमेरिकासह ११ देशांतील शास्त्रज्ञ, अभ्यासक सहभागी होणार आहेत. या परिषदेत अर्थपुरवठय़ाचे आधुनिक शेती व फलोत्पादनावर होणारे परिणाम, कृषी तथा फलोत्पादनावरील मूल्यशृखंला विश्लेषण, फलोत्पादन प्रक्रिया व कारखानदारी बळकटीकरण, कृषी निविष्ठा, उद्योग, मत्स्यपालन व प्रक्रिया व्यवसायाचे अर्थकारण यांसह अनेक विषयांवर मंथन होणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश महेंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रथमच विविध देशांतून २१८ संशोधन पेपर्स परिषदेला प्राप्त झाले असल्याचे सांगीतले. प्रथमच आंतराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र परिषद घेण्यात येत असून कृषीशी निगडित सूक्ष्म बाबी हाताळल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले.