शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

मोबाईल नेटवर्क, कॉल ड्रॉपला ग्राहक वैतागले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:26 IST

गेल्या काही महिन्यांपूर्वी मोबाईल सेवेचे दर मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले. शिवाय दर महिन्याला एका ठरावीक रकमेचे रिचार्ज करावेच लागेल, ...

गेल्या काही महिन्यांपूर्वी मोबाईल सेवेचे दर मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले. शिवाय दर महिन्याला एका ठरावीक रकमेचे रिचार्ज करावेच लागेल, असा नियम लागू करण्यात आला. मात्र दर वाढविल्यानंतरही मोबाईल सेवेचा दर्जा मात्र सुधारण्याऐवजी आणखी खालावला आहे. आगर विविध मोबाइल कंपन्यांचे मोबाईलधारक आहेत. त्यापैकी अनेक मोबाइल धारकांच्या चांगल्या दर्जाच्या मोबाईल हँडसेटला इंटरनेटची रेंज मिळत नाही. मिळाली तरी ती दर्जाहीन असल्याने डाउनलोडिंगमध्ये किंवा अपलोडिंगमध्ये प्रचंड अडचणी येतात. ४ जीच्या नावाने पैसे उकळणाऱ्या कंपन्यांकडून दिल्या जाणारी इंटरनेट सेवा ही २ जी पेक्षाही वाईट दर्जाची असल्याचे अनेक मोबाईलधारकांचे अनुभव आहेत. याशिवाय याशिवाय अनेक मोबाईलधारकांनी कॉल केल्यानंतर ते लागत नाहीत. लागले तर आपोआप कट होतात. बोलणे सुरू असताना मध्येच आपोआप कॉल कट झाल्याने व पुन्हा कॉल लावल्यानंतर तो लागत नसल्याने प्रचंड मनस्ताप होतो.

म्हणायला फोरजी, सेवा टूजी पेक्षाही वाईट

४ जी सेवेच्या नावाने पैसे उकडूनही २ जी पेक्षाही वाईट दर्जाची सेवा मोबाईल ग्राहकांना मिळत असल्याने मोबाईल ग्राहकांमध्ये मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्या विरुद्ध प्रचंड रोष व वैताग आहे. परंतु याबाबत तक्रार कुठे करावी हे अनेकांना माहीत नाही. संबंधित मोबाईल कंपनीच्या कस्टमर केअरला फोन केल्यानंतर हे कस्टमर केअरचे फोन म्हणजे त्यापेक्षाही मोठी डोकेदुखी आहे. त्यामुळे या सर्व मानसिक त्रासापासून मोबाईलधारकांची मुक्तता करण्यासाठी वरिष्ठ लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा.