शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मोबाईलने ‘मेमरी’ घालविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:23 IST

असे का होते मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमधील पेशन्स कमी झाला आहे. सर्वकाही एका क्लिकवर मिळत असल्याने कुठलीही गोष्ट लक्षात ठेवण्याची ...

असे का होते

मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमधील पेशन्स कमी झाला आहे. सर्वकाही एका क्लिकवर मिळत असल्याने कुठलीही गोष्ट लक्षात ठेवण्याची त्यांच्यात सवय राहिली नाही.

लहान मुलांसोबतच तरुणांमध्येही ही समस्या दिसून येत आहे. मेमरी आहे तेवढीच आहे, मात्र कुठलीही गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी ते प्रयत्न करत नाहीत.

सर्वांची मेमरी आहे तशीच राहते. मेंदूचा वापर न केल्यास त्याची वाढ किंवा त्याचा गरजेनुसार विकास होत नाही. त्यामुळे कुठल्याही गोष्टी लक्षात ठेवण्याची शक्ती त्यांच्यात कमी होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हे टाळण्यासाठी

मुलांना वेळ देणे सर्वच घरात शक्य नाही.

पालकांनी मुलांना वेळ देणे गरजेचे आहे.

ॲक्टिव्हली त्यांच्यासोबत प्रत्यक्ष सहभागी होणे गरजेचे आहे.

मुलांच्या आवडीनुसार त्यांच्या खेळामध्ये पालकांनी सहभागी व्हावे.

मुलांना शारीरिक व्यायामाची गरज आहे. त्यामध्येही पालकांचा सहभाग हवा.

मोबाईल वापरण्याचा वेळ निश्चित असायला हवा.

मुलांसमोर पालकांनी मोबाईलचा वापर कमी करावा.

मुलांना, आजोबाला नंबर्स पाठ, कारण...

आजोबा

आमच्या काळात मोबाईल नव्हते. त्यामुळे कुठल्याही विषयाकडे अभ्यासपूर्ण लक्ष दिले जात होते. त्याचा उपयोग गणितासारख्या विषयात आणि नंतर व्यावहारिक जीवनात झाल्याची माहिती विठ्ठल पडोळे यांनी दिली.

आई

मागील वर्षभरापासून मुलाची शाळा बंद आहे. शाळेचे वर्ग हे ऑनलाइन होत असल्याने मुलाच्या हाती मोबाईल द्यावा लागला. कमी वयात जास्त काळ मोबाईल मुलांच्या हाती देणे योग्य नसल्याने आम्ही देखील घरामध्ये मोबाईलचा वापर टाळतो. मी स्वत: मुलांची शिकवणी घेत असल्याने मोबाईलचा वापरही कॉलिंगपुरताच केला जात असल्याचे पूनम पडोळे यांनी सांगितले.

लहान मुलगा

शाळा बंद असल्याने वर्ग मोबाईलवरच होतात, मात्र त्यानंतर आईबाबा मोबाईलला हात लावू देत नाहीत. त्यामुळे अभ्यास झाल्यावर सायंकाळी सायकलिंग किंवा क्रिकेट खेळत असल्याचे शिवम पडोळे याने सांगितले.

मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांसोबतच तरुणांमध्येही पेशन्सची कमी झाली आहे. त्यांना सर्वकाही एका क्लिकवर मिळण्याची अपेक्षा असते. त्यामुळे ते कुठलीही गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करीत नाहीत. हा प्रकार टाळण्यासाठी पालकांनी मुलांसोबत वेळ घालविण्याची गरज आहे. तसेच कुटुंबात मोबाईलचा वापर कमी करण्याची गरज आहे.

- डॉ. शिल्पा तायडे, मनसोपचार तज्ज्ञ, जीएमसी, अकोला