शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलने ‘मेमरी’ घालविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:23 IST

असे का होते मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमधील पेशन्स कमी झाला आहे. सर्वकाही एका क्लिकवर मिळत असल्याने कुठलीही गोष्ट लक्षात ठेवण्याची ...

असे का होते

मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमधील पेशन्स कमी झाला आहे. सर्वकाही एका क्लिकवर मिळत असल्याने कुठलीही गोष्ट लक्षात ठेवण्याची त्यांच्यात सवय राहिली नाही.

लहान मुलांसोबतच तरुणांमध्येही ही समस्या दिसून येत आहे. मेमरी आहे तेवढीच आहे, मात्र कुठलीही गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी ते प्रयत्न करत नाहीत.

सर्वांची मेमरी आहे तशीच राहते. मेंदूचा वापर न केल्यास त्याची वाढ किंवा त्याचा गरजेनुसार विकास होत नाही. त्यामुळे कुठल्याही गोष्टी लक्षात ठेवण्याची शक्ती त्यांच्यात कमी होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हे टाळण्यासाठी

मुलांना वेळ देणे सर्वच घरात शक्य नाही.

पालकांनी मुलांना वेळ देणे गरजेचे आहे.

ॲक्टिव्हली त्यांच्यासोबत प्रत्यक्ष सहभागी होणे गरजेचे आहे.

मुलांच्या आवडीनुसार त्यांच्या खेळामध्ये पालकांनी सहभागी व्हावे.

मुलांना शारीरिक व्यायामाची गरज आहे. त्यामध्येही पालकांचा सहभाग हवा.

मोबाईल वापरण्याचा वेळ निश्चित असायला हवा.

मुलांसमोर पालकांनी मोबाईलचा वापर कमी करावा.

मुलांना, आजोबाला नंबर्स पाठ, कारण...

आजोबा

आमच्या काळात मोबाईल नव्हते. त्यामुळे कुठल्याही विषयाकडे अभ्यासपूर्ण लक्ष दिले जात होते. त्याचा उपयोग गणितासारख्या विषयात आणि नंतर व्यावहारिक जीवनात झाल्याची माहिती विठ्ठल पडोळे यांनी दिली.

आई

मागील वर्षभरापासून मुलाची शाळा बंद आहे. शाळेचे वर्ग हे ऑनलाइन होत असल्याने मुलाच्या हाती मोबाईल द्यावा लागला. कमी वयात जास्त काळ मोबाईल मुलांच्या हाती देणे योग्य नसल्याने आम्ही देखील घरामध्ये मोबाईलचा वापर टाळतो. मी स्वत: मुलांची शिकवणी घेत असल्याने मोबाईलचा वापरही कॉलिंगपुरताच केला जात असल्याचे पूनम पडोळे यांनी सांगितले.

लहान मुलगा

शाळा बंद असल्याने वर्ग मोबाईलवरच होतात, मात्र त्यानंतर आईबाबा मोबाईलला हात लावू देत नाहीत. त्यामुळे अभ्यास झाल्यावर सायंकाळी सायकलिंग किंवा क्रिकेट खेळत असल्याचे शिवम पडोळे याने सांगितले.

मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांसोबतच तरुणांमध्येही पेशन्सची कमी झाली आहे. त्यांना सर्वकाही एका क्लिकवर मिळण्याची अपेक्षा असते. त्यामुळे ते कुठलीही गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करीत नाहीत. हा प्रकार टाळण्यासाठी पालकांनी मुलांसोबत वेळ घालविण्याची गरज आहे. तसेच कुटुंबात मोबाईलचा वापर कमी करण्याची गरज आहे.

- डॉ. शिल्पा तायडे, मनसोपचार तज्ज्ञ, जीएमसी, अकोला