शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

मोबाईलने ‘मेमरी’ घालविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:23 IST

असे का होते मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमधील पेशन्स कमी झाला आहे. सर्वकाही एका क्लिकवर मिळत असल्याने कुठलीही गोष्ट लक्षात ठेवण्याची ...

असे का होते

मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमधील पेशन्स कमी झाला आहे. सर्वकाही एका क्लिकवर मिळत असल्याने कुठलीही गोष्ट लक्षात ठेवण्याची त्यांच्यात सवय राहिली नाही.

लहान मुलांसोबतच तरुणांमध्येही ही समस्या दिसून येत आहे. मेमरी आहे तेवढीच आहे, मात्र कुठलीही गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी ते प्रयत्न करत नाहीत.

सर्वांची मेमरी आहे तशीच राहते. मेंदूचा वापर न केल्यास त्याची वाढ किंवा त्याचा गरजेनुसार विकास होत नाही. त्यामुळे कुठल्याही गोष्टी लक्षात ठेवण्याची शक्ती त्यांच्यात कमी होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हे टाळण्यासाठी

मुलांना वेळ देणे सर्वच घरात शक्य नाही.

पालकांनी मुलांना वेळ देणे गरजेचे आहे.

ॲक्टिव्हली त्यांच्यासोबत प्रत्यक्ष सहभागी होणे गरजेचे आहे.

मुलांच्या आवडीनुसार त्यांच्या खेळामध्ये पालकांनी सहभागी व्हावे.

मुलांना शारीरिक व्यायामाची गरज आहे. त्यामध्येही पालकांचा सहभाग हवा.

मोबाईल वापरण्याचा वेळ निश्चित असायला हवा.

मुलांसमोर पालकांनी मोबाईलचा वापर कमी करावा.

मुलांना, आजोबाला नंबर्स पाठ, कारण...

आजोबा

आमच्या काळात मोबाईल नव्हते. त्यामुळे कुठल्याही विषयाकडे अभ्यासपूर्ण लक्ष दिले जात होते. त्याचा उपयोग गणितासारख्या विषयात आणि नंतर व्यावहारिक जीवनात झाल्याची माहिती विठ्ठल पडोळे यांनी दिली.

आई

मागील वर्षभरापासून मुलाची शाळा बंद आहे. शाळेचे वर्ग हे ऑनलाइन होत असल्याने मुलाच्या हाती मोबाईल द्यावा लागला. कमी वयात जास्त काळ मोबाईल मुलांच्या हाती देणे योग्य नसल्याने आम्ही देखील घरामध्ये मोबाईलचा वापर टाळतो. मी स्वत: मुलांची शिकवणी घेत असल्याने मोबाईलचा वापरही कॉलिंगपुरताच केला जात असल्याचे पूनम पडोळे यांनी सांगितले.

लहान मुलगा

शाळा बंद असल्याने वर्ग मोबाईलवरच होतात, मात्र त्यानंतर आईबाबा मोबाईलला हात लावू देत नाहीत. त्यामुळे अभ्यास झाल्यावर सायंकाळी सायकलिंग किंवा क्रिकेट खेळत असल्याचे शिवम पडोळे याने सांगितले.

मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांसोबतच तरुणांमध्येही पेशन्सची कमी झाली आहे. त्यांना सर्वकाही एका क्लिकवर मिळण्याची अपेक्षा असते. त्यामुळे ते कुठलीही गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करीत नाहीत. हा प्रकार टाळण्यासाठी पालकांनी मुलांसोबत वेळ घालविण्याची गरज आहे. तसेच कुटुंबात मोबाईलचा वापर कमी करण्याची गरज आहे.

- डॉ. शिल्पा तायडे, मनसोपचार तज्ज्ञ, जीएमसी, अकोला