शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

विमा काढण्याच्या नावाखाली मोबाइलधारकांची फसवणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2017 01:56 IST

अ‍ॅप डेली कंपनीने कार्यालय केले बंद: पैसे घेऊन एजंट पसार; न्यायालयाकडे तक्रार

अकोला: मोबाइल खरेदी केल्यानंतर त्याचा विमा काढण्याच्या नावाखाली मुंबईच्या अ‍ॅप डेली कंपनीने जिल्ह्यातील शेकडो मोबाइलधारकांची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, अ‍ॅप डेली नावाच्या नावाखाली वर्षभरातच अकोल्यातील कार्यालय गुंडाळून पोबारासुद्धा केला. यासंदर्भात पंचशील नगरात राहणारे श्यामसुंदर गुप्ता यांनी अ‍ॅप डेली कंपनीच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.दररोज शेकडो व्यक्ती बाजारातून विविध कंपन्यांचे मोबाइल विकत घेतात. मोबाइल विक्री करणाऱ्या प्रतिष्ठानांमध्ये विमा कंपन्याचे एजंट कार्यरत असतात. मोबाइल घेतल्यावर हजार, पंधराशे रुपयांचा विमा काढून ग्राहकाला मोबाइलची तुटफूट झाल्यास, तांत्रिक बिघाड किंवा चोरी झाल्यास, दहा दिवसांच्या आता मोबाइल बदलून मिळेल किंवा दुरुस्ती करून मिळेल, असे आमिष दाखवितात आणि मोबाइल पूर्णत: निकामी झाल्यास मोबाइलची पूर्ण किंमत, दुरुस्तीचा खर्च देण्याचेही आमिष दाखवितात. विमा एजंटांच्या भुलथापांना बळी पडून अनेक जण मोबाइलचा विमा काढतात. असाच प्रकार पंचशील नगरात राहणारे श्यामसुंदर गुप्ता यांच्यासह अनेक ग्राहकांसोबत घडला. गुप्ता यांनी ११ हजार रुपये किमतीचा मोबाइल खरेदी केल्यानंतर तेथील एका एजंटकडून १,२४५ रुपयांचा विमा काढला. यावेळी एजंटने त्यांचे कार्यालय जैन मंदिराजवळ असल्याचे त्यांना सांगितले आणि काही अडचण आल्यास कार्यालयात संपर्क साधण्यासही सांगितले. दरम्यान, गुप्ता यांचा मोबाइल चोरी झाल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार केली आणि त्यासंबंधीचे कागदपत्र घेऊन अ‍ॅप डेली कंपनीचे कार्यालय गाठले; परंतु त्यांना कार्यालय बंद असल्याचे दिसून आले. त्यांनी चौकशी केल्यानंतर येथील कार्यालय बंद झाल्याचे त्यांना कळले. याठिकाणी आणखी मोबाइलधारकसुद्धा आलेले होते. त्यांचीही फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यामुळे गुप्ता यांच्यासह आणखी काही मोबाइलधारकांनी अ‍ॅड. शेषराव गव्हाळे यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल केली आहे. अ‍ॅप डेली विमा कंपनीने गुप्ता यांचीच नाहीतर शेकडो ग्राहकांची लाखो रुपयांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे या कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. उदंड झाल्या विमा कंपन्यामोबाइल क्षेत्रातही शेकडो विमा कंपन्या निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक मोबाइल शोरूममध्ये या विमा कंपन्यांचे एजंट बसलेले असतात. शोरूम मालकसुद्धा ग्राहकांना मोबाइलचा विमा काढण्यासाठी प्रोत्साहित करतात. ग्राहकाने सहमती दर्शविल्यानंतर त्यांना विमा एजंटकडे नेल्या जाते आणि एजंट मोबाइलचा विमा काढून देतो. कंपनीने दिलेले मोबाइल नंबर बंदयासंदर्भात अ‍ॅप डेली कंपनीने दिलेल्या मोबाइल नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मोबाइल बंद असल्याचे दिसन आले.