शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

‘मिसिंग’ रस्त्यांना  विकास कामांतून ‘खो’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:54 IST

रस्ते विकास योजनेत समाविष्ट असलेले जिल्हय़ातील १८८५ कि.मीचे रस्ते मिसिंग आहेत. अस्तित्वातील रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीमध्येच कोट्यवधींचा निधी ओतला जात असताना मिसिंग रस्त्यांकडे जिल्हय़ातील लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यंत्रणेचे कमालीचे दुर्लक्ष आहे. जिल्हय़ातील ‘मिसिंग’ रस्त्यांचे जाळे विणून त्याद्वारे विकासाच्या रक्तवाहिन्या निर्मितीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण होत आहे.

ठळक मुद्देविकासाच्या नावे बोंबाबोंब जिल्हय़ात १८८५ कि.मी.चे रस्ते मिसिंग

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: रस्ते विकास योजनेत समाविष्ट असलेले जिल्हय़ातील १८८५ कि.मीचे रस्ते मिसिंग आहेत. अस्तित्वातील रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीमध्येच कोट्यवधींचा निधी ओतला जात असताना मिसिंग रस्त्यांकडे जिल्हय़ातील लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यंत्रणेचे कमालीचे दुर्लक्ष आहे. जिल्हय़ातील ‘मिसिंग’ रस्त्यांचे जाळे विणून त्याद्वारे विकासाच्या रक्तवाहिन्या निर्मितीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण होत आहे.अकोला जिल्हय़ासाठी २00१ ते २0२१ या काळातील रस्ते विकास योजनेचे अंतिम प्रारूप मंजूर आहे. त्यामध्ये राष्ट्रीय, प्रमुख राज्य मार्ग, राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग असे मिळून ४७६६ कि.मी. लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी २८८0 कि.मी.चे रस्ते अस्तित्वात आहेत, तर १८८५ कि.मी.चे रस्ते नव्याने तयार करावे लागणार आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेकडे असलेल्या ग्रामीण रस्त्यांची लांबी १४९५ कि.मी. आहे. या रस्त्यांना प्रारूप आराखड्यात क्रमांक देण्यात आले आहेत; मात्र प्रत्यक्षात त्यांची कामेच झालेली नाहीत. त्या रस्त्यांवर केवळ बैलगाड्या चालू शकतात. आराखड्यात आहेत; पण त्या रस्त्यांवर मुरूम टाकला नाही, खडीकरण झाले नाही, कोणत्याही तुकड्याचे डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण झाले नाही, तसे काम झाल्याची त्या रस्ता क्रमांकावर नोंद नाही, ते रस्ते आराखड्यानुसार मिसिंग आहेत. 

जिल्हा परिषदेकडील रस्त्यांचा प्रचंड अनुशेषग्रामीण भागातील आणि जिल्हा परिषदेकडे जबाबदारी असलेल्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांचा जिल्हय़ात प्रचंड अनुशेष आहे. इतर सर्व मार्गांच्या तुलनेत नवीन ग्रामीण रस्ते निर्मितीमध्ये मोठी तफावत आहे. आराखड्यात जिल्हा परिषदेकडे असलेल्या ग्रामीण मार्गांंची एकू ण लांबी २१५३ कि.मी. आहे. २0२१ पर्यंंत हा आराखडा आहे. त्यासाठी आता चार वर्षे आहेत. या काळात केवळ ६५७ कि.मी. रस्त्यांची निर्मिती झाली आहे. १४९५ कि.मी.चे रस्ते निर्मिती करण्यासाठी आणखी किती वर्षे लागणार, याचा विचारच न केलेला बरा. त्यावरून जिल्हा परिषदेला रस्ते निर्मितीसाठी शासनाकडून दिला जाणारा निधी, त्यातून होणारी रस्ते निर्मिती, ही विकासाच्या नावे बोंबा मारणार्‍यांना आत्मपरीक्षण करावयास लावणारी आहे. 

नवीन रस्ते निर्मितीसाठी शासनाकडून निधी दिला जातो. तो पुरेशा प्रमाणात मिळाल्यास आराखड्यातील रस्त्यांची कामे करता येतात. प्राप्त निधीतून रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करण्यापलीकडे कामे करणे अशक्य होते. - एम.जी. वाठ, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद.