शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

इंग्रजी पत्रातून शेतक-यांची दिशाभूल

By admin | Updated: October 9, 2016 02:58 IST

पिकांची भरपाई मिळेल की नाही; शेतक-यांमध्ये साशंकता !

अकोला, दि. 0८- पेरणीपासून काढणीपर्यंत व त्या पश्‍चातही पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळेल, अशी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यामुळेच परतीच्या पावसाने उडीद, सोयाबीन पिकांचे नुकसान झालेले शेतकरी विमा कंपनीकडे धाव घेत आहेत; मात्र विमा कंपनीकडून शेतकर्‍यांची मागणी फेटाळणारे इंग्रजी भाषेतील पत्र हातात देऊन दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे आता नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळेल की नाही, हा मुद्दा अधांतरी आहे.ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान पावसात २५ ते ३५ दिवसांचा खंड पडला. त्यानंतर परतीच्या पावसाने काढणीसाठी तयार असलेल्या उडीद व सोयाबीनचे केलेले नुकसान शेतकर्‍यांना जबर फटका देणारे आहे. या पिकांची नुकसान भरपाई मिळावी, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नुकसानासाठी कारणीभूत ठरणार्‍या संकटांपासून संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे कंपनीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार असे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांनी पीक विमा कंपनीच्या ही बाब निदर्शनास आणून द्यावयाची आहे, त्यासाठी गेल्या महिनाभरापासून शेतकरी विमा कंपनीच्या कार्यालयात चकरा मारत आहेत. सद्यस्थितीत आकोट, तेल्हारा तालुक्यातील उडीद पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी विमा कंपनीकडे धाव घेत आहेत; मात्र विमा कंपनी अर्जदार शेतकर्‍यांच्या हातात इंग्रजी भाषेतील पत्र देत आहे. त्यामध्ये ऑक्टोबरमध्ये पडणारा पाऊस अवकाळी नाही. तसेच पडलेला पाऊस नुकसान करण्याएवढा नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची मागणी जागेवरच फेटाळण्याचा सोपा मार्ग कंपनीने इंग्रजी भाषेच्या माध्यमातून शोधलेला आहे. त्यातून शेतकर्‍यांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे वाया गेलेल्या उडीद पिकाला विमा कंपनीची मदत मिळण्यासाठी काय करावे, कोणाला भेटावे, या विवंचनेत जिल्हय़ातील शेतकरी आहेत. शेतीनिहाय नुकसानाच्या पाहणीला बगलनव्या स्वरुपातील पीक विमा योजना सुरू करताना त्यामध्ये विम्याचा दावा देण्याचे नियम करण्यात आले आहेत. नव्या योजनेत स्थानिक आपत्ती म्हणून गारपीट, भुस्खलन, पूर, जलमय होणे, या स्थितीमध्ये शेतनिहाय नुकसानीची पाहणी केल्या जाणार आहे. त्याचप्रमाणे पीक कापणीनंतर शेतात १४ दिवसांच्या आत चक्रीवादळ अथवा अवकाळी पाऊस आल्यास नुकसानाची शेतनिहाय पाहणी करून नुकसानाचा दावा मंजूर केला जातो; मात्र या तरतुदीनुसार पाहणी करण्याला विमा कंपनीच्या अधिकार्‍यांकडून बगल दिली जात आहे. त्यातून शेतकर्‍यांची फसवणूकही केली जात आहे.