शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

सभेचे इतिवृत्त,ठरावाच्या प्रती जमा करताना महापालिकेची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:20 IST

महापालिकेतील सर्वसाधारण सभा व स्थायी समितीमध्ये नगरसेवकांसाेबत चर्चा न करता विषय परस्पर मंजूर केले जात असण्यावर शिवसेनेने आक्षेप घेत ...

महापालिकेतील सर्वसाधारण सभा व स्थायी समितीमध्ये नगरसेवकांसाेबत चर्चा न करता विषय परस्पर मंजूर केले जात असण्यावर शिवसेनेने आक्षेप घेत शासनाकडे धाव घेतली. सेनेच्या प्राप्त तक्रारीनुसार चाैकशीअंती राज्य शासनाने २ जुलै २०२० राेजीची सर्वसाधारण सभा व २ सप्टेंबर राेजीच्या स्थायी समितीमधील एकूण २० ठराव नियमबाह्यरित्या मंजूर केल्याचा ठपका ठेवत विखंडित केले आहेत. तसा आदेश २४ डिसेंबर २०२० राेजी नगरविकास विभागाने जारी केला. यादरम्यान, मनपात २०१७ पासून ते आजपर्यंतच्या कालावधीत पार पडलेल्या सर्वसाधारण सभा, स्थायी समितीच्या सभांमधील कामकाजाची चाैकशी करण्याचा आदेशही शासनाने जारी केल्यामुळे सत्ताधारी भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी शासनाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी २९ डिसेंबर राेजी चार सदस्यीय समितीचे गठन केले आहे. समितीला मनपाच्या सभांमधील इतिवृत्त व ठराव उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची धावपळ हाेत असल्याची माहिती आहे.

बांधकाम,जलप्रदाय विभाग येणार अडचणीत

मागील तीन वर्षांच्या कालावधीत बांधकाम विभागामार्फत काेट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने हद्दवाढ क्षेत्रातील ९६ काेटी रुपयांच्या कामाचा समावेश आहे. रस्त्यांचे निर्माण करताना कंत्राटदारांचे हित जाेपासण्यात आले. हद्दवाढ क्षेत्रात अनेक ठिकाणी डांबरीकरणाचे अत्यंत निकृष्ट रस्ते तयार झाले आहेत. यासाेबतच जलप्रदाय विभागामार्फत ‘अमृत’याेजनेेंतर्गत हाेणाऱ्या कामांची देयके तातडीने अदा करण्यात आली. यासाठी सभांमध्ये अनेकदा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. असे ठराव शाेधताना या दाेन्ही विभागाची धांदल उडाल्याची माहिती आहे.