शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

२५ टक्के प्रवेश प्रक्रियेतून वाचण्यासाठी शाळा बनल्या अल्पसंख्याक!

By admin | Updated: April 2, 2016 01:07 IST

शासनाच्या निर्णयाला बगल देण्याचा प्रयत्न.

अकोला: शिक्षण हक्क कायद्यानुसार शासनाने इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहरातील काही शाळांनी २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबवून गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचे इंग्रजी शाळांमध्ये शिकण्याचे स्वप्न पूर्ण केले. परंतु शहरातील काही शाळा शासनाच्या निर्णयाला बगल देण्याचा प्रयत्न करीत आहेत. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेतून वाचण्यासाठी या काही इंग्रजी शाळांनी अल्पसंख्याक असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त केले आहेत. अल्पसंख्याक शाळेचा दर्जा मिळालेल्या शाळेमध्ये २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यापासून सूट मिळते. त्यामुळे शहरातील काही शाळा शिक्षण मंत्रालयात जाऊन आर्थिक देवाण-घेवाण करून अल्पसंख्याक शाळेचे प्रमाणपत्र आणत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिक्षण हक्क कायद्यानुसार इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍या पालकांच्या पाल्यांना इयत्ता पहिल्या वर्गामध्ये प्रवेश द्यावा. त्यासाठी कोणतेही शिक्षण शुल्क आणि डोनेशन शुल्क न घेता हा प्रवेश द्यावा लागतो. शासनाने प्रवेश दिलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क शाळांना देण्याची तरतूद आहे. नेमकी हीच बाब शहरातील काही शाळांच्या जिव्हारी लागली आहे. परंतु शहरातील अशा काही शाळा आहेत, ज्यांनी २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबवूनही शासनाने त्यांना चार वर्षांपासूनचा शिक्षण शुल्काचा परतावा दिलेला नाही. असे असतानाही या शाळांनी गोरगरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. परंतु शासनाने आमच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांना शिक्षण शुल्क परतावा द्यावा, तर येत्या शैक्षणिक वर्षात गोरगरीब विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या शाळेत प्रवेश देऊ, अशी भूमिका घेतली आहे. परंतु काही इंग्रजी शाळांनी मात्र २५ टक्के प्रवेश प्रक्रियेपासून पळ काढण्यासाठी नवीन शक्कल शोधून काढली आहे. या शाळांनी थेट शिक्षण मंत्रालयातून अल्पसंख्याक शाळा असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करून २५ टक्के शाळा प्रवेशास खो दिला आहे. याबाबत अनेक पालकांनी माहितीच्या अधिकारात सुद्धा ही माहिती शिक्षणाकडून मागविली आहे.