शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
5
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
6
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
7
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
8
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
9
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
10
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
11
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
12
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
13
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
14
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
15
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
16
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
17
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
18
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
19
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
20
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

‘जलयुक्त’चा कोट्यवधी निधी परतीच्या मार्गावर!

By admin | Updated: March 24, 2017 02:08 IST

‘मार्च एन्डिंग’ला उरले सात दिवस; अखर्चित १५0 कोटी खर्चाचे आव्हान.

संतोष येलकर अकोला, दि. २३- जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अकोला जिल्ह्यात यावर्षी निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये कामे करण्यासाठी १५५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर असला, तरी जिल्ह्यात २३ मार्चपर्यंंत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पूर्ण झालेल्या ६0६ कामांवर केवळ ५ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. उर्वरित १५0 कोटी १ लाख रुपयांचा निधी अद्याप अखर्चित आहे. ह्यमार्च एन्डिंगह्णला केवळ सात दिवसांचा कालावधी उरला असल्याने, जलयुक्त शिवार अभियानातील कामांचा अखर्चित निधी यंदाही शासनाकडे परत जाण्याच्या मार्गावर आहे. त्यानुषंगाने अखर्चित निधी ह्यमार्च एन्डह्ण पर्यंत खर्च करण्याचे आव्हान जिल्ह्यातील यंत्रणांसमोर निर्माण झाले आहे.राज्यात वारंवार निर्माण होणार्‍या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत गत तीन वर्षांंपासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी घोषीत केला होता. या अभियानांतर्गत करण्यात येणार्‍या कामांमुळे पाणीसाठय़ात वाढ होत असून, उपलब्ध पाणीसाठय़ाचा शेती सिंचनासाठी उपयोग होत आहे. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २0१६-१७ या वर्षात अकोला जिल्ह्यात १२५ गावांची निवड करण्यात आली असून, निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये ह्यजलयुक्त शिवारह्णची ३ हजार ९६३ कामे करण्याचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. विविध यंत्रणांमार्फत ही कामे करावयाची असून, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांसाठी १५५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी शासनामार्फत मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील मंजूर कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असला, तरी मंजूर कामांपैकी २३ मार्चपर्यंंत जिल्ह्यात केवळ ६0६ कामे पूर्ण करण्यात आली असून, उपलब्ध निधीपैकी केवळ ५ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर आराखड्यातील उर्वरित ३ हजार ३५७ कामे अद्याप पूर्ण होणे बाकी असून, या कामांचा १५0 कोटी १ लाख रुपयांचा निधी अखर्चित आहे. ह्यमार्च एन्डिंगह्णला केवळ सात दिवसांचा कालावधी उरला असून, जिल्ह्यात ह्यजलयुक्त शिवारह्ण कामांसाठी उपलब्ध अखर्चित निधी ह्यमार्च एन्डिंगह्णपर्यत खर्च करण्याचे आव्हान यंत्रणांसमोर निर्माण झाले आहे. अखर्चित निधी सात दिवसांच्या कालावधीत खर्च होणार नसल्याने, गतवर्षीप्रमाणे यंदाही कामांचा कोट्यवधींचा निधी शासनाकडे परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रखडलेली अशी आहेत कामे! जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हय़ात मंजूर असलेली कामे कृषी विभाग, जलसंधारण, जिल्हा परिषद, पाटबंधारे, वन विभाग व सामाजिक वनीकरण इत्यादी यंत्रणांमार्फत करण्यात येत आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर कामांसाठी निधी उपलब्ध असला, तरी ३ हजार ३५७ कामे रखडली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सिमेंट नाला बांध, ढाळीचे बांध, सिमेंट नाला बांध खोलीकरण, खोदतळे, शेततळे, नाला खोलीकरण, समतल चर, गाव तलाव, पाझर तलावांची दुरुस्ती, विहिरींचे पुनर्भरण इत्यादी कामांचा समावेश आहे.यंत्रणांच्या उदासीनतेत अडकली कामे!जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हय़ात निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये यंत्रणानिहाय कामे मंजूर करण्यात आली; मात्र संबंधित यंत्रणांमार्फत कामे सुरू करण्याची प्रक्रिया संथगतीने राबविण्यात येत आहे. लोकसहभागातून करावयाची कामे मार्गी लागली असली, तरी यंत्रणांमार्फत करावयाच्या कामांमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करावयास होणारा विलंब आणि कामातील संथगती इत्यादी कारणांमुळे जिल्हय़ात यंत्रणांच्या उदासीनतेत जलयुक्त शिवार अभियानातील कामे अडकल्याचे चित्र आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हय़ातील कामांना गत पंधरा दिवसांपासून गती आली असली, तरी येत्या मार्च अखेरपर्यंंत जिल्हय़ातील कामे आणि त्यासाठी उपलब्ध निधी खर्च होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.६0६ कामे पूर्ण; ३३५७ कामे प्रलंबित!जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हय़ातील १२५ गावांमध्ये यावर्षी ३ हजार ९६३ कामे मंजूर असून, त्यापैकी आतापर्यंंत ६0६ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित ३ हजार ३५७ कामे अद्याप प्रलंबित आहेत. पूर्ण करण्यात आलेल्या कामांवर ५ कोटी ८५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून, उर्वरित ३ हजार ३३५७ कामांचा १५0 कोटी १ लाख रुपयांचा निधी अद्याप अखर्चित आहे.