शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’चा कोट्यवधी निधी परतीच्या मार्गावर!

By admin | Updated: March 24, 2017 02:08 IST

‘मार्च एन्डिंग’ला उरले सात दिवस; अखर्चित १५0 कोटी खर्चाचे आव्हान.

संतोष येलकर अकोला, दि. २३- जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अकोला जिल्ह्यात यावर्षी निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये कामे करण्यासाठी १५५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर असला, तरी जिल्ह्यात २३ मार्चपर्यंंत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पूर्ण झालेल्या ६0६ कामांवर केवळ ५ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. उर्वरित १५0 कोटी १ लाख रुपयांचा निधी अद्याप अखर्चित आहे. ह्यमार्च एन्डिंगह्णला केवळ सात दिवसांचा कालावधी उरला असल्याने, जलयुक्त शिवार अभियानातील कामांचा अखर्चित निधी यंदाही शासनाकडे परत जाण्याच्या मार्गावर आहे. त्यानुषंगाने अखर्चित निधी ह्यमार्च एन्डह्ण पर्यंत खर्च करण्याचे आव्हान जिल्ह्यातील यंत्रणांसमोर निर्माण झाले आहे.राज्यात वारंवार निर्माण होणार्‍या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत गत तीन वर्षांंपासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी घोषीत केला होता. या अभियानांतर्गत करण्यात येणार्‍या कामांमुळे पाणीसाठय़ात वाढ होत असून, उपलब्ध पाणीसाठय़ाचा शेती सिंचनासाठी उपयोग होत आहे. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २0१६-१७ या वर्षात अकोला जिल्ह्यात १२५ गावांची निवड करण्यात आली असून, निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये ह्यजलयुक्त शिवारह्णची ३ हजार ९६३ कामे करण्याचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. विविध यंत्रणांमार्फत ही कामे करावयाची असून, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांसाठी १५५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी शासनामार्फत मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील मंजूर कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असला, तरी मंजूर कामांपैकी २३ मार्चपर्यंंत जिल्ह्यात केवळ ६0६ कामे पूर्ण करण्यात आली असून, उपलब्ध निधीपैकी केवळ ५ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर आराखड्यातील उर्वरित ३ हजार ३५७ कामे अद्याप पूर्ण होणे बाकी असून, या कामांचा १५0 कोटी १ लाख रुपयांचा निधी अखर्चित आहे. ह्यमार्च एन्डिंगह्णला केवळ सात दिवसांचा कालावधी उरला असून, जिल्ह्यात ह्यजलयुक्त शिवारह्ण कामांसाठी उपलब्ध अखर्चित निधी ह्यमार्च एन्डिंगह्णपर्यत खर्च करण्याचे आव्हान यंत्रणांसमोर निर्माण झाले आहे. अखर्चित निधी सात दिवसांच्या कालावधीत खर्च होणार नसल्याने, गतवर्षीप्रमाणे यंदाही कामांचा कोट्यवधींचा निधी शासनाकडे परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रखडलेली अशी आहेत कामे! जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हय़ात मंजूर असलेली कामे कृषी विभाग, जलसंधारण, जिल्हा परिषद, पाटबंधारे, वन विभाग व सामाजिक वनीकरण इत्यादी यंत्रणांमार्फत करण्यात येत आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर कामांसाठी निधी उपलब्ध असला, तरी ३ हजार ३५७ कामे रखडली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सिमेंट नाला बांध, ढाळीचे बांध, सिमेंट नाला बांध खोलीकरण, खोदतळे, शेततळे, नाला खोलीकरण, समतल चर, गाव तलाव, पाझर तलावांची दुरुस्ती, विहिरींचे पुनर्भरण इत्यादी कामांचा समावेश आहे.यंत्रणांच्या उदासीनतेत अडकली कामे!जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हय़ात निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये यंत्रणानिहाय कामे मंजूर करण्यात आली; मात्र संबंधित यंत्रणांमार्फत कामे सुरू करण्याची प्रक्रिया संथगतीने राबविण्यात येत आहे. लोकसहभागातून करावयाची कामे मार्गी लागली असली, तरी यंत्रणांमार्फत करावयाच्या कामांमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करावयास होणारा विलंब आणि कामातील संथगती इत्यादी कारणांमुळे जिल्हय़ात यंत्रणांच्या उदासीनतेत जलयुक्त शिवार अभियानातील कामे अडकल्याचे चित्र आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हय़ातील कामांना गत पंधरा दिवसांपासून गती आली असली, तरी येत्या मार्च अखेरपर्यंंत जिल्हय़ातील कामे आणि त्यासाठी उपलब्ध निधी खर्च होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.६0६ कामे पूर्ण; ३३५७ कामे प्रलंबित!जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हय़ातील १२५ गावांमध्ये यावर्षी ३ हजार ९६३ कामे मंजूर असून, त्यापैकी आतापर्यंंत ६0६ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित ३ हजार ३५७ कामे अद्याप प्रलंबित आहेत. पूर्ण करण्यात आलेल्या कामांवर ५ कोटी ८५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून, उर्वरित ३ हजार ३३५७ कामांचा १५0 कोटी १ लाख रुपयांचा निधी अद्याप अखर्चित आहे.