सरासरी होणारा पाऊस
२५२.१
आतापर्यंत झालेला पाऊस
२१३.२
झालेला पाऊस (टक्के)
८४.६
दीड महिन्यात ३० टक्के पाऊस
रुसलेला वरुणराजा पुन्हा जिल्ह्यावर प्रसन्न झाला आहे. गत ९ दिवसांमध्ये जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. तर दीड महिन्यात वार्षिक सरासरीच्या ३० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे पिके चांगली तरारली आहेत.
दोन दिवस कोरडेच!
जिल्ह्यात ७ जुलैपासून पुन्हा मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे कुठे तुरळक तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे; मात्र गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांमध्ये कुठेच पाऊस झाला नाही. केवळ पातूर तालुक्यात तुरळक पाऊस झाला.
फवारणीला वेग!
जून महिन्यात सुरुवातीला सिंचन उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. या शेतकऱ्यांचे पीक जोमात आहे. यंदा सोयाबीनही डौलाने उभे आहे. त्यामुळे पुढील काळात पिकांवर होणारा किडींचा प्रादुर्भाव पाहता फवारणीला वेग आला आहे.