शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कुटुंब नियोजनाची पुरुषांना भीती, गतवर्षी केवळ १३३ जणांच्याच शस्त्रक्रिया, महिलांच्या मात्र ३,६४०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:20 IST

लोकसंख्या वाढीवर नियंत्रणासाठी शासनामार्फत कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमांतर्गत नसबंदीच्या शस्त्रक्रियेसाठी प्रामुख्याने महिलांवरच भर दिला जात असल्याचे ...

लोकसंख्या वाढीवर नियंत्रणासाठी शासनामार्फत कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमांतर्गत नसबंदीच्या शस्त्रक्रियेसाठी प्रामुख्याने महिलांवरच भर दिला जात असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. जिल्ह्यात २०१८-१९ या वर्षात एकूण ३ हजार ३६६ जणांची नसबंदी करण्यात आली होती. त्यामध्ये पुरुषांचे प्रमाण केवळ १५२ होते, तर ३,२१४ महिलांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. २०१९-२० मध्येही पुरुषांमध्ये नसबंदीची भीती कायम दिसून आली. या वर्षात ३ हजार ६४० महिलांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली, तर केवळ १३३ पुरुषांनी मोहिमेंतर्गत शस्त्रक्रिया केली. २०२०-२१ मध्ये एकाही पुरुषाने कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केली नाही. चालू वर्षात एक हजार ५६८ महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे नसबंदी ही फक्ती स्त्रियांनीच करावी, असा अलिखित नियम झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये बदल होणे अपेक्षित असून, आरोग्य विभागामार्फत त्यात बदल होणे अपेक्षित आहे.

एक नजर... शस्त्रक्रियांवर

वर्ष - महिला - पुरुष

२०१८-१९ - ३,२१४ - १५२

२०१९-२०- ३,६४० - १३३

२०२०-२१ - १,५६८ - ००

काय आहेत गैरसमज

पुरुषप्रधान संस्कृती असल्याने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया ही महिलांनीच करावी, असा गैरसमज पुरुषांमध्ये आहे. ही स्थिती आजची नाही, तर अनेक वर्षांपासून सुरू आहे. यासोबतच पुरुषांमध्ये शस्त्रक्रियेविषयी भीतीदेखील असते. त्यामुळेच महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या शस्त्रक्रिया कमी असल्याचे चित्र दिसून येते.

कुटुंब नियोजन हे महिलांसोबतच पुरुषांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे केवळ महिलांनीच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी, हे चुकीचे आहे.

- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी