शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

पाणीटंचाई कृती आराखड्यावर सदस्य आक्रमक; तीन ‘बीडीओं’ना ‘शो काॅज’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:16 IST

अकोला: जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात न घेता जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा पहिल्या टप्प्यातील कृती आराखडा तयार करण्यात आल्याच्या मुद्द्यावर मंगळवारी ...

अकोला: जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात न घेता जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा पहिल्या टप्प्यातील कृती आराखडा तयार करण्यात आल्याच्या मुद्द्यावर मंगळवारी जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा चांगलीच गाजली. पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यासाठी तीन तालुक्यातील प्रस्ताव निरंक पाठविण्यात आल्याने, सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत, कारवाईची मागणी लावून धरली. त्यानुषंगाने पाणीटंचाई निवारणाचे निरंक प्रस्ताव पाठविणाऱ्या जिल्ह्यातील तीन गटविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) कारणे दाखवा (शो काॅज) नोटीस बजावण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सभेत घोषित केले.

जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीसाठी पहिल्या टप्प्यातील कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला; परंतु पहिल्या टप्प्यातील पाणीटंचाई कृती आराखडा तयार करताना जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात का घेतले नाही, अशी विचारणा सदस्य गोपाल दातकर व ज्ञानेश्वर सुलताने यांनी सभेत केली. जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात न घेता चुकीच्या पध्दतीने आराखडा तयार करण्यात आल्याच्या मुद्द्यावर डाॅ. प्रशांत अढाऊ, गजानन पुंडकर, सभापती चंद्रशेखर पांडे आदी सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच मंजूर करण्यात आलेल्या कृती आराखड्यात तीन तालुक्यात पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना निरंक असल्याने, कृती आराखड्यासाठी निरंक प्रस्ताव पाठविणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रशांत अढाऊ यांच्यासह इतर सदस्यांनी लावून धरली. त्यामुळे पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यासाठी निरंक प्रस्ताव पाठिवणाऱ्या जिल्ह्यातील अकोट, पातूर व मूर्तिजापूर पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी साैरभ कटियार यांनी सभेत घोषित केले.

झुनका भाकर केंद्राची

जागा खाली का केली नाही?

सर्वोच्च न्यायालय व शासनाच्या आदेशानंतरही जिल्हा परिषद परिसरातील झुनका भाकर केंद्राची जागा अद्यापही का खाली करण्यात आली नाही, अशी विचारणा सदस्य ज्ञानेश्वर सुलताने यांनी सभेत केली. जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद मालकीच्या जागांवरील अतिक्रमणे काढून जागा ताब्यात घेण्याची मागणीही त्यांनी केली.

शाळांच्या जागांची

मोजणी करा!

जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या जागांची मोजणी करून ग्रामपंचायतींच्या रेकाॅर्डला नोंद करण्याची सूचना सदस्य गोपाल दातकर यांनी सभेत मांडली. शाळांच्या जागांवरील अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. सस्ती जोडमार्गाच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता असताना निविदा प्रक्रिया का राबविण्यात आली नाही, अशी विचारणाही त्यांनी केली.