शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सभेच्या सचिवांनीच संपवली सभा

By admin | Updated: April 11, 2017 01:39 IST

अकोला जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच झाला उफराटा प्रकार.

अकोला : जिल्हा परिषदेची कोणतीही सभा त्या सभेच्या अध्यक्षांच्या परवानगीने संपवली जाते. मात्र, सोमवारी आक्रित घडले. अर्थ समितीचे सभापती पुंडलिकराव अरबट यांच्या समक्षच सभा संपल्याचे सांगत सभेच्या सचिव मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर सभागृहातून निघूनही गेल्या. त्यातून पदाधिकार्‍यांचे अधिकारही न जुमानण्याचा आणखी एक प्रताप जिल्हा परिषदेत घडला. त्यामुळे अवाक झालेल्या पदाधिकार्‍यांना तक्रारीशिवाय गत्यंतर उरले नाही. अर्थ समितीची सभा सोमवारी बोलावण्यात आली. यावेळी विषयपत्रिकेवर गेल्या सभेचे इतवृत्त कायम करणे, हा विषयच नव्हता. ही बाब सदस्या रेणुका दातकर, ज्योत्स्ना बहाळे यांनी उपस्थित केली. त्यावर सभापती अरबट यांनी सभेच्या सचिव म्हणून मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर यांना विचारणा केली. त्यावर गेल्या वर्षीच्या सभेतही हा विषय घेण्यात आला नव्हता, असे त्यांनी सांगितले. विषय न ठेवण्याबाबत काही नियम आहे का, अशी विचारणा केली असता नागर यांनी इतवृत्त २३ मार्चच्या सभेत ठेवल्याने यावेळी ठेवले नाही, असे सांगितले. नागर यांच्या उत्तराने समाधान होत नाही, असे सांगत रेणुका दातकर यांनी त्यांना धारेवर धरले. अनावधानाने चूक झाल्याचे मान्यत्यामुळे नागर यांनी अनावधानाने ही चूक झाल्याचे मान्य केले. आता वेळेवरच्या विषयामध्ये इतवृत्त घेऊ, असेही सुचवले. मात्र, सभापती अरबट यांनी चूक झाली असेल, तर सभेच्या सचिवावर प्रशासकीय कारवाई करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्याचे सांगितले. त्यामुळे विषय अंगलट येत असल्याचे दिसताच नागर यांची तारांबळ झाली.सभा संपल्याचे सांगत बहिर्गमनयाप्रकाराने भांबावलेल्या नागर यांनी सभापतींची परवानगी न घेता स्वत:च सभा संपल्याचे सांगत सभागृहातून बहिर्गमन केले. त्यानंतर सभापती अरबट यांनी इतवृत्त नसल्याने सभा रद्द करून सात दिवसांच्या आत विषय नमूद करून सभा घेतली जाईल, तसेच सचिवावर कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला जाईल, अशी नोंद घेण्याचे संबंधितांना सांगितले.