शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

पाणीटंचाई निवारण आराखड्यासाठी आज बैैठक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:18 IST

अकोला : शासन निकषानुसार पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील ...

अकोला : शासन निकषानुसार पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील संभाव्य पाणीटंचाई निवारण कृती आराखड्याच्या मुद्दयावर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. ८ मार्च) संबंधित यंत्रणांची आढावा बोलावली आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणासाठी जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या कालावधीकरिता पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सुरू आहे. पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा शासन निकषानुसार तयार करून सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारण कृती आराखड्याच्या मुद्दयावर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ८ मार्च रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित यंत्रणांची आढावा बैठक बोलावली आहे. जिल्हा परिषोचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता आदी अधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

दोन कूपनलिकांच्या कामांना

प्रशासकीय मान्यता!

तेल्हारा तालुक्यातील कोठा व माळेगाव बाजार या दोन गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी दोन कूपनलिकांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी (दि.५ मार्च) दिला. ४ लाख ३९ हजार ८६६ रुपयांच्या निधीतून दोन कूपनलिकांची कामे १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करून दोन्ही गावांतील पाणीटंचाईची समस्या निकाली काढण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत.