शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वर्षातून आठ वेळा होणार संजय गांधी निराधार योजनेची बैठक

By admin | Updated: August 10, 2015 00:58 IST

सामाजिक न्याय विभागाचे आदेश; प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी होणार मदत.

बुलडाणा : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी निराधार समितीच्या बैठका वर्षभरात किमान आठवेळा ठरवून दिलेल्या तारखेला घेण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी मदत होणार आहे. संजय गांधी निराधार योजनेतून निराधार व्यक्तींना दरमहा निश्‍चित वेतन देण्यात येते; मात्र या योजनेतून लाभार्थ्यांना अर्ज केल्यानंतर दोन-दोन वर्षानंतरही लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी प्रत्येक तहसील कार्यालयात दाखल होत आहेत. या तक्रारींचे निरसन करण्यासाठी तसेच प्रलंबित प्रकरणाचा निपटारा होण्याच्या दृष्टीकोनातून सामाजिक न्याय विभागाने ४ ऑगस्ट रोजी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यापुढे वर्षभरात निराधार समितीच्या आठ बैठका निश्‍चित केलेल्या तारखेच्या दिवशी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती, १0 मार्च सावित्रीबाई फुले पुण्यतिथी, ११ ते १४ एप्रिल महात्मा ज्योतीबा फुले जयंती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, २७ मे रमाबाई आंबेडकर यांची पुण्यतिथी, २६ जून राजङ्म्री छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती व ६ डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन यांचा समावेश आहे. या दिवशी शासकीय सुट्टी किंवा अन्य रजा येत असल्यास या तारखेच्या पुर्वीच्या किंवा नंतरच्या तीन दिवसाची तारीख निश्‍चित करण्याचे आदेशात नमूद केले आहे. संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष बैठकीस गैरहजर राहिल्यास तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या बैठका घेण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

*तहसीलदारांवर जबाबदारी

        सामाजिक न्याय विभागाने दिलेल्या तारखेस बैठका घेण्याची संपूर्ण जबाबदारी प्रत्येक तालुक्याच्या तहसिलदारांवर सोपविण्यात आली आहे. या दरम्यान बैठका न झाल्यास तहसिलदारांना जबाबदार धरण्यात येणार आहे. बैठक इनकॅमेरा घेण्याचे निर्देशही देण्यात आलेत.