शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
3
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
4
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
5
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
6
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
7
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
8
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
9
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
10
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
12
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
13
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
14
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
15
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
16
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
17
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
18
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
19
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
20
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप बूथ प्रमुखांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:21 IST

यावेळी मध्य मंडळाचे पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, आघाडी प्रमुख आदी उपस्थित होते. डम्पिंग ग्राऊंडमुळे दुर्गंधी अकाेला : नायगाव येथे ...

यावेळी मध्य मंडळाचे पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, आघाडी प्रमुख आदी उपस्थित होते.

डम्पिंग ग्राऊंडमुळे दुर्गंधी

अकाेला : नायगाव येथे मनपाच्या डम्पिंग ग्राऊंडवर शहरातील कचऱ्याची साठवणूक केली जाते. अनेकदा कचऱ्याला आग लागते. दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवाशांच्या जीविताला धाेका निर्माण झाला आहे. दुर्गंधीमुळे हवा प्रदूषित झाली असून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाने उपाययाेजना करण्याची मागणी हाेत आहे.

जलकुंभातून पाण्याची नासाडी

अकाेला : रेल्वे स्टेशन चाैकात मनपाचे दाेन जलकुंभ आहेत. यापैकी एका जलकुंभातून अकाेटफैल परिसराला पाणीपुरवठा केला जाताे. अकाेटफैल भागातील उड्डाणपूलालगतच्या भागात व्हाॅल्व्ह नादुरूस्त असल्याने याठिकाणी पाण्याचा माेठ्या प्रमाणात अपव्यय हाेताे. याकडे मनपाच्या जलप्रदाय विभागाने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.

नालीची उंची कमी करा!

अकाेला : अग्रेसन चाैकासमाेर क्रीडा संकुलकडे जाणाऱ्या मार्गावर रस्ता रूंदीकरणाच्या कामात माेठी नाली खाेदण्यात आली. सिमेंट नालीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी नालीची उंची वाढल्यामुळे रामदास पेठ, सांस्कृतिक भवनकडे जाणारे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. नालीची उंची कमी करा,अन्यथा याठिकाणी मुरूमाचा भराव घालण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

बेघर नागरिक पुन्हा रस्त्यावर

अकाेला: शहरात उघड्यावर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांसाठी मनपाने निवारा उभारला आहे. तरीही जिल्हाधिकारी कार्यालयाची आवारभिंत, सार्वजिनक बांधकाम विभाग तसेच जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाच्या आवारभिंतीलगत बेघर नागरिकांचे वास्तव्य दिसून येत आहे. मनपाने बेघर नागरिकांना निवाऱ्यात दाखल करण्याची मागणी प्रकर्षाने समाेर आली आहे.

रस्त्याची दुरूस्ती आटाेपली

अकाेला : जुने शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये भिकमचंद खंडेलवाल विद्यालयाजवळच्या रस्त्याची दुरवस्था झाली हाेती. सिमेंट रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेल्याने त्यावर डांबराचा थर टाकण्यात आला हाेता. पावसात या रस्त्यावर ठिकठिकाणी ठिगळ पडले. माजी उपमहापाैर वैशाली शेळके यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याची दुरूस्ती पूर्ण करण्यात आली. यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

रस्त्यावरील ‘स्पीड ब्रेकर’कमी करा!

अकाेला : शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबाेळातील रस्त्यांवर नागरिकांनी मनमानरीत्या गतिराेधक बसविले आहेत. गतिराेधक नेमक्या किती मीटर अंतरावर असावेत ,याविषयी बांधकाम विभागाचे निकष आहेत. परंतु याकडे दुर्लक्ष करून नागरिकांनी गतिराेधक उभारल्याने वाहनचालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. असे गतिराेधक काढण्याची मागणी मनपाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.