शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

विकासनिधीवर ‘वॉच’ठेवण्यासाठी यंत्रणा

By admin | Updated: December 22, 2014 00:27 IST

आदिवासी विकास मंत्र्यांचा निर्णय.

अकोला:आदिवासींना विकासाच्या प्रवाहात आणन्यासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी वितरीत करण्यात येत असला तरी शेवटच्या घटकापर्यंत निधीचा लाभ मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. विकास निधीच्या वाटपातील बेशिस्तपणा कारणीभूत असल्याचे लक्षात आल्याने यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी घेतला आहे. आदिवासी समाजाची शैक्षणिक, आर्थिक सुधारणा होण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विविध योजना कार्यान्वीत आहेत. आदिवासींच्या विकासासाठी राज्यात १२९ ठिकाणी विविध योजना राबवल्या जातात. आज रोजी योजनांसाठी तब्बल ११ हजार कोटींचा निधी उपलब्ध असताना केवळ वाटपाचे योग्य नियोजन नसल्यामुळे विकास योजनांचे तीनतेरा वाजल्याची परिस्थिती आहे. विकास योजनांसोबतच आरोग्य, शिक्षण,सार्वजनिक बांधकाम आदी खात्यांनाही आदिवासी विकास खात्यातून निधी दिला जातो. प्राप्त निधीतून आदिवासी क्षेत्रात विकास योजना राबवण्याची अपेक्षा असते. परंतु या खात्यांना दिला जाणार्‍या निधीचे योग्य प्रकारे विनीयोग होत नसल्याचे समोर आले आहे. हा निधी वितरीत केल्यावर नेमक्या कोणत्या उद्दिष्टासाठी वापरला जातो किंवा नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी आजरोजी कोणतीच यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे या निधीच्या वाटपाला शिस्त लावण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय आदिवासी विकास मंत्री सावरा यांनी घेतला आहे. शिवाय, ज्या खात्यांना आदिवासी विकास योजना राबवण्यासाठी निधी दिला जातो, त्या खात्यांमध्येही याच कामासाठी स्वतंत्र अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाईल.